शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

व्यभिचाराची गुन्हेमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:04 IST

व्यभिचाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देऊन स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेल्या नव्या, सुजाण आणि अधिक मानवीय भारतीय समाजाच्या धारणेस हातभार लावेल, अशी आशा करू या.

विवाह न करताही स्त्री-पुरुषाने राजीखुशीने लैंगिक समागम करणे हा बलात्कार होत नाही. पण यातील स्त्री दुसऱ्याची विवाहित पत्नी असेल तर तिच्या संमतीने केलेला समागम हा व्यभिचाराचा गुन्हा ठरवून त्यासाठी त्या युगुलातील फक्त पुरुषालाच पाच वर्षे खडी फोडायला पाठविणारे कलम ४९७ गेली १५८ वर्षे भारतीय दंड विधानात होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले. न्यायालयाचा हा निकाल व्यक्तिस्वातंत्र्य व लैंगिक समानता या राज्यघटनेतील मूलभूत हक्कांना अधिक बळकटी देऊन त्यांच्या कक्षा रुंदावणारा असल्याने त्याचे स्वागत करायला हवे. समलिंगी संबंधांना अभय, लिव्ह-इन संबंधांस मान्यता, अनौरस संततीला वारसाहक्क, दुसºया पत्नीला बाजूला ठेवून तिच्या मुलांना औरसपणाचा दर्जा देणे या आधीच्या निकालांच्या पावलावर पाऊल ठेवून हा नवा निकाल दिला गेला. अशा निकालांमुळे पुरुषांना बाहेरख्यालीपणा करण्यास मुक्तद्वार मिळेल आणि समाजाचा मूळ आधार असलेली विवाहसंस्था मोडीत निघेल, अशी भीती व्यक्त करत या निकालाविरुद्ध नाराजीचे सूर उमटले. हे सर्व मुद्दे सरकारने आणि इतरांनीही न्यायालयापुढे मांडले. परंतु राज्यघटनेच्या कसोटीवर ते टिकले नाहीत. याआधी सन १९५४ व १९८५ मध्ये न्यायालयाने हे कलम वैध ठरविले होते. एवढेच नव्हे तर यातील तरतुदी महिलांवर भेदभावाने अन्याय करणाºया नव्हेत तर उलट त्यांना झुकते माप देणाºया आहेत, असा निर्वाळाही त्या वेळी दिला गेला होता. मध्यंतरीच्या काळात राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची व्याप्ती वाढविणारे अनेक निकाल दिले गेले. नव्या पिढीचे न्यायाधीश आले व त्यांनी स्वातंत्र्य आणि समानता याकडे आधुनिक संदर्भांनी पाहणे सुरू केले. अशा परिस्थितीत हे कलम टिकून राहणे कठीण होते. अडचण होती जुन्या निकालांच्या पायंड्यांची व त्यांच्या बंधनकारक स्वरूपाची. परंतु आताच्या न्यायाधीशांनी या विषयाकडे पूर्णपणे नव्या पैलूंनी पाहिले. तसे केल्यावर पूर्वी जे कलम महिलाधार्जिणे ठरविले गेले होते तेच त्यांना महिलांवर घोर अन्याय करणारे व त्यांची अप्रतिष्ठा करणारे दिसले. न्यायदान व्यक्तिसापेक्ष असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. पूर्वीचे आपलेच पण आताच्या परिस्थितीत विसंगत ठरलेले निकाल मोडीत काढण्याचा सपाटा सर्वोच्च न्यायालयाने लावला आहे. हा निकालही त्याच पंक्तीत बसणारा आहे. ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी भारतावर राज्य करताना त्यांच्याकडील त्या वेळच्या नीतिमत्तेनुसार कायदे केले. तरी इंग्लंडच्या फौजदारी कायद्यांमध्ये त्यांनी व्यभिचाराचा गुन्हा घातला नव्हता. हा विषय कौटुंबिक आणि वैवाहिक तंटे सोडविणाºया चर्चच्या निवाडा मंडळाच्या अखत्यारीत दिला गेला होता. भारतात मात्र त्यांनी विवाहसंस्थेशी संबंधित गुन्हा म्हणून हा गुन्हा दंड संहितेत घातला. खरे तर राज्यघटना लागू झाल्यानंतर तिच्याशी विसंगत कायदे आपोआप संपुष्टात आल्याचे मानले गेले. संसदेनेही त्यानुसार जुने कायदे सुधारणे व नवे कायदे करणे अपेक्षित होते. कलम ४९७ पुरुषप्रधान सामाजिक मानसिकतेतून आले होते. खासगी जीवनात स्त्री-पुरुष समानता पाळणे एक वेळ सोपे असते. परंतु धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय संघटनेच्या पातळीवर जेव्हा असे विषय हाताळण्याची वेळ येते तेव्हा उक्तीप्रमाणे कृती करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. म्हणूनच न्यायालयाने हे धाडस दाखविले हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. उघडपणे स्वागत करणे जमले नाही तरी पाहुण्याच्या काठीने परस्पर विंचू मारला गेल्याने सरकारलाही मनोमन समाधान वाटले असेल. या निकालाने व्यभिचार बोकाळेल हे म्हणणे म्हणजे साप सोडून भुई धोपटणे आहे. विवाहाने स्त्रीचे हक्क संपुष्टात येत नाहीत, पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू नाही, विवाहसंस्था परस्परांचे प्रेम आणि विश्वासावर आधारलेली असते, नीतिमत्ता आणि चारित्र्य जपणे हे फक्त स्त्रीचे काम नाही हे आणि यासारखे इतरही अनेक सुविचार म्हणून भिंतीवर लिहून ठेवावे असे मुद्दे या निकालात न्यायालयाने अधोरेखित केले.

टॅग्स :Adultery Lawव्यभिचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय