शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विनोद रॉयची पश्चातबुद्धी

By admin | Updated: September 15, 2014 04:47 IST

विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला

भारताचे माजी महाअंकपरीक्षक (कॅग) विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला आहे. याअगोदर त्यांनी लिहिलेल्या आपल्या पुस्तकातही डॉ. सिंग यांना त्यांनी आपला निशाणा बनवले आहे. या आरोपाला उत्तर देण्यास डॉ. मनमोहनसिंग हे स्वत: समर्थ आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांपैकी एकानेही त्यांच्यावर असा ठपका ठेवला नाही. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आजवर दोष दिला गेला असला, तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे धाडस कुणी केले नाही. विनोद रॉय यांचा डॉ. सिंग यांच्यावरचा आकस याआधी अनेकदा प्रगट झाला आहे. देशाच्या महाअंकपरीक्षकाचे पद हे सर्वोच्च न्यायालयासारखेच स्वतंत्र व सरकारच्या नियंत्रणांपासून मुक्त असते. या परीक्षकाने सरकारच्या हिशेबांची केलेली तपासणी संसदेच्या लोकलेखा समितीला सादर करणे एवढीच त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदावर असतानाही विनोद रॉय यांना ते करता येणे शक्य होते. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद नेहमी विरोधी पक्षाकडे असते. त्या पक्षाने तशा अहवालाचे आनंदाने स्वागतही केले असते. मात्र, पदावर असताना ती जबाबदारी पार न पाडता निवृत्तीनंतर विनोद रॉय यांना सार्वजनिक स्वच्छतेचा उमाळा येत असेल, तर त्याकडे संशयाने पाहिले पाहिजे. डॉ. मनमोहनसिंग हे गेल्या ५० वर्षांपासून देशाच्या प्रशासनात व राजकारणात आहेत. एक अत्यंत सचोटीचे प्रशासनाधिकारी, मंत्री व पंतप्रधान अशी त्यांची आजवरची ख्याती आहे. याउलट विनोद रॉय हे महाअंकपरीक्षकाच्या जागेवर येईपर्यंत त्यांच्या नावाची या देशाला साधी खबरबातही कधी नव्हती. आपल्याला पदामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा आपल्या सोयीनुसार व लहरीनुसार वापर करण्याची बुद्धी झालेले अनेक लोक याआधी देशाने पाहिले आहेत. पदे गेली, राजकारण हातचे सुटले आणि जुनी सरकारे जाऊन नवी सरकारे पदावर आली, की अशा माणसांना जास्तीचा कंठ व जास्तीचे ज्ञान स्फुरत असते. माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंग यांना अशाच उत्साहाने ग्रासले आहे. ह्यवन लाईफ इज नॉट इनफह्ण या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर मनसोक्त दुगाण्या झाडल्या आहेत. नटवरसिंगांचे मंत्रिपद शाबूत होते तोवर त्यांना या दोघांतही कोणता दोष दिसला नाही. ह्यआॅईल फॉर फूडह्ण या घोटाळ््यात नाव अडकल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले तेव्हापासून ते त्या दोघांवर राग धरून आहेत आणि तो त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून उघडही केला आहे. हे करीत असतानाच त्यांनी आणखीही एका सोयीस्कर गोष्टीची व्यवस्था केली आहे. आपल्या मुलासाठी भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे तिकीट मिळविले आहे. राजकीय सोय करून झाल्यानंतर किंवा तशा सोयीवर लक्ष ठेवून नटवरसिंगांसारखी माणसे जेव्हा वागतात तेव्हा संशयाची सुई त्यांच्यावरच रोखली जाणे साहजिक बनते. विनोद रॉय यांचा आताचा उद्रेकही असाच आहे. मनमोहनसिंगांचे सरकार गेली दोन वर्षे सर्वतऱ्हेच्या टीकेला तोंड देत आले आहे. जोवर ते मजबूत व स्थिर होते तोवर विनोद रॉय गप्प होते. ते सरकार अस्थिर व दुबळे झाल्याचे दिसले तेव्हा त्यांना वाचा फुटली. महाभियोगाचा आधार घेतल्याखेरीज आपल्याला आपल्या पदावरून काढून टाकता येत नाही, याची खात्री असल्यानेच त्यांना सरकारवर राजकीय स्वरूपाची टीका करण्याचे धाडस झाले. त्यातून मिळणारी प्रसिद्धी त्यांच्याविषयीची आस्था विरोधी पक्षात निर्माण करायला कारणही झाली. विनोद रॉय यांचे प्रत्येक वक्तव्य मनमोहनसिंगांच्या विरोधकांनी ज्या तऱ्हेने उचलून धरण्याचे प्रयत्न आता चालविले आहेत ते याच तऱ्हेचे आहेत. टू जी घोटाळा आणि कोळशाचा घोळ याविषयीचे निर्णय संबंधित मंत्रालये घेत असताना मनमोहनसिंगांनी पंतप्रधान या नात्याने त्यांना अडवायला हवे होते, असा कमालीचा साळसूद वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय विषारी, असा आरोप विनोद रॉय यांनी केला आहे. पदावर असताना गप्प राहिलेली माणसे पद गेल्यानंतर जेव्हा असे बोलू वा लिहू लागतात तेव्हा त्यांचे हेतू तपासून पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्यातून देशाचे सरकार बदलले असेल आणि त्यात अशा माणसांना अनुकूल असणारे लोक सत्तेवर आले असतील, तर मग अशी तपासणी जरा जास्तीच्या काटेकोरपणे करावी लागते.