शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

भलतीकडेच मलम?

By admin | Updated: August 4, 2015 23:01 IST

जखम हाताला आणि मलम पायाला, या वाकप्रचारासारखाच काहीसा उद्योग राज्य सरकार करु पाहते आहे, असे दिसते. वैद्यकीय क्षेत्रात घुसलेले अनैतिक प्रकार ही काही आता

जखम हाताला आणि मलम पायाला, या वाकप्रचारासारखाच काहीसा उद्योग राज्य सरकार करु पाहते आहे, असे दिसते. वैद्यकीय क्षेत्रात घुसलेले अनैतिक प्रकार ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना औषध निर्माण क्षेत्रातील विविध कंपन्या नाना प्रकारची प्रलोभने दाखवितात आणि हे व्यावसायिकही या प्रलोभनांना बळी पडतात, यातही तसे नाविन्य राहिलेले नाही. या दोहोंच्या संगनमतात अखेर बळी जात असतो, तो सामान्य माणसाचाच. डॉक्टर मंडळींनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, प्रलोभनांना बळी पडू नये, रुग्णांच्या जीवाशी आणि पैशाशी खेळ करु नये, अशी आवाहने याच डॉक्टरांच्या विविध संघटना आणि आयुर्विज्ञान परिषदेसारखी शिखर संस्थादेखील अधूनमधून करीत असते. त्यासाठी एक आदर्श आचारसंहितादेखील अस्तित्वात आली असल्याचे सांगितले जाते. जशी डॉक्टर मंडळींसाठी आचारसंहिता आहे, तशीच ती औषधी कंपन्यांसाठीदेखील आहे. पण बहुतेक आचारसंहिता धाब्यावर बसविण्यासाठीच असतात, असा साऱ्यांनीच करुन घेतलेला गोड गैरसमज असल्याने वैद्यकीय व्यवसायदेखील त्याला अपवाद नाही. परिणामी आता याच आचारसंहितेला आणखी कडक करण्याचा व तिचे पालन न करणाऱ्यांना धडा शिकविता यावा अशी काही तरतूद करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने या विषयाशी संबंधित साऱ्या घटकांशी सरकारने चर्चादेखील सुरु केली आहे. चर्चा फलदायी ठरली तर वर्षअखेर सक्तीची आचारसंहिता लागूदेखील होऊ शकेल. पण ते सारे एकूण कठीणच दिसते. आचारसंहिता लागू करा, बंधनकारकही करा, पण आम्हाला काही सवलती द्या, असे काही कंपन्यांचे म्हणणे आहे. मुळात केवळ औषध निर्माण करणाऱ्याच नव्हे तर अन्य उत्पादक कंपन्यांनाही आज अतितीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते. या स्पर्धेतूनच मग ‘विक्री प्रोत्साहन योजना’ उदयाला येतात. तेव्हां स्पर्धा करु नका वा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन वा प्रलोभन यांचा वापर करु नका, असे सरकार कसे काय सांगू शकेल आणि उद्या सांगितले व कंपन्यांनीही ते वरकरणी मान्य केले, तरी त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची खात्री कोण देणार? मुळात सरकार नेमके कोणाला वठणीवर आणू इच्छिते आणि जनसामान्यांना कोणापासून संरक्षण मिळवून देऊ इच्छिते? वैद्यकीय व्यावसायिक की औषधी कंपन्या?