शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अकलेचे धूमकेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली.

स्मृती इराणी या बार्इंनी त्यांच्या मानव संसाधन मंत्रिपदाच्या कार्यकाळात देशातील उच्च शिक्षणाचे जेवढे वाटोळे करता येईल, तेवढे आपल्या साऱ्या शक्तीनिशी केले. ज्ञानी कीर्तिवंत माणसे विद्यापीठाबाहेर घालवून त्यांच्या कुलगुरुपदावर संघातल्या बौद्धिकांवर ज्याची बुद्धिमत्ता आणि मानसिकता तयार झाली आहे, अशी सामान्य कुवतीची माणसं आणून बसविली. अमर्त्य सेन आणि काकोडकरांऐवजी अत्यंत कमी कुवतीच्या माणसांचा आधार घेऊन आधीच कोलमडत आलेल्या शिक्षणाची अवस्था आणखी हास्यास्पद केली. त्यांच्या जागी आलेल्या प्रकाश जावडेकरांनाही अजून तो डोलारा सावरता आला नाही. त्यातच मोदींच्या मंत्रिमंडळातील काही माणसे त्यांच्या अकलेचे जे धूमकेतू आकाशात सोडत आहेत, ते पाहिले की उच्च शिक्षणाएवढीच आजच्या नव्या पिढ्यांना जगाशी कराव्या लागणाºया स्पर्धेचीही चिंता वाटू लागते. राजपाल सिंग नावाचे एक राज्यमंत्री सध्या गृहखात्यात आहे. एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषण करताना त्या ज्ञानी पुरुषाने डार्विनचा जगन्मान्य सिध्दांत चुकीचा असल्याचे सांगणारा त्याच्या अकलेचा धूमकेतू आकाशात सोडला आणि स्वत:एवढेच आपल्या सरकारचेही देशात व जगात हसे करून घेतले. त्याचे अज्ञान त्यास जाणवून दिल्यानंतरही आपण म्हणतो त्यावर जगात चर्चा व्हावी असा मूर्ख आग्रह तो काही काळ करताना दिसला. पुढे बहुदा मोदींनीच त्याला समज दिल्यानंतर त्याने आपले शहाणपण पाजळणे थांबविले असावे. आता असा धूमकेतू त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदावर परवा आलेल्या विप्लवकुमार देब या मुख्यमंत्र्याने आकाशात सोडला आहे. रामायण आणि महाभारताच्या काळात भारतात इंटरनेट व कॉम्प्युटर अशा आधुनिक व्यवस्था अस्तित्वातच होत्या आणि माणसे त्यांचा वापरही करीत होती, असे या अर्र्धज्ञानी मुख्यमंत्र्याने जाहीर केले आहे. महाभारत हा ग्रंथ इ.स.पूर्व २३०० ते इ.स.पूर्व १५० वर्षे एवढ्या काळात विकसित झाला आहे. आज उपलब्ध असलेल्या रामायणाची रचनाही दीर्घकाळ झाली आहे. या विप्लवकुमार देब यांनी यातल्या कोणत्या काळात इंटरनेट व कॉम्प्युटर होते, हे सांगितले असते तर त्याचा देशाच्या ज्ञानवृत्तीला काही उपयोग तरी झाला असता. परंतु असे धूमकेतू नुसतेच उडवायचे आणि त्यांच्या उडत्या शेपट्या लोकांना पाहायला लावायच्या आणि तसे करताना आपले व देशाचे जगात हसे करू घ्यायचे. एवढेच शहाणपण ठाऊक असलेल्यांकडून तेवढ्या विवेकाची अपेक्षा नाही. काही काळापूर्वी जागतिक पातळीवरच्या विज्ञान परिषदांमध्ये रामायणातील पुष्पक विमान खरोखरीच कसे होते आणि महाभारतातील युद्धामध्ये अणवस्त्रे कशी वापरली गेली, यावरचे प्रबंध वाचून आपल्या देशी विद्वानांनी साºया देशाचीच जगात खिल्ली उडवून घेतली होती. महाकवींच्या प्रतिभांनी पसरविलेल्या कल्पनांना वैज्ञानिक सत्य मानण्याचा मूर्खपणा अजून आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या देशात शाबूत ठेवण्याचे सध्याचे असे प्रयत्न पाहिले की घटनेने नागरिकांना वैज्ञानिक दृष्टी प्राप्त करण्याचा जो निर्देश दिला त्याचे काय, असा प्रश्न आपल्याला पडावा. पं. नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या काळात देशाने वैज्ञानिक दिशा धारण केलेली व तिने अंधश्रद्धांवर मात केलेलीही जगाने पाहिली होती. आताचे मंत्री डार्विनला खोटा ठरवित असतील आणि रामायण-महाभारतात इंटरनेट अस्तित्वात होते, असे म्हणत असतील तर भारताने गेल्या पाच हजार वर्षांत प्रगती साधली की त्याने अधोगतीचा मार्ग पत्करला, असाच प्रश्न आपल्याला पडावा. असे बोलू शकण्याचे बौद्धिक धाडस जे करतात त्यांना ज्ञानी म्हणत नाहीत. साध्या भाषेत त्यांना अडाणी म्हणतात. अशी अडाणी माणसे केंद्रीय मंत्रिमंडळात वा राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावर नेमणाºया पक्षांना व त्यांच्या पुढाºयांना मग काय म्हणायचे असते? या माणसांच्या हाती देशाची व राज्यांची सूत्रे राहत असतील आणि तरीही देश व राज्ये काम करीत असतील तर मग त्यांना व आपल्याला खरोखरीच देव तारत असला पाहिजे, असेच म्हणावे लागते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणी