शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीवर नव्याने घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:21 IST

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे.

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे. उद्योग, विशेषत: किनाऱ्यावर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा हा खटाटोप असल्याचे लपून राहात नाही. वास्तविक हा निर्णय पर्यावरणाला बाधा निर्माण करण्याबरोबरच सखल भागात राहाणाºया लोकांचे जीवन धोक्यात आणेल. मान्य करावेच लागतेय की लोकांचे जीवन सुरक्षित राखून मानवी संपत्तीचे रक्षण करण्याच्या हेतूनेच विविध पर्यावरण कायदे व सीआरझेड नियम बनविण्यात आले. वास्तविक किनारपट्टी नियम अधिसूचना २०११चा पुनर्विचार करण्याऐवजी हे नियम आणखी कडक बनविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचे प्रमुख कारण तापमानवाढ. तापमानवाढ वेगाने होत असल्याचे आता शास्त्रज्ञांनी एकमताने मान्य करून संपूर्ण जगाला यापूर्वीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे हिमपर्वतांचे वितळणे व समुद्रपातळीत वाढ. त्यामुळे किनारपट्टीवरील बरेचसे भाग व जगातील महत्त्वाची शहरे पाण्याखाली जाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. मुंबईसारख्या महानगरांना त्याचा कधीच विळखा पडला आहे. दादर चौपाटी बघता बघता कधी गायब झाली ते कुणालाच कळले नाही. पश्चिम मुंबईत उपनगरातील संपूर्ण समुद्रकिनाराच धोक्यात आला आहे. अतिक्रमणांनी ही मालाड ते गोराईपर्यंतची किनारपट्टी झाकोळून गेली आहे. अतिक्रमण करणाºयांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कांदळवनांचे अतोनात नुकसान होत आहे. विकासकामांच्या नावाखाली किनारपट्टीचा बळी घेतला जात आहे. कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेने तयार झालेली वाळू काँक्रिटीकरण करून नष्ट केली जात आहे. त्यामुळे किनाºयावरील बांधकामे हटविणे आणि वाळूचे पट्टे तसेच तेथील वनस्पतींचे रक्षण करणे महत्त्वाचे बनले आहे. विशेषत: समुद्र विज्ञान केंद्राने या विषयावर अभ्यास करून सरकारला वेळोवेळी अहवाल दिले असून ते समुद्र भरती रेषा ‘जैसे थे’ ठेवून बांधकाम नियम आणखी कडक करण्याचाच आग्रह धरतात. मच्छीमार संघटनांनी या प्रयत्नांना यापूर्वीच विरोध दर्शविला आहे. जेव्हा जेव्हा किनाºयांवर विकासविषयक प्रकल्प उभे राहिले तेव्हा पारंपरिक मच्छीमार या व्यवसायातून बाहेर गेले आहेत. त्यानंतर तर तक्रारी करण्यास कोणीच उपलब्ध नसल्याने किनारपट्टी उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली आहे. आगामी संकटांचीच ही चाहूल असून कायदे आणखी किती वाकविणार आहात, असा प्रश्न लोकांनी एकमुखाने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई