शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विनोद रॉयची पश्चातबुद्धी

By admin | Updated: September 15, 2014 04:47 IST

विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला

भारताचे माजी महाअंकपरीक्षक (कॅग) विनोद रॉय यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका प्रदीर्घ मुलाखतीत टू जी घोटाळा आणि कोळसा प्रकरणात झालेला घोळ या दोहोंचाही ठपका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर ठेवला आहे. याअगोदर त्यांनी लिहिलेल्या आपल्या पुस्तकातही डॉ. सिंग यांना त्यांनी आपला निशाणा बनवले आहे. या आरोपाला उत्तर देण्यास डॉ. मनमोहनसिंग हे स्वत: समर्थ आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांपैकी एकानेही त्यांच्यावर असा ठपका ठेवला नाही. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना आजवर दोष दिला गेला असला, तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे धाडस कुणी केले नाही. विनोद रॉय यांचा डॉ. सिंग यांच्यावरचा आकस याआधी अनेकदा प्रगट झाला आहे. देशाच्या महाअंकपरीक्षकाचे पद हे सर्वोच्च न्यायालयासारखेच स्वतंत्र व सरकारच्या नियंत्रणांपासून मुक्त असते. या परीक्षकाने सरकारच्या हिशेबांची केलेली तपासणी संसदेच्या लोकलेखा समितीला सादर करणे एवढीच त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदावर असतानाही विनोद रॉय यांना ते करता येणे शक्य होते. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपद नेहमी विरोधी पक्षाकडे असते. त्या पक्षाने तशा अहवालाचे आनंदाने स्वागतही केले असते. मात्र, पदावर असताना ती जबाबदारी पार न पाडता निवृत्तीनंतर विनोद रॉय यांना सार्वजनिक स्वच्छतेचा उमाळा येत असेल, तर त्याकडे संशयाने पाहिले पाहिजे. डॉ. मनमोहनसिंग हे गेल्या ५० वर्षांपासून देशाच्या प्रशासनात व राजकारणात आहेत. एक अत्यंत सचोटीचे प्रशासनाधिकारी, मंत्री व पंतप्रधान अशी त्यांची आजवरची ख्याती आहे. याउलट विनोद रॉय हे महाअंकपरीक्षकाच्या जागेवर येईपर्यंत त्यांच्या नावाची या देशाला साधी खबरबातही कधी नव्हती. आपल्याला पदामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा आपल्या सोयीनुसार व लहरीनुसार वापर करण्याची बुद्धी झालेले अनेक लोक याआधी देशाने पाहिले आहेत. पदे गेली, राजकारण हातचे सुटले आणि जुनी सरकारे जाऊन नवी सरकारे पदावर आली, की अशा माणसांना जास्तीचा कंठ व जास्तीचे ज्ञान स्फुरत असते. माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंग यांना अशाच उत्साहाने ग्रासले आहे. ह्यवन लाईफ इज नॉट इनफह्ण या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर मनसोक्त दुगाण्या झाडल्या आहेत. नटवरसिंगांचे मंत्रिपद शाबूत होते तोवर त्यांना या दोघांतही कोणता दोष दिसला नाही. ह्यआॅईल फॉर फूडह्ण या घोटाळ््यात नाव अडकल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले तेव्हापासून ते त्या दोघांवर राग धरून आहेत आणि तो त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून उघडही केला आहे. हे करीत असतानाच त्यांनी आणखीही एका सोयीस्कर गोष्टीची व्यवस्था केली आहे. आपल्या मुलासाठी भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे तिकीट मिळविले आहे. राजकीय सोय करून झाल्यानंतर किंवा तशा सोयीवर लक्ष ठेवून नटवरसिंगांसारखी माणसे जेव्हा वागतात तेव्हा संशयाची सुई त्यांच्यावरच रोखली जाणे साहजिक बनते. विनोद रॉय यांचा आताचा उद्रेकही असाच आहे. मनमोहनसिंगांचे सरकार गेली दोन वर्षे सर्वतऱ्हेच्या टीकेला तोंड देत आले आहे. जोवर ते मजबूत व स्थिर होते तोवर विनोद रॉय गप्प होते. ते सरकार अस्थिर व दुबळे झाल्याचे दिसले तेव्हा त्यांना वाचा फुटली. महाभियोगाचा आधार घेतल्याखेरीज आपल्याला आपल्या पदावरून काढून टाकता येत नाही, याची खात्री असल्यानेच त्यांना सरकारवर राजकीय स्वरूपाची टीका करण्याचे धाडस झाले. त्यातून मिळणारी प्रसिद्धी त्यांच्याविषयीची आस्था विरोधी पक्षात निर्माण करायला कारणही झाली. विनोद रॉय यांचे प्रत्येक वक्तव्य मनमोहनसिंगांच्या विरोधकांनी ज्या तऱ्हेने उचलून धरण्याचे प्रयत्न आता चालविले आहेत ते याच तऱ्हेचे आहेत. टू जी घोटाळा आणि कोळशाचा घोळ याविषयीचे निर्णय संबंधित मंत्रालये घेत असताना मनमोहनसिंगांनी पंतप्रधान या नात्याने त्यांना अडवायला हवे होते, असा कमालीचा साळसूद वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय विषारी, असा आरोप विनोद रॉय यांनी केला आहे. पदावर असताना गप्प राहिलेली माणसे पद गेल्यानंतर जेव्हा असे बोलू वा लिहू लागतात तेव्हा त्यांचे हेतू तपासून पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. त्यातून देशाचे सरकार बदलले असेल आणि त्यात अशा माणसांना अनुकूल असणारे लोक सत्तेवर आले असतील, तर मग अशी तपासणी जरा जास्तीच्या काटेकोरपणे करावी लागते.