शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्कोअर काय झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:17 IST

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल.

आजपासून दीड महिना भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेट हा जगण्या-मरण्याचा विषय ठरेल. 'स्कोअर काय झाला?, या प्रश्नानं लोकांच्या भुवया उंचावतील, ते हसतील, चिडतील, कचाकचा भांडतील, सोशल मीडियात कमेण्ट, मीम्सचा पाऊस पडेल, आशा-निराशेचा खेळ श्वास कंठाशी आणेल तरीही त्यापलीकडे असेल रसरसून जगण्याचा एक आनंद! रोजच्या जगण्यातल्या विवंचनांनी छळलेल्या आणि जगण्याचे कुठलेच आनंद निरलस, सहज आणि नितळ उरलेले नसताना 'क्रिकेट' नावाचा एक जादूगर खेळ सगळ्या ताणतणावांच्या जखमांवर औषध म्हणून फुंकर मारेल. ते पुरेसं नसेलही; पण काही क्षण तरी 'बरं वाटल्याचा' आनंद मिळेल. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात-पात, पंथ, धर्म, राजकीय विचारधारांनी पोखरून पुरते विकल आणि विफल केलेल्या दुफळी माजलेल्या समाजात किमान दीड महिना तरी एकच ओळख घेऊन बहुतांश माणसं जगतील. 'भारतीय ही ओळख सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याची जादू पुन्हा एकदा क्रिकेट करूनही दाखवेल. 

अर्थात हारजीतीचे प्रश्न असतील. गेल्या १० वर्षात भारतीय संघाने एकही आयसीसी किताब जिंकलेला नाही. आयपीएलमध्ये उदंड पैसा कमावणाऱ्या भारतीय संघात आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या पोटातही जिंकण्याची आग उरलेली नाही, असे आरोप तर सर्रास होतात. त्याचे कारण म्हणजे मागचा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला त्याला आता तप उलटून गेलेलं आहे. त्या संघात खेळलेले फक्त दोन खेळाडू यावेळच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत आहेत. संघनिवड आणि संघभावनेसह कप्तानाचे उत्तम नेतृत्व याविषयीही शंका, संशयाचे मळभ विश्वचषक स्पर्धा सुरू होतानाही हटलेले नाही. या स्पर्धेत तरी भारतीय संघाने 'करू या मरू' सामन्यात हाराकिरी न करता आपल्या क्षमतेला न्याय देत खेळावं आणि घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी अपेक्षा आहेच. परंपरेनुसार (गेल्या टी ट्रेण्टी विश्वचषकात ती परंपराही मोडलीच म्हणा) केवळ पाकिस्तान संघाला विश्वचषकात हरवणे आणि त्या आनंदाचं विद्रूप प्रदर्शन करणं, सामन्यांना वैर आणि युद्धाचं रूप देणं हे सारं या स्पर्धेत तरी मागे पडावं, अशी अपेक्षा आहे. अर्थात तसं होणार नाही. आक्रमक मार्केटिंगच्या या काळात नकारात्मकता जास्त विकली जात असताना सकारात्मकतेचे दिवे मिणमिणतच उजळणार हे वास्तव आहे; पण ते दिवे किमान तेवते राहतील आणि सभ्य माणसांचा खेळ म्हणून क्रिकेट आपली पत राखेल, असं वाटावं इतपत कस अजूनही क्रिकेटने टिकवून ठेवला आहे.

एकीकडे क्रिकेटची बाजारपेठ मोठी होते आहे, प्रक्षेपणाचे हक्क आणि स्पॉन्सर्स यांच्याभोवती फिरणारा पैसा काही कोटी रुपयांच्या अव्याढव्य उलाढाली होत फिरतो. क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर त्यानं मनोरंजनाची जागाही कधीच घेतली. धनसत्तेपुढे सर्वत्रच लोटांगणं घातली जात असताना क्रिकेटही त्यापासून दूर नाही; पण अजूनही एकदा सामना सुरू झाला की क्रिकेट पुन्हा पुन्हा आपल्या ग्लोरियस अनसर्टन्टी'ची झलक दाखवते. मैदानात पडलेला प्रत्येक चेंडू आपली कहाणी घेऊन येतो. तिथे भाइभतिजा राजकारण चालत नाही, अमक्यातमक्याचा मुलगा म्हणून भारतीय संघात वट कमावता येत नाही. क्रिकेटभोवती भारतीय उपखंडातलं राजकारण फिरू शकतं, आशिया चषकाच्यावेळी ते जाहीर दिसलंही. खेळाच्या मैदानावर एकच गोष्ट खरी ठरते ती म्हणजे गुणवत्ता आणि मेहनत. क्रिकेटने खऱ्या अर्थाने देशातल्या लोकशाहीकरणाला वेग दिला. एकेकाळी क्रिकेट हा राजारजवाड्यांचा खेळ होता, नंतर तो केवळ मोठ्या शहरात रुजला, वाढला. मात्र, जागतिकीकरणाची दारं देशानं उघडली, दूरचित्रवाणी देशभर पोहोचली, तसतसे क्रिकेट छोट्या शहरात पाझरू लागले आणि मूळही धरू लागले. रांचीचा धोनी भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार झाला आणि आजच्या संघात देशाच्या लहान शहरातले खेळाडू दिसतात. त्यांनी क्रिकेटला बेधडक आणि बिनधास्त रंगरूप दिले. आपली गुणवत्ता हीच आपली ताकद आणि तीच आपली ओळख हे त्यांनी सिद्ध केलं आहे. गुणवत्ता असली तर आपण मोठी स्वप्नं पाहू शकतो आणि मेहनतीची तयारी असेल तर ती साकारूही शकतो, यावर विश्वास ठेवण्याची ताकद आजच्या भारतीय तारुण्याला देण्याचं काम क्रिकेट करतं आहे. पुढचा दीड महिना क्रिकेटचा हा जलसा चांगुलपणावरचा विश्वास वाढवेल, अशी आशा आहेच. सोबतच भारतीय संघाने नव्हे, 'भारताने ' चषक जिंकावा, ही सव्वाशे कोटी भारतीयांची इच्छाही फलद्रूप होवो!