शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्ष प्रगतीच्या मुळाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:36 IST

‘वरं जनहितं ध्येयम्’ हे पुणे महापालिकेचे ब्रीदवाक्य आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था याच ब्रीदवाक्यानुसार काम करतात. जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या नगरसेवकांनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच.

- विजय बाविस्कर‘वरं जनहितं ध्येयम्’ हे पुणे महापालिकेचे ब्रीदवाक्य आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था याच ब्रीदवाक्यानुसार काम करतात. जनतेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या नगरसेवकांनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच. त्याचबरोबर लोकसेवक या नात्याने प्रशासन चालविताना अधिकाºयांनीही लोकसेवा करणे अपेक्षित. यातून खटकेही उडतात. प्रशासनातील कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये संघर्ष उडतो; पण तो जनतेच्या हिताचा असतो. दोन्ही यंत्रणा एकमेकींवर अंकुश ठेवण्याचेच काम करतात.पुणे महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यातील २४ तास पाणीपुरवठा योजना असो की स्मार्ट सिटीचे प्रकल्प यामुळे वाद उद्भवत आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याविरोधात आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे आरोप सुरू केले आहेत. या मुद्यावर त्यांनी समर्थक नगरसेवकांच्या बैठका घेतल्या. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कॅग आणि न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि नगरसेवकच एखाद्या प्रकल्पाबाबत साशंक असतील तर मग नागरिकांनी कुणाकडे पाहावे? अशा वेळी सत्ताधाºयांनी समोर येऊन नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे. पण अधिकारी बोलणार नाहीत आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही टीका करीत राहणार, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रतिमा मलीन होत आहे. यापूर्वीही पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक यांच्यात संघर्ष झाला होता. तोट्याच्या गर्तेतील पीएमपीला बाहेर काढण्याचे आव्हान त्यांनी पेलले आणि पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले. वेगवेगळ्या निमित्तांनी राजकारणी व त्यांच्यात वाद होत राहिला. कर्मचाºयांचे निलंबन, अधिकाºयांची पदावनती यामुळे हे वाद वाढत गेले. पूर्वी पीएमपीमध्ये एका बसमागे नऊ कर्मचारी होते. मुंढे यांनी हा आकडा पाचपर्यंत आणला. खासगी कंपन्यांच्या गाड्यांच्या वापरावर शिस्त आणून बंधने घातली. त्यातून पीएमपीचा खर्च कमी झाला व नफ्याकडे वाटचाल सुरू झाली. सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वच महापालिका मदत करतात. संचालन तूट देतात. परंतु संचालन तूट होण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची आणि नंतर ‘ती देतो’ म्हणून राजकारण्यांनी दबाव आणायचा, यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा चालूच शकणार नाही. जेव्हा जनहिताचा ठेका केवळ आपणच घेतला आहे, असे काही जण समजू लागतात, तेव्हा गोंधळ उडतो व गदारोळ होतो. तेव्हा उडणारा गोंधळ व निर्माण होणारा गदारोळ ते प्रगतीचे गतिरोधक ठरतात. कोणत्याही सार्वजनिक संस्थेमार्फत चालविले जाणारे सार्वजनिक उपक्रम हे अनेकांसाठी कुरणच असतात. वेगवेगळ्या लिलाव प्रक्रिया, कंत्राटे यांतून निर्माण झालेले हितसंबंध यातून राजकीय दबावही वाढत जातो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादाला ही ‘अर्थपूर्ण’ किनार तर नाही ना, हेदेखील तपासून पाहायला हवे. सभागृहाचा वापर हा संकेत पाळून जनहिताच्या कामासाठीच व्हावा, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवे़

टॅग्स :Puneपुणे