शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अकबर यांची गच्छंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:54 IST

अकबर यांच्यासोबत भाजपा व मोदी सरकारचीही बदनामी झाली आहे. अकबर यांना पदावरून हटवावे, असे मनोमन वाटणाऱ्या मंत्रिमंडळातील सुषमा स्वराज, मनेका गांधी व स्मृती इराणी या मंत्र्यांची एक स्त्री म्हणून मोठी कुचंबणा झाली.

एक डझनाहून अधिक महिलांकडून लैंगिक शोषण व गैरवर्तनाचे उघड आरोप केले गेलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी बुधवारी सायंकाळी अखेर राजीनामा दिला. विविध क्षेत्रांतील महिलांनी त्यांच्या गतआयुष्यात सहकारी पुरुषांकडून झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्याचे ‘मीटू’ चळवळीचे वादळ गेले महिनाभर भारतात घोंगावत आहे. या वादळाने घेतलेली अकबर ही पहिली मोठी ‘विकेट’ आहे. प्रिया रामाणी या पत्रकार महिलेने अकबर यांच्यावर ८ आॅक्टोबर रोजी सर्वप्रथम आरोप केले. त्यानंतर, आमच्याही बाबतीत असेच घडले होते, असे सांगत आणखी महिला पत्रकार पुढे आल्या. या सर्वजणी अकबर राजकारणात येण्याआधी ‘दि एशियन एज’ या वृत्तपत्राचे संपादक-मालक असताना त्यांच्यासोबत काम केलेल्या महिला आहेत. आरोपांना सुरुवात झाली, तेव्हा अकबर सरकारी दौºयावर नायजेरियाला गेले होते. वस्तुत: असे बदचारित्र्याचे आरोप झालेली व्यक्ती देशाचा मंत्री म्हणून परदेशात जाणे भारताचेही नाव खराब करणारे होते. त्यामुळे आरोप होताच, खरे तर पंतप्रधान मोदी यांनी अकबर यांना माघारी बोलावून घ्यायला हवे होते, पण उठसूठ ‘बेटी बचाओ’चा नारा देणाºया मोदींनी ते केले नाही. जनाची नाही, पण मनाची म्हणूनही अकबर स्वत:हूनही दौरा अर्धवट टाकून परत आले नाहीत. यामुळे अकबर आघाडीवर सरकार आणि भाजपाचे नेतृत्व आठवडाभर मूग गिळून गप्प बसले. शनिवारी अकबर दौºयावरून परत आले. आरोपांविषयी मी नंतर निवेदन जारी करीन असे सांगत ते विमानतळातून बाहेर पडले. बहुतेक ते राजीनाम्याचेच निवेदन काढतील, या शक्यतेने काही माध्यमांनी त्या दिवशी तशा बातम्याही दिल्या. संध्याकाळी अकबर महाशय निवेदन घेऊन आक्रमक पवित्र्यात जनतेसमोर आले. आपल्यावरील आरोपांचा इन्कार करूनच ते थांबले नाहीत, तर पहिली आरोपकर्ती प्रिया रामाणी हिच्यावर त्यांनी बदनामीचा फौजदारी खटलाही दाखल केला. आता राजीनामा देताना जे कारण दिले आहे, त्याने अकबर यांनी स्वत:ची आणखी नाचक्की करून घेतली आहे. अकबर म्हणतात की, माझ्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात व्यक्तिगत पातळीवर न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मी निवडला. त्यामुळे हे न्यायालयीन प्रकरण मंत्रिपदावर राहून न लढविता, व्यक्तिगत पातळीवर लढविणेच उचित होईल, असे वाटल्याने मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ही शुद्ध सारवासारव आहे. कारण हाच तात्त्विक बाणेदारपणा अकबर यांना या आधी शनिवारी आक्रमक भाषेतील निवेदन काढले, तेव्हाही घेता आला असता, परंतु अकबर यांना पदावर राहणे अशक्य झाले व यापुढे त्यांना पाठीशी घालत राहिले, तर अकबर हे लोढणे ठरतील, असा निष्कर्ष पक्ष आणि सराकारमधील श्रेष्ठींनी काढल्यानेच अकबर यांना पायउतार व्हावे लागले, हे स्पष्ट आहे. जे आधीच करायला हवे होते, ते न केल्याने विरोधकांवर नैतिक कुरघोडी करण्याची संधी भाजपाने गमावली आहे. एरवीही चार राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर समोर आलेले हे अकबर प्रकरण भाजपावर आलेली आपत्ती होतीच. होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी बोटचेपे धोरण स्वीकारल्याने व्यक्तिश: अकबर यांच्यासोबत भाजपा व मोदी सरकारचीही बदनामी झाली आहे. खरे तर अकबर यांचे हे प्रकरण त्यांच्या मंत्रिपदाशी संबंधित नसल्याने, पक्षाने त्यांना ‘तुमचे तुम्ही निस्तरा,’ असे स्पष्टपणे सांगून पहिल्याच दिवशी दूर करायला हवे होते, पण अकबर यांची पूर्वप्रतिष्ठा व ‘मुस्लीम चेहरा’ या जोरावर या वादळास सामोरे जाण्याचे चुकीचे गणित पक्षाच्या आणि सरकारच्या अंगाशी आले. अकबर यांनी फक्त एकीवर खटला दाखल केला असला, तरी तिच्या बाजूने साक्ष द्यायला व तशाच कटू अनुभवातून गेलेल्या आणखी २० महिला पत्रकार पुढे सरसावल्या आहेत. बदनामी खटल्यात सत्य हा प्रबळ बचाव असतो. त्यामुळे या खटल्यातील यश अकबर यांना वाटते तेवढे सुलभ नाही. एकूणच हे प्रकरण राजकारण आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांतील अधिकारपदावरील पुरुषांना झणझणीत अंजन घालणारे आहे. अकबर पदावरून गेल्याने आता चालणारा खटला तेवढा प्रकाशझोतात राहणार नाही, पण याने इतरांनी धडा घेतला, तरी तेही नसे थोडके.

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटू