शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 06:59 IST

वगळलेली सगळी नावे दोन दिवसांत जाहीर करा, अशी तंबी गेल्या १४ ऑगस्टला दिली. तरीही आयोग आडमुठेपणा सोडत नाही. त्यासाठी शक्य ते सारे फंडे वापरले जात आहेत.

भारताचे निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त शहाबुद्दीन कुरेशी यांनी परवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या व्होटचोरीच्या आरोपाबद्दल वडीलकीच्या नात्याने सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार व आयोगाला खडे बोल सुनावले की, गांधींना असभ्य भाषेत प्रत्युत्तर देण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चाैकशी करायला हवी होती. आयोगाला हा घरचा आहेर होता. कारण, काहीही कारण असो याचवेळी आयोगाने थेट सर्वोच्च न्यायालयाशीही पंगा घेतला. त्याचे निमित्त आहे, बिहारमध्ये सुरू असलेली मतदार यादीची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे एसआयआर अर्थात विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रिया. दि. २२ नोव्हेंबरपूर्वी नवी बिहार विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने अवघ्या तीन महिन्यांत ही किचकट, वेळखाऊ प्रक्रिया कशी पूर्ण होणार याचा विचार न करता आयोगाने जुलै महिन्यात ते काम सुरू केले. मतदारांच्या नोंदी करणाऱ्या बीएलओ मंडळींनी जणू बाजार मांडला. मनमानी करून नावे वगळली. अंदाजे सव्वासात कोटींपैकी तब्बल ६५ लाख नावे गायब झाली. हजारो, लाखो जिवंत मतदार मृत दाखविण्यात आले, असे काही ‘मृत’ मतदार थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कारण, निवडणूक आयोग आधार कार्ड हा रहिवासी म्हणून पुरावा मान्य करायला तयार नाही. त्यासाठी न्यायालयाने वारंवार निर्देश दिले.

  वगळलेली सगळी नावे दोन दिवसांत जाहीर करा, अशी तंबी गेल्या १४ ऑगस्टला दिली. तरीही आयोग आडमुठेपणा सोडत नाही. त्यासाठी शक्य ते सारे फंडे वापरले जात आहेत. अश्विनी उपाध्याय नावाचे वकील काल, सोमवारी आयोगाच्या मदतीला धावले. ‘आजकाल कोणीही बनावट आधार कार्ड काढते आणि हजारो रोहिंग्या व बांगला देशी भारतात घुसले असल्याने आधार कार्ड पुरावा समजायला नको’, असा आयोगाच्या भूमिकेला बळ देणारा अर्ज केला. तेव्हा, न्या. सूर्यकांत व न्या. जाॅयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने, ‘रेशन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सदेखील बनावट असू शकते’, असे सांगून बोलती बंद केली. तिकडे बिहारमध्ये नव्या मतदार यादीच्या प्रक्रियेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. नवा गोंधळ म्हणजे, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर नावाची नोंदणी किंवा वगळण्यासाठी जवळपास चार लाख अर्ज आले आणि नाव नोंदवू इच्छिणारे केवळ २७ टक्के लोक १८ ते २० या वयोगटातील आहेत. याउलट इतर हजारो मतदार प्राैढ, काहीजण तर शंभरी गाठलेले, ओलांडलेले आहेत. ५८ टक्के लोकांनी नाव वगळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी शेकडो जणांनी आपण भारताचे नागरिकच नसल्याचे म्हटले आहे. शेकडो अर्ज मृत मतदारांच्या वतीने करण्यात आले आहेत. पण, मुळात आयोगाला कोणतीही चूक मान्य नाही. बिहारची पुनरीक्षण प्रक्रिया हास्यास्पद ठरत असताना उद्धटपणे तीच प्रक्रिया देशभर राबविण्याची घोषणा आयोगाने केली. आयोग सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला व्होटचोरीसाठी मदत करीत असल्याचा विरोधकांचा आरोप पुरेशा गंभीरतेने घेतला नाही. उलट, जे काही म्हणायचे ते विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिज्ञापत्रावर सांगावे, अशी उद्दाम सूचना करण्यात आली. 

   आपणही घटनात्मक व स्वायत्त संस्था असल्याचा दुराभिमान बाळगताना निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयालाही जुमानेसा झाला आहे. मतदार यादी अद्ययावत करणे हा आपला घटनादत्त अधिकार आहे आणि त्यासंदर्भात वारंवार निर्देश दिल्याने त्या अधिकारात अधिक्षेप होतो, असा युक्तिवाद करण्यापर्यंत आयोगाची मनमानी पोहोचली आहे. म्हणूनच आता न्यायालयाने आयोगाला विचित्र कोलदांडा घातला आहे. मतदार यादीची विशेष पडताळणी मोहीम कधी संपणार, अंतिम मतदार यादी कधी प्रकाशित होणार, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. येत्या ७ ऑक्टोबरला याप्रकरणी सुनावणी घेऊ आणि मतदारयादीत काही गोंधळ दिसून आला तर पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करू, अशी तंबी न्यायालयाने आयोगाला दिली आहे.  या खटल्याचा निकाल संपूर्ण देशाला लागू असेल, असेदेखील न्यायालयाने बजावले आहे. बिहारसंबंधाने निवडणूक आयोग जे काही करेल, त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या या तंबीची आणि संभाव्य निकालाची तलवार टांगती राहील. पुनरीक्षण प्रक्रिया रद्द झाली तर बिहार निवडणूक ठरल्यावेळी होऊ शकणार नाही. तिथे राष्ट्रपती राजवट लावावी लागेल आणि ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग