शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

अकलेचे धूमकेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली.

स्मृती इराणी या बार्इंनी त्यांच्या मानव संसाधन मंत्रिपदाच्या कार्यकाळात देशातील उच्च शिक्षणाचे जेवढे वाटोळे करता येईल, तेवढे आपल्या साऱ्या शक्तीनिशी केले. ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली. अमर्त्य सेन आणि काकोडकरांऐवजी अत्यंत कमी कुवतीच्या माणसांचा आधार घेऊन आधीच कोलमडत आलेल्या शिक्षणाची अवस्था आणखी हास्यास्पद केली. त्यांच्या जागी आलेल्या प्रकाश जावडेकरांनाही अजून तो डोलारा सावरता आला नाही. त्यातच मोदींच्या मंत्रिमंडळातील काही माणसे त्यांच्या अकलेचे जे धूमकेतू आकाशात सोडत आहेत, ते पाहिले की उच्च शिक्षणाएवढीच आजच्या नव्या पिढ्यांना जगाशी कराव्या लागणाºया स्पर्धेचीही चिंता वाटू लागते. राजपाल सिंग नावाचे एक राज्यमंत्री सध्या गृहखात्यात आहे. एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना त्या ज्ञानी पुरुषाने डार्विनचा जगन्मान्य सिध्दांत चुकीचा असल्याचे सांगणारा त्याच्या अकलेचा धूमकेतू आकाशात सोडला आणि स्वत:एवढेच आपल्या सरकारचेही देशात व जगात हसे करून घेतले. त्याचे अज्ञान त्यास जाणवून दिल्यानंतरही आपण म्हणतो त्यावर जगात चर्चा व्हावी असा मूर्ख आग्रह तो काही काळ करताना दिसला. पुढे बहुदा मोदींनीच त्याला समज दिल्यानंतर त्याने आपले शहाणपण पाजळणे थांबविले असावे. आता असा धूमकेतू त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर परवा आलेल्या विप्लवकुमार देब या मुख्यमंत्र्याने आकाशात सोडला आहे. रामायण आणि महाभारताच्या काळात भारतात इंटरनेट व कॉम्प्युटर अशा आधुनिक व्यवस्था अस्तित्वातच होत्या आणि माणसे त्यांचा वापरही करीत होती, असे या अर्र्धज्ञानी मुख्यमंत्र्याने जाहीर केले आहे. महाभारत हा ग्रंथ इ.स.पूर्व २३०० ते इ.स.पूर्व १५० वर्षे एवढ्या काळात विकसित झाला आहे. आज उपलब्ध असलेल्या रामायणाची रचनाही दीर्घकाळ झाली आहे. या विप्लवकुमार देब यांनी यातल्या कोणत्या काळात इंटरनेट व कॉम्प्युटर होते, हे सांगितले असते तर त्याचा देशाच्या ज्ञानवृत्तीला काही उपयोग तरी झाला असता. परंतु असे धूमकेतू नुसतेच उडवायचे आणि त्यांच्या उडत्या शेपट्या लोकांना पाहायला लावायच्या आणि तसे करताना आपले व देशाचे जगात हसे करू घ्यायचे. एवढेच शहाणपण ठाऊक असलेल्यांकडून तेवढ्या विवेकाची अपेक्षा नाही. काही काळापूर्वी जागतिक पातळीवरच्या विज्ञान परिषदांमध्ये रामायणातील पुष्पक विमान खरोखरीच कसे होते आणि महाभारतातील युद्धामध्ये अणवस्त्रे कशी वापरली गेली, यावरचे प्रबंध वाचून आपल्या देशी विद्वानांनी साºया देशाचीच जगात खिल्ली उडवून घेतली होती. महाकवींच्या प्रतिभांनी पसरविलेल्या कल्पनांना वैज्ञानिक सत्य मानण्याचा मूर्खपणा अजून आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या देशात शाबूत ठेवण्याचे सध्याचे असे प्रयत्न पाहिले की घटनेने नागरिकांना वैज्ञानिक दृष्टी प्राप्त करण्याचा जो निर्देश दिला त्याचे काय, असा प्रश्न आपल्याला पडावा. पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या काळात देशाने वैज्ञानिक दिशा धारण केलेली व तिने अंधश्रद्धांवर मात केलेलीही जगाने पाहिली होती. आताचे मंत्री डार्विनला खोटा ठरवित असतील आणि रामायण-महाभारतात इंटरनेट अस्तित्वात होते, असे म्हणत असतील तर भारताने गेल्या पाच हजार वर्षांत प्रगती साधली की त्याने अधोगतीचा मार्ग पत्करला, असाच प्रश्न आपल्याला पडावा. असे बोलू शकण्याचे बौद्धिक धाडस जे करतात त्यांना ज्ञानी म्हणत नाहीत. साध्या भाषेत त्यांना अडाणी म्हणतात. अशी अडाणी माणसे केंद्रीय मंत्रिमंडळात वा राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमणाºया पक्षांना व त्यांच्या पुढाºयांना मग काय म्हणायचे असते? या माणसांच्या हाती देशाची व राज्यांची सूत्रे राहत असतील आणि तरीही देश व राज्ये काम करीत असतील तर मग त्यांना व आपल्याला खरोखरीच देव तारत असला पाहिजे, असेच म्हणावे लागते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी