शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

कृषिआधारित साखर उद्योगाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:24 IST

महाराष्ट्राचा एक प्रमुख कृषिआधारित उद्योग असलेल्या साखर उद्योगाची जाम कोंडी झाली आहे. शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.

महाराष्ट्राचा एक प्रमुख कृषिआधारित उद्योग असलेल्या साखर उद्योगाची जाम कोंडी झाली आहे. शेतकरी आणि साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी ढिम्म सरकार जागे व्हायला तयार नाही, एक प्रकारची बेबंदशाही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यालाच पोषक भूमिका सरकार घेत आहे. गेल्या २० आॅक्टोबरपासून राज्यातील ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला. डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील ९९ सहकारी आणि ८५ खासगी साखर कारखान्यांनी ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप करून ४१ लाख१६ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. ही सर्व साखर मागणीऐवजी गोदामात पडून आहे. उसाचे पैसे देण्यासाठी साखर कारखान्यांकडे पैसे नसल्याने, अनेक जिल्ह्यांत गळीत झालेल्या उसाचा पहिला हप्ताही देण्यात आलेला नाही. वास्तविक, कायद्यानुसार गाळप झालेल्या उसाचे पैसे चौदा दिवसांनंतर त्वरित देणे बंधनकारक आहे. कोल्हापूर, सांगलीसह काही जिल्ह्यांत एक पैसाही देण्यात आलेला नाही. साखरेचा सध्या विक्रीचा दर सरकारने २,९०० रुपये क्विंटल निश्चित केला आहे. त्याच्या आसपास बाजारपेठेत दर मिळतो आहे. मात्र, उत्पादन खर्चावर आधारित केंद्र सरकारने उसाचा वाजवी आणि किफायतशीर दर दहा साखर उताऱ्याला २,७५० रुपये प्रतिक्व्ािंटल निश्चित केला आहे. तो एकरकमी देण्याचेही बंधन साखर कारखानदारांवर आहे. मात्र, साखर कारखान्यांना अर्थपुरवठा करणाºया बँका बाजारभावानुसार केवळ २,५५० रुपयांची उचल देतात. त्यातून उत्पादन खर्च आणि बँकेची देणी वजा करता, केवळ १,८०० रुपये प्रतिक्विंटलच अर्थपुरवठा केला जातो. साखरेचे दर जेमतेम २,९०० रुपयांपर्यंत, बँकांची उचल केवळ २,५५० रुपये प्रतिक्विंटल आणि उत्पादन खर्च, तसेच बँकांची देणी ७५० रुपये वजा केल्यानंतर वाजवी किंमत २,७५० शेतकºयांना देणार कशी? खरे तर, साखर उद्योगाद्वारे शेतमालाला (उसाला) हक्काची बाजारपेठ आणि किमान आधारभूत हमीभाव देण्याची व्यवस्था झाली होती. या सर्वाला सध्याच्या अर्थकारणाने छेद गेला आहे. सरकारने साखरेचा किमान दर २,९०० रुपये प्रतिक्विंटलऐवजी ३,४०० ते ३,५०० रुपये करायला हवा आहे. हा दर वाढविल्यास किरकोळ साखरेचा बाजारातील दर किलोस ४० रुपये होऊ शकतो. इतर सर्व वाढलेले भाव पाहता सध्याची भाववाढ, तसेच चलनवाढीचा वेग पाहता, साखरेचा दर चाळीस रुपये प्रतिकिलो होण्यास काहीच हरकत नाही. वास्तविक, थेट साखर घेऊन खाण्याचे प्रमाण कमी आहे. देशात उत्पादित होणाºया साखरेपैकी केवळ ३५ टक्केच साखर ग्राहक थेट खरेदी करून खातो आहे. उर्वरित साखर पेये किंवा मिठाई तयार करण्यासाठी वापरली जाते. ही पेये किंवा मिठाई जीवनावश्यक बाब नाही. साखर उत्पादनासाठी ऊस उत्पादनाची गरज आहे. त्याचा उत्पादन खर्च वाढत असताना, साखरेचे दर कमी होणे मारक आहे. परिणामी, साखर कारखान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे आणि किमान आधारभूत किंमत शेतकºयांना देणारी व्यवस्थाच संपुष्टात येऊ शकते. जेव्हा-जेव्हा असा बाका प्रसंग साखर उद्योगावर, तसेच परिणामी शेतकºयांपुढे उभा राहिला, तेव्हा राज्य, तसेच केंद्र सरकारने योग्य पावले उचलून मदत केली आहे. आताचे सरकार याबाबत काही करायला तयार नाही. साखर कारखाने आणि शेतकºयांच्या प्रतिनिधींनी गेल्या आॅगस्टपासून साखरेचे दर घसरत असताना या संकटाची दखल घ्या, अशी विनंती केली होती. मात्र, सरकार सुस्तपणे पाहत बसले आहे. ऊसकरी शेतकरी संकटात येत असेल, तर राज्य सरकारची तिजोरी मोकळी करून मदत दिली जाईल, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे शेतकºयांच्या सभेत बोलताना केली होती, तसेच साखरेचा दर वाढवून देण्यास भाग पाडू, असेही सांगितले होते. यातील एकही गर्जना प्रत्यक्षात उतरली नाही. महाराष्ट्रातील एकमेव संघटित, शेतकºयांना किमान हमीभाव देणारा साखर उद्योग संकटात येत असताना, सरकार तोंडावर बोट ठेवून बसले आहे. साखर हंगाम ऐंशी दिवस झाले अद्याप एकही पैसा शेतकºयांना मिळालेला नाही. यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून साखर उद्योगाची सुटका केली नाही, तर न भरून येणारी हानी आपण करतो आहोत, हे सरकारला ठणकावून सांगायला हवे!

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने