शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

किनारपट्टीवर नव्याने घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:21 IST

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे.

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे. उद्योग, विशेषत: किनाऱ्यावर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा हा खटाटोप असल्याचे लपून राहात नाही. वास्तविक हा निर्णय पर्यावरणाला बाधा निर्माण करण्याबरोबरच सखल भागात राहाणाºया लोकांचे जीवन धोक्यात आणेल. मान्य करावेच लागतेय की लोकांचे जीवन सुरक्षित राखून मानवी संपत्तीचे रक्षण करण्याच्या हेतूनेच विविध पर्यावरण कायदे व सीआरझेड नियम बनविण्यात आले. वास्तविक किनारपट्टी नियम अधिसूचना २०११चा पुनर्विचार करण्याऐवजी हे नियम आणखी कडक बनविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचे प्रमुख कारण तापमानवाढ. तापमानवाढ वेगाने होत असल्याचे आता शास्त्रज्ञांनी एकमताने मान्य करून संपूर्ण जगाला यापूर्वीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे हिमपर्वतांचे वितळणे व समुद्रपातळीत वाढ. त्यामुळे किनारपट्टीवरील बरेचसे भाग व जगातील महत्त्वाची शहरे पाण्याखाली जाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. मुंबईसारख्या महानगरांना त्याचा कधीच विळखा पडला आहे. दादर चौपाटी बघता बघता कधी गायब झाली ते कुणालाच कळले नाही. पश्चिम मुंबईत उपनगरातील संपूर्ण समुद्रकिनाराच धोक्यात आला आहे. अतिक्रमणांनी ही मालाड ते गोराईपर्यंतची किनारपट्टी झाकोळून गेली आहे. अतिक्रमण करणाºयांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कांदळवनांचे अतोनात नुकसान होत आहे. विकासकामांच्या नावाखाली किनारपट्टीचा बळी घेतला जात आहे. कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेने तयार झालेली वाळू काँक्रिटीकरण करून नष्ट केली जात आहे. त्यामुळे किनाºयावरील बांधकामे हटविणे आणि वाळूचे पट्टे तसेच तेथील वनस्पतींचे रक्षण करणे महत्त्वाचे बनले आहे. विशेषत: समुद्र विज्ञान केंद्राने या विषयावर अभ्यास करून सरकारला वेळोवेळी अहवाल दिले असून ते समुद्र भरती रेषा ‘जैसे थे’ ठेवून बांधकाम नियम आणखी कडक करण्याचाच आग्रह धरतात. मच्छीमार संघटनांनी या प्रयत्नांना यापूर्वीच विरोध दर्शविला आहे. जेव्हा जेव्हा किनाºयांवर विकासविषयक प्रकल्प उभे राहिले तेव्हा पारंपरिक मच्छीमार या व्यवसायातून बाहेर गेले आहेत. त्यानंतर तर तक्रारी करण्यास कोणीच उपलब्ध नसल्याने किनारपट्टी उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली आहे. आगामी संकटांचीच ही चाहूल असून कायदे आणखी किती वाकविणार आहात, असा प्रश्न लोकांनी एकमुखाने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई