शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जातगणना : मॅजिक की मंडल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 05:39 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा कसा शिकविला जातो, याकडे देशाचे लक्ष लागले असताना बुधवारी केंद्र सरकारने वेगळाच धक्का दिला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा कसा शिकविला जातो, याकडे देशाचे लक्ष लागले असताना बुधवारी केंद्र सरकारने वेगळाच धक्का दिला. कित्येक दशकांपासून समाज संघटना जिची मागणी करीत होत्या आणि काँग्रेस तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोहीम राबविलेली जातगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. साहजिकच राहुल गांधींनी ताबडतोब निर्णयाचे स्वागत केले. जातगणना लवकरात लवकर करा हे सांगताना पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. हे असे धक्कातंत्र केंद्र सरकारने बिहार विधानसभेच्या तोंडावर विरोधकांच्या हातून एक प्रमुख मुद्दा काढून घेण्यासाठी वापरले की आणखी काही कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. आदल्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीशीदेखील या निर्णयाचा संबंध जोडला जातोय. आता चार वर्षांपासून रखडलेली देशाची दशवार्षिक जनगणना जेव्हा केव्हा होईल तेव्हा तिच्या प्रपत्रांमध्ये जातीचाही स्तंभ असेल आणि जाती-पोटजातीचे तपशील प्रगणक भरून घेतील.

"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 

 जवळपास शंभर वर्षांनंतर, १९३१ नंतर प्रथमच देशात अशी जातनिहाय गणना होईल. थोडक्यात हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि त्याचे बरे-वाईट परिणामही ऐतिहासिकच असतील. जातगणनेच्या रूपाने नानाविध शक्याशक्यतांचा एक पेटाराच जणू केंद्र सरकार उघडू पाहत आहे. देशातील सामाजिक, राजकीय आरक्षणाचा त्याच्याशी जवळचा संबंध आहे. ढोबळमानाने देशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या घटनादत्त आरक्षणाशिवाय मंडल आयोगाच्या अहवालानुसार लागू झालेले इतर मागासवर्गीयांचे आरक्षण, सध्याच्या भाजप सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणलेले ईडब्ल्यूएस आरक्षण प्रमुख आहे. जातगणनेमधून जी आकडेवारी बाहेर येईल तिचा एससी, एसटी व ईडब्ल्यूएस या आरक्षणांवर फारसा परिणाम संभवत नाही. उरते ते ओबीसी आरक्षण आणि विविध राज्यांमधून होणारी आरक्षणाची मागणी. पूर्वापार स्वत:ला क्षत्रीय म्हणविल्या जाणाऱ्या समाजाकडून होणारी आरक्षणाची मागणी आणि ते सामावून घेण्यासाठी पन्नास टक्के मर्यादा हटविण्याच्या आग्रहाने राजकीय लढाईचे स्वरूप धारण केले आहे. देशात हजारो जाती व पोटजाती असल्या तरी सर्वाधिक जाती ओबीसी प्रवर्गांमध्येच आहेत आणि अनेक जातींनी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक आरक्षण घेतल्याची तक्रार आहे. जातगणनेची मागणीदेखील त्यातूनच समोर आली. जातगणनेतून जी नवी आकडेवारी बाहेर येईल तिच्यामुळे ओबीसी आरक्षणाची फेरमांडणी होईल. त्यातून पुन्हा नव्या तक्रारी, राजी-नाराजी सुरू होईल. मोरारजी देसाई सरकारने १९७९ मध्ये गठित केलेल्या मंडल आयोगाच्या अहवालानंतर देशात जी सामाजिक, राजकीय उलथापालथ झाली, तसेच काहीसे जातगणनेनंतर होईल. थोडक्यात, देशाच्या राजकारणातील ही दुसरी ‘मंडल-मोमेंट’ आहे आणि उल्लेखनीय म्हणजे ज्यांनी मंडलविरोधात कमंडलचा प्रयोग राबविला, त्यांच्याच हातून या दुसऱ्या क्षणाची पायाभरणी झाली आहे.

 जातगणनेमुळे कोणत्या जातीची लोकसंख्या किती आणि त्यांचा राष्ट्रीय संसाधनांमध्ये, शिक्षण-नोकऱ्यांमध्ये वाटा किती हे कळून जाईल. अनेक समज-गैरसमज गळून पडतील हे ठीक. तथापि, लोकशाहीत अंतिमत: डोकीच महत्त्वाची असतात. ‘एक व्यक्ती, एक मत’ या सूत्रामागील ‘एक मत, एक मूल्य’ हे तत्त्व व खरा अर्थ निवडणुकीच्या राजकारणात टिकत नाही. तेव्हा, ‘जितकी ज्यांची संख्या भारी, तितकी त्यांची भागीदारी’ वगैरे सुविचारासह जातगणनेतून सारे चांगलेच बाहेर पडेल, असे नाही. देशाचे राजकारण त्या आकड्यांमधून कोणते डावपेच, क्लृप्त्या शोधते, हे पाहावे लागेल. यात आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून तयार झालेली जातव्यवस्था हे सामाजिक वैशिष्ट्य असलेल्या भारतात जातींबद्दल चर्चा वाढली की, धर्मांची चर्चा कमी होते. धार्मिक द्वेषाचा जाे अतिरेक सध्या सुरू आहे तो पाहता ही जातींवरील चर्चा वाढणे कोणाला बरेही वाटू शकते. त्यामुळे बहुसंख्याकवादाची धार कमी होईल, अल्पसंख्याकांना मिळणारी दुय्यम वागणूक थांबेल, असा आशावाद जातीवर अधिक चर्चेमागे कदाचित असेल. तथापि, वाद किंवा द्वेष धर्माचा असो, जातींचा असो, भाषावाद असो की प्रांतवाद; कोणताही वाद व द्वेष वाईटच. जातगणनेचा जादुई पेटारा उघडताना एवढे भान ठेवले तरी पुरेसे आहे.