शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सारे तुझे बहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 15:38 IST

चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत.

चार वर्षांची आमची सत्ता काँग्रेसने ६० वर्षांत केलेली घाण साफ करण्यात गेली, या भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वाक्याला प्रमाण मानत भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचीच उजळण शहर-गावांमध्ये करीत आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीच री ओढली. आता आम्हाला आणखी दहा वर्षे संधी द्या, म्हणजे खरी कामे करता येतील, असे आवाहन त्यांनी मेळाव्यात केले. शहा जसे कॉंग्रेसला दोष देतात, तसे पाटील यांनी जळगाव महापालिकेतील सत्ताधारी गटाला लक्ष्य केले. जळगाव शहरात कामे होत नाही, त्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी हे राज्यकर्त्यांना अकारण बोल लावत असल्याची मल्लीनाथी पाटील यांनी केली. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आहे; आता महापालिकेतही द्या, आम्ही विकास करुन दाखवतो, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे करीत आहेत. मुळात दहा वर्षे भाजपाचे खासदार, चार वर्षे भाजपाचे आमदार असून जळगावच्या विकासाचे प्रश्न हे लोकप्रतिनिधी सोडवू शकलेले नाहीत, तर महापालिका हाती देऊन भाजपा कोणते दिवे लावणार आहे, असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे. तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकाराने जळगावात विमानतळ झाले. त्यानंतर तब्बल ७ वर्षांंनंतर विमानसेवा सुरु झाली आणि अवघ्या अडीच महिन्यात बंद पडली. मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी देऊ केला होता. निधी मिळायला दीड वर्षे लागली तर निधीतून कामे कोणती करावी, यासंबंधी भाजपाचे आमदार आणि महापौर यांच्यात एकवाक्यता नसल्याने वर्षभरात एक पैसा खर्च झालेला नाही. केवळ भाजपाची सत्ता असली तरच विकास करणार हा हेका जळगावकरांना रुचतो काय हे १ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानातून दिसणार आहे. विकासाचा असाच वादा भाजपाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केला होता. पण त्याचे पुढे काहीच झालेले नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षात असताना कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. सत्ता येऊन चार वर्षे झाली; पण हा भाव शेतकºयांना काही मिळाला नाही. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशचा कापूस प्रक्रियेसाठी गुजरातमध्ये का येतो, असा सवाल करीत सत्ता दिल्यास टेक्सटाईल पार्क उभारु, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेत विरले आहे. प्रत्येक मतदाराच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील, हे आश्वासन तर एक विनोद होता, असेच आता भाजपाची मंडळी म्हणू लागली आहे. कॉंग्रेसने काहीच केले नाही, असे म्हणत चार वर्षे निघून गेले. स्वत: काय केले हे सांगायची वेळ आली तेव्हा भाजपाची मंडळी बहाणे सांगत आहेत. हे बहाणे आता मतदार ओळखू लागला आहे.

-मिलींद कुलकर्णी

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव