शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

हवाईदल प्रमुखांचा इशारा

By admin | Updated: October 6, 2014 03:02 IST

भारतीय हवाईदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून, हवाईदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत

भारतीय हवाईदलातील लढाऊ विमानांच्या संख्येने धोक्याची पातळी गाठली असून, हवाईदलात तातडीने नवी लढाऊ विमाने सामील केली नाहीत, तर चीन आणि पाकिस्तानकडून उद्भवणाऱ्या संकटला तोंड देणे अवघड होईल, असा इशारा हवाईदल प्रमुख एअरचिफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी दिला आहे. भारतीय हवाईदलाची सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड चालू आहे. यापूर्वीच्या अनेक हवाईदल प्रमुखांनी लढाऊ विमानांच्या घटत्या संख्येकडे सरकारचे लक्ष वेधले होते, पण सरकारने ही खरेदी टाळण्याचा सतत प्रयत्न केला आहे. अडीच वर्षांपूर्वी भारताने हवाईदलातील कालबाह्य झालेल्या मिग-२१ या रशियन लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी जगातील सहा सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांच्या चाचण्या घेऊ न त्यातून फ्रेंच बनावटीच्या राफाल विमानांची निवड केली होती. पण, या विमानांच्या खरेदीत अजूनही प्रगती झाली नाही. अजूनही या विमानांच्या खरेदीसंबंधी प्राथमिक वाटाघाटीच चालू आहेत. मोदी यांचे सरकार आल्यानंतर आधीच्या सरकारचे निर्णय बदलण्याचा फटका या विमान खरेदीच्या निर्णयास बसतो की काय, अशी भीती वाटत होती; पण सुदैवाने तसे काही झाले नाही व अजूनही हीच विमाने खरेदी करण्याचा निर्णय कायम आहे. पण, आता या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. देशाच्या संरक्षण साहित्य खरेदीत एक प्रकारची सुस्ती आली आहे. ही सुस्ती विविध संरक्षण साहित्याच्या खरेदीत भ्रष्टाचाराची व दलाली देण्याची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे आली आहे. देशात सार्वत्रिक भ्रष्टाचार आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही. थ्रीजी, टुजी घोटाळा, कोळसा खाणवाटप घोटाळा आदी घोटाळ्यांनी तर भ्रष्टाचाराचे नागडे स्वरूप लोकांपुढे आणले आहे. त्यामुळे या क्षेत्रांचे आणि जनतेचे नुकसानही झाले आहे. संरक्षण खरेदीतील भ्रष्टाचारामुळे हे तर घडलेच आहे, पण त्याहून धोकादायक आणि भीषण बाब ही आहे, की त्यामुळे देशाचे शत्रूराष्ट्राच्या हल्ल्यापासून करावे लागणारे संरक्षण धोक्यात आले आहे. पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध किती अस्थिर आहेत, हे भारतीयांना वेगळे सांगण्याची गरज नाही, तसेच कारगिलसारख्या आक्रमणामुळे त्या देशापासून किती सावध राहण्याची आवश्यकता आहे, हेही स्पष्ट झाले आहे. चीन बरोबरच्या संबंधात स्थैर्य असले, तरी हे स्थैर्य तकलादू आहे, हे अलीकडेच चीनच्या अध्यक्षांच्या भारतभेटीच्या वेळेस लडाख भागात झालेल्या चिनी सैन्याच्या घुसखोरीने सिद्ध झाले आहे. विशेषत: भारत-चीन सीमेलगतच्या हवाईपट्ट्यात भारताने विकसित करण्यास आणि त्या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केल्यापासून चीन बिथरला आहे. त्या पार्श्वभूमीवर चिनी अध्यक्षांनी भारत दौरा आटोपताच चिनी सैन्याला छोट्या विभागीय युद्धासाठी तयार राहण्याच्या दिलेल्या सल्ल्याकडे पाहावे लागेल. या भागात आता १९६२ सारखी परिस्थिती राहिलेली नाही आणि भारतीय सैन्य चीनचा कडवा प्रतिकार करण्याच्या स्थितीत आहे, पण आता तेथे हवाईदलाला महत्त्वाची कामगिरी बजावावी लागणार आहे. त्यामुळे हवाईदलाचे तातडीने आधुनिकीकरण आवश्यक आहे. भारताच्या हवाईदलाकडे सर्वसाधारण परिस्थितीत लढाऊ विमानांच्या ४४ स्क्वॅड्रन्स असतात, पण आता ही संख्या ३४ वर आली आहे. त्यातच या ३४ स्क्वॅड्रन्समधील बहुतेक मिग-२१ व मिग-२७ जातीची विमाने पन्नास वर्षे जुनी व कालबाह्य झालेली आहेत. नवी विमाने मिळत नसल्यामुळे हवाईदलाला याच विमानांवर आपला युद्धसराव करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण अपघात होऊ न विमानचालकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे विमान खरेदीत सरकारकडून होणारी ही अक्षम्य हेळसांड आहे. भारताने १२६ राफेल विमानांच्या खरेदीस तातडीने अंतिम स्वरूप देऊ न काही तयार विमाने खरेदी करणे, तर काही फ्रेंच तंत्रज्ञान खरेदी करून भारतातच तयार करणे आवश्यक आहे. विमान खरेदीबरोबरच बोफोर्स तोफांची जागा घेणाऱ्या तोफांच्या खरेदीचाही प्रश्न असाच रखडला आहे. चीनबरोबरच्या पर्वतीय क्षेत्रात हलक्या वजनाच्या प्रभावी तोफांची गरज आहे, त्यांच्याही खरेदीला चालना देण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचारावर कायमचा उपाय काढून शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया सुलभ व कमी गुंतागुंतीची करणे गरजेचे आहे. परदेशातील खासगी कंपन्या शस्त्रविक्रीसाठी दलाल नेमतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात दलालांना टाळणे अवघड असते. त्यामुळे याबाबतच्या नियमात बदल करून संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला वेग देणे शक्य आहे काय, याची चाचपणी करणे आवश्यक आहे.