शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अखेर उमज पडली

By admin | Updated: February 10, 2016 04:30 IST

आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ

आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देणारे आणि ‘आम्हाला मोदी आवडत नाहीत व त्याना आम्ही आवडत नाही’ असे म्हणणारे राजधानी दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी नुकतीच मोदींची जी भेट घेतली आणि त्यानंतर मोदींकडे देशाचे पंतप्रधान म्हणून बघितले पाहिजे असा उपदेशही केला त्यावरुन त्याना अंमळ विलंबाने का होईना उमज पडली असे म्हणता येईल. मुळात बुखारी यांचे इमामपद वंशपरंपरागत आहे वा नाही आणि त्यांना स्वत:च्या पुत्रास नायब इमाम म्हणून घोषित करण्याचा व त्यासाठी मोठा सोहळा करण्याचा अधिकार आहे की नाही यावरुन त्या काळात खुद्द मुस्लीम समाजातच मोठ्या प्रमाणावर मतभेद होते. तरीही बुखारी यांनी हा सोहळा रेटून नेला व एकट्या मोदींना वगळून त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य अनेक सदस्यांना मात्र आवर्जून निमंत्रित केले होते. तो नि:संशय खोडसाळपणाच होता. पण तो त्यागून त्यांनी मोदींची भेट घेतली आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुन्हा एकदा मोदींशी चर्चा करण्याचे मुक्ररही केले. अर्थात परवा झालेल्या भेटीचा हेतू मात्र अत्यंत स्तुत्य होता. गेल्या काही दिवसांपासून देशभर इसिसच्या संपर्कातील म्हणून काही सुशिक्षित मुस्लीम तरुणांना पोलीस ताब्यात घेत आहेत. त्याबाबतची चिंता करण्यासाठी ही भेट होती. पण अशी चिंता केवळ बुखारी याना एकट्यालाच भेडसावते आहे असे मात्र नाही. मुस्लीम समुदायाच्या एकूण सहा संघटनांनी एक पत्रक जारी करुन हीच चिंता व्यक्त केली आहे. या समस्त संघटना आणि शाही इमाम यांनीदेखील इसिसचा तीव्र शब्दात निषेध करताना ती संघटना इस्लामीक असूच शकत नाही असेही स्पष्टपणे म्हटले आहे. गेल्या वर्षी दिल्लीत पार पडलेल्या एका दहशतवादविरोधी परिषदेत बोलताना केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर वक्तव्य करुन भारतात इसिसचे अस्तित्व नसल्याचा निर्वाळा दिला होता, पण तसे असताना आता अचानक त्या संघटनेशी संबंधित म्हणून मुस्लीम युवकाना जेरबंद कसे केले जाऊ शकते असा सवालदेखील या संघटनांनी केला आहे. आपल्या पत्रकात या संघटनांनी गेल्या काही वर्षात अटक झालेले मुस्लीम युवक आणि त्यांच्यावर दाखल खटले यांची आकडेवारीच सादर केली असून या आकडेवारीनुसार बहुसंख्य युवकाना अकारणच डांबून ठेवल्याचे स्पष्ट होते. तसे असेल तर ही बाब निश्चितच देशाच्या एकात्मतेला तडा देणारी आहे. परंतु आपण देशातील नागरिकांकडे मुस्लीम अथवा हिन्दू अशा नजरेतून बघत नसल्याचा निर्वाळा पंतप्रधानांनी स्वत:च दिल्याचे बुखारी यांनी म्हटले असून त्यांना पडलेली उमज बरीच मोठी म्हणावी लागेल.