शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

अहिंसेचा जागर नवरात्रोत्सवाचे मंगल पर्व ख-या अर्थाने शक्तिदायी करेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:57 IST

लोकांच्या आहार पद्धतीबाबत भारतीय घटनेने स्वातंत्र्य दिलेले आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; पण त्याला धार्मिकतेची जोड देऊन पशुबळीसारख्या पद्धतीचे समर्थन केले जाते ते अनाकलनीय, अविवेकी आणि गैर आहे.

विजय बाविस्कर।लोकांच्या आहार पद्धतीबाबत भारतीय घटनेने स्वातंत्र्य दिलेले आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; पण त्याला धार्मिकतेची जोड देऊन पशुबळीसारख्या पद्धतीचे समर्थन केले जाते ते अनाकलनीय, अविवेकी आणि गैर आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अनेक देवस्थानांनी स्वत:हून ही पद्धत बंद केली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी चळवळ उभारली. मात्र, अजूनही ही अनिष्ट प्रथा सुरू असणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणा-या समाजासाठी निश्चितच भूषणावह नाही.नवरात्राचा उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. आदिमायेची आराधना. परंतु याच नवरात्राला काही लोक पशुबळीसारख्या अमानवी प्रथेशी जोडून त्याचे मांगल्य भंग करीत आहेत. शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवस्थानाने यावेळी पशुबळी न देण्याचा स्वागतार्ह, अभिनंदनीय निर्णय घेतला आहे. सर्वच देवस्थानांनी या निर्णयाचे अनुकरण करण्याची गरज आहे. अजबली प्रथेच्या विरोधात सामाजिक आणि न्यायालयीन लढाई लढणारे डॉ. गंगवाल म्हणतात, की नवरात्रात खंडेनवमीच्या दिवशी अजबली देण्याची प्रथा आहे. मात्र, या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. त्यामुळे पशुबळी बंद करण्यासाठी कायदाच करण्याची गरज आहे. वैद्यकीय आणि वाहतुकीच्या सुविधा नसताना आजारातून आराम पडावा, यासाठी ग्रामदेवतेला नवस बोलण्याची पद्धत होती. प्रत्येक गावात ग्रामदेवतेची पूजा केल्यावर गावाचे संरक्षण होते, असा समज आहे. पशुबळी यातीलच एक दुष्ट रूढी. बळीचा नैवेद्य देवाला, काही भाग पुजा-याला आणि अन्य भाग कुटुंब व नातेवाइकांसाठी मेजवानी ठरते. नवसपूर्तीच्या नावाखाली अमानुष पद्धतीने हजारो पशूंचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या रक्त-मांसामुळे अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते. पिढ्यान् पिढ्या सुरू असलेल्या या रूढींविरोधात अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. संत गाडगेबाबांसारख्या समाजसुधारकांनी यावर कोरडे ओढले. ‘सावकाराकडून कर्ज काढून पशुबळी देऊन कोणती मन:शांती मिळणार आहे’, असा सवाल विचारवंत करतात. कोणत्याही संताने कधीही पशुबळीचे समर्थन केले नाही; उलट भागवतधर्माची पताका फडकवत संतांनी गावेच्या गावे माळकरी म्हणजेच शाकाहारी केली. धार्मिक आणि सांस्कृतिक रूप देऊन यात्रा सुरू झाल्या. त्यातील जेवणावळींतून सामाजिक प्रतिष्ठा मोजली जाऊ लागली. वाईजवळील मांढरदेवीच्या यात्रेत हजारो बळी दिले जायचे. यातूनच २००५मध्ये यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३५०हून अधिक बळी गेले. त्यानंतर मांढरदेवी देवस्थानाने पशुबळीवर बंदी घातली. डॉ. कल्याण गंगवाल यांना काही जण प्रश्न विचारतात, की केवळ हिंदू धर्माच्या प्रथांवर का बोलता? याला त्यांचे उत्तरही अत्यंत समर्पक आहे. ‘‘धर्माचा प्रश्नच नाही़ प्रत्येक धर्मात अहिंसा सांगितली आहे़ यंदा मुस्लीम धर्मातील ४२ कुटुंबांनी बकरी ईदच्या दिवशी पशुबळी दिला नाही़ त्यांनी स्वत:च्या मनाने हा निर्णय घेतला आहे़’’ गंगवालांची ही चळवळ यशस्वी झाली तर ख-या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार होईल आणि समाजाचे कल्याण होईल. अहिंसेचा हा जागर नवरात्राचे पर्व अधिक शक्तिदायी करेल.