शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

हवाईदल प्रमुखांचा इशारा

By admin | Updated: October 6, 2014 03:02 IST

भारतीय हवाईदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून, हवाईदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत

भारतीय हवाईदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून, हवाईदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणाऱ्या संकटला तोंड देणे अवघड होईल, असा इशारा हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी दिला आहे. भारतीय हवाईदलाची सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड चालू आहे. यापूर्वीच्या अनेक हवाईदल प्रमुखांनी लढाऊ विमानांच्या घटत्या संख्येकडे सरकारचे लक्ष वेधले होते, पण सरकारने ही खरेदी टाळण्याचा सतत प्रयत्न केला आहे. अडीच वर्षांपूर्वी भारताने हवाईदलातील कालबाह्य झालेल्या मिग-२१ या रशियन लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी जगातील सहा सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांच्या चाचण्या घेऊ न त्यातून फ्रेंच बनावटीच्या राफाल विमानांची निवड केली होती. पण, या विमानांच्या खरेदीत अजूनही प्रगती झाली नाही. अजूनही या विमानांच्या खरेदीसंबंधी प्राथमिक वाटाघाटीच चालू आहेत. मोदी यांचे सरकार आल्यानंतर आधीच्या सरकारचे निर्णय बदलण्याचा फटका या विमान खरेदीच्या निर्णयास बसतो की काय, अशी भीती वाटत होती; पण सुदैवाने तसे काही झाले नाही व अजूनही हीच विमाने खरेदी करण्याचा निर्णय कायम आहे. पण, आता या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. देशाच्या संरक्षण साहित्य खरेदीत एक प्रकारची सुस्ती आली आहे. ही सुस्ती विविध संरक्षण साहित्याच्या खरेदीत भ्रष्टाचाराची व दलाली देण्याची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे आली आहे. देशात सार्वत्रिक भ्रष्टाचार आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही. थ्रीजी, टुजी घोटाळा, कोळसा खाणवाटप घोटाळा आदी घोटाळ्यांनी तर भ्रष्टाचाराचे नागडे स्वरूप लोकांपुढे आणले आहे. त्यामुळे या क्षेत्रांचे आणि जनतेचे नुकसानही झाले आहे. संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचारामुळे हे तर घडलेच आहे, पण त्याहून धोकादायक आणि भीषण बाब ही आहे, की त्यामुळे देशाचे शत्रूराष्ट्राच्या हल्ल्यापासून करावे लागणारे संरक्षण धोक्यात आले आहे. पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध किती अस्थिर आहेत, हे भारतीयांना वेगळे सांगण्याची गरज नाही, तसेच कारगिलसारख्या आक्रमणामुळे त्या देशापासून किती सावध राहण्याची आवश्यकता आहे, हेही स्पष्ट झाले आहे. चीन बरोबरच्या संबंधात स्थैर्य असले, तरी हे स्थैर्य तकलादू आहे, हे अलीकडेच चीनच्या अध्यक्षांच्या भारतभेटीच्या वेळेस लडाख भागात झालेल्या चिनी सैन्याच्या घुसखोरीने सिद्ध झाले आहे. विशेषत: भारत-चीन सीमेलगतच्या हवाईपट्ट्यात भारताने विकसित करण्यास आणि त्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केल्यापासून चीन बिथरला आहे. त्या पार्श्वभूमीवर चिनी अध्यक्षांनी भारत दौरा आटोपताच चिनी सैन्याला छोट्या विभागीय युद्धासाठी तयार राहण्याच्या दिलेल्या सल्ल्याकडे पाहावे लागेल. या भागात आता १९६२ सारखी परिस्थिती राहिलेली नाही आणि भारतीय सैन्य चीनचा कडवा प्रतिकार करण्याच्या स्थितीत आहे, पण आता तेथे हवाईदलाला महत्त्वाची कामगिरी बजावावी लागणार आहे. त्यामुळे हवाईदलाचे तातडीने आधुनिकीकरण आवश्यक आहे. भारताच्या हवाईदलाकडे सर्वसाधारण परिस्थितीत लढाऊ विमानांच्या ४४ स्क्वॅड्रन्स असतात, पण आता ही संख्या ३४ वर आली आहे. त्यातच या ३४ स्क्वॅड्रन्समधील बहुतेक मिग-२१ व मिग-२७ जातीची विमाने पन्नास वर्षे जुनी व कालबाह्य झालेली आहेत. नवी विमाने मिळत नसल्यामुळे हवाईदलाला याच विमानांवर आपला युद्धसराव करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण अपघात होऊ न विमानचालकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे विमान खरेदीत सरकारकडून होणारी ही अक्षम्य हेळसांड आहे. भारताने १२६ राफेल विमानांच्या खरेदीस तातडीने अंतिम स्वरूप देऊ न काही तयार विमाने खरेदी करणे, तर काही फ्रेंच तंत्रज्ञान खरेदी करून भारतातच तयार करणे आवश्यक आहे. विमान खरेदीबरोबरच बोफोर्स तोफांची जागा घेणाऱ्या तोफांच्या खरेदीचाही प्रश्न असाच रखडला आहे. चीनबरोबरच्या पर्वतीय क्षेत्रात हलक्या वजनाच्या प्रभावी तोफांची गरज आहे, त्यांच्याही खरेदीला चालना देण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचारावर कायमचा उपाय काढून शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया सुलभ व कमी गुंतागुंतीची करणे गरजेचे आहे. परदेशातील खासगी कंपन्या शस्त्रविक्रीसाठी दलाल नेमतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात दलालांना टाळणे अवघड असते. त्यामुळे याबाबतच्या नियमात बदल करून संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला वेग देणे शक्य आहे काय, याची चाचपणी करणे आवश्यक आहे.