शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

सारे तुझे बहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 15:38 IST

चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत.

चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीच री ओढली. आता आम्हाला आणखी दहा वर्षे संधी द्या, म्हणजे खरी कामे करता येतील, असे आवाहन त्यांनी मेळाव्यात केले. शहा जसे कॉंग्रेसला दोष देतात, तसे पाटील यांनी जळगाव महापालिकेतील सत्ताधारी गटाला लक्ष्य केले. जळगाव शहरात कामे होत नाही, त्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी हे राज्यकर्त्यांना अकारण बोल लावत असल्याची मल्लीनाथी पाटील यांनी केली. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आहे; आता महापालिकेतही द्या, आम्ही विकास करुन दाखवतो, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे करीत आहेत. मुळात दहा वर्षे भाजपाचे खासदार, चार वर्षे भाजपाचे आमदार असून जळगावच्या विकासाचे प्रश्न हे लोकप्रतिनिधी सोडवू शकलेले नाहीत, तर महापालिका हाती देऊन भाजपा कोणते दिवे लावणार आहे, असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे. तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकाराने जळगावात विमानतळ झाले. त्यानंतर तब्बल ७ वर्षांंनंतर विमानसेवा सुरु झाली आणि अवघ्या अडीच महिन्यात बंद पडली. मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देऊ केला होता. निधी मिळायला दीड वर्षे लागली तर निधीतून कामे कोणती करावी, यासंबंधी भाजपाचे आमदार आणि महापौर यांच्यात एकवाक्यता नसल्याने वर्षभरात एक पैसा खर्च झालेला नाही. केवळ भाजपाची सत्ता असली तरच विकास करणार हा हेका जळगावकरांना रुचतो काय हे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानातून दिसणार आहे. विकासाचा असाच वादा भाजपाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केला होता. पण त्याचे पुढे काहीच झालेले नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. सत्ता येऊन चार वर्षे झाली; पण हा भाव शेतकºयांना काही मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशचा कापूस प्रक्रियेसाठी गुजरातमध्ये का येतो, असा सवाल करीत सत्ता दिल्यास टेक्सटाईल पार्क उभारु, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेत विरले आहे. प्रत्येक मतदाराच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील, हे आश्वासन तर एक विनोद होता, असेच आता भाजपाची मंडळी म्हणू लागली आहे. कॉंग्रेसने काहीच केले नाही, असे म्हणत चार वर्षे निघून गेले. स्वत: काय केले हे सांगायची वेळ आली तेव्हा भाजपाची मंडळी बहाणे सांगत आहेत. हे बहाणे आता मतदार ओळखू लागला आहे.

-मिलींद कुलकर्णी

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव