शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

किनारपट्टीवर नव्याने घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 02:21 IST

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे.

केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाचा एखादा ‘निर्णय’ म्हणजे अंगावर काटा उभा राहाणे! आताही या मंत्रालयाने पुढे आणलेला समुद्र भरती रेषेचे (सीआरझेड) १०० मीटरवरून ५० मीटर आकुंचन करणारा मसुदा असाच शोकजनक आहे, म्हणून त्याला प्रखर विरोध झाला पाहिजे. उद्योग, विशेषत: किनाऱ्यावर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा हा खटाटोप असल्याचे लपून राहात नाही. वास्तविक हा निर्णय पर्यावरणाला बाधा निर्माण करण्याबरोबरच सखल भागात राहाणाºया लोकांचे जीवन धोक्यात आणेल. मान्य करावेच लागतेय की लोकांचे जीवन सुरक्षित राखून मानवी संपत्तीचे रक्षण करण्याच्या हेतूनेच विविध पर्यावरण कायदे व सीआरझेड नियम बनविण्यात आले. वास्तविक किनारपट्टी नियम अधिसूचना २०११चा पुनर्विचार करण्याऐवजी हे नियम आणखी कडक बनविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचे प्रमुख कारण तापमानवाढ. तापमानवाढ वेगाने होत असल्याचे आता शास्त्रज्ञांनी एकमताने मान्य करून संपूर्ण जगाला यापूर्वीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे हिमपर्वतांचे वितळणे व समुद्रपातळीत वाढ. त्यामुळे किनारपट्टीवरील बरेचसे भाग व जगातील महत्त्वाची शहरे पाण्याखाली जाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. मुंबईसारख्या महानगरांना त्याचा कधीच विळखा पडला आहे. दादर चौपाटी बघता बघता कधी गायब झाली ते कुणालाच कळले नाही. पश्चिम मुंबईत उपनगरातील संपूर्ण समुद्रकिनाराच धोक्यात आला आहे. अतिक्रमणांनी ही मालाड ते गोराईपर्यंतची किनारपट्टी झाकोळून गेली आहे. अतिक्रमण करणाºयांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कांदळवनांचे अतोनात नुकसान होत आहे. विकासकामांच्या नावाखाली किनारपट्टीचा बळी घेतला जात आहे. कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेने तयार झालेली वाळू काँक्रिटीकरण करून नष्ट केली जात आहे. त्यामुळे किनाºयावरील बांधकामे हटविणे आणि वाळूचे पट्टे तसेच तेथील वनस्पतींचे रक्षण करणे महत्त्वाचे बनले आहे. विशेषत: समुद्र विज्ञान केंद्राने या विषयावर अभ्यास करून सरकारला वेळोवेळी अहवाल दिले असून ते समुद्र भरती रेषा ‘जैसे थे’ ठेवून बांधकाम नियम आणखी कडक करण्याचाच आग्रह धरतात. मच्छीमार संघटनांनी या प्रयत्नांना यापूर्वीच विरोध दर्शविला आहे. जेव्हा जेव्हा किनाºयांवर विकासविषयक प्रकल्प उभे राहिले तेव्हा पारंपरिक मच्छीमार या व्यवसायातून बाहेर गेले आहेत. त्यानंतर तर तक्रारी करण्यास कोणीच उपलब्ध नसल्याने किनारपट्टी उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये कित्येक पटींनी वाढ झाली आहे. आगामी संकटांचीच ही चाहूल असून कायदे आणखी किती वाकविणार आहात, असा प्रश्न लोकांनी एकमुखाने सरकारला विचारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई