शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मारो ना पिचकारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:17 IST

सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचा निर्धार नागरिकांनी केला तरच शहर स्वच्छ राहील.

उपराजधानीतील पोलिसांनी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याने समस्त थुंकीबहाद्दरांच्या जीवाचा किती थयथयाट झाला असणार याची कल्पना न केलेली बरी. काहींवर तर गुन्हेही दाखल झाले आहेत म्हणे. पोलिसांच्या हातून हा प्रमाद घडलाच कसा? ते ही स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांविरुद्ध; ज्यांना कुठेही, केव्हाही आणि कसेही थुंकण्याचा अधिकार बहाल झालायं. (असं ते मानतात) आम्हाला कुणीही रोखू शकत नाही अशा अविर्भावात पिचकाºया उडविणाºया आणि त्यातच खरा राष्ट्राभिमान मानणाऱ्या या महाभागांचे आता कसे होणार. बसमध्ये असो, कारमध्ये वा दुचाकीवर आजूबाजूने जाणाºयांचा थोडाही विचार न करता आपल्या तोंडातली घाण थुंकणाºयांना आता आपली ही हौस कशी भागविता येणार? कारण सार्वजनिक ठिकाणी थुंकून प्रदूषण करणारी, लोकांचे आरोग्य धोक्यात आणणारी ही मंडळी स्वत:च्या घरात थुंकत नसणारच याची शंभर टक्के खात्री आहे. खरे तर अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासोबतच थुंकलेली जागासुद्धा स्वच्छ करण्यास त्यांना बाध्य केले पाहिजे. असे अनारोग्य पसरविण्याचा अधिकार यांना दिला कुणी? सार्वजनिक स्वच्छता हा तसा कायमच दुर्लक्षित राहिलेला विषय. ही जबाबदारी केवळ सरकारचीच नाहीतर आमचीपण आहे याचे भान आम्हाला स्वातंत्र्याची सत्तरी उलटून गेल्यावरही आलेले नाही. थुंकणे हा त्यातील अत्यंत किळसवाणा प्रकार. पु.ल.देशपांडेंच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘शिंके, फुंके आणि थुंके’ असे तीन प्रकार आहेत. विदर्भात थुंक्यांची संख्या जास्त आहे. कारण या भागात तंबाखुयुक्त गुटखा खाणारे प्रचंड आहेत. शासकीय कार्यालये आणि रस्ते तर सोडाच रुग्णालयांतही सर्व भिंती पान-तंबाखू खाऊन थुंकणाºयांनी रंगविलेल्या असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे घाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती असूनही आम्ही असे का वागतो? बरेच लोक आपले घर स्वच्छ ठेवतात पण बाहेर पडले की त्यांच्यात अस्वच्छतेचे भूत संचारते. एक परिचित सिंगापूरला गेले होते. परतल्यावर जाम नाराज. यापुढे कधीही सिंगापूरला जाणार नाही,अशी प्रतिज्ञाच त्यांनी घेतली. कारण काय तर तेथे थुंकण्यास मनाई आहे. हा काय प्रकार आहे? थुंकायला काय भारतात येणार होतो काय? असा उलटप्रश्न. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मोठा दंड भरावा लागेल, वेळप्रसंगी तुरुंगातही जावे लागेल हे कळल्यावर त्यांची पंढरी घाबरली होती. त्यात पुन्हा तुरुंगातही थुंकण्यावर बंदी. थुंकायचेच नाही म्हटल्यावर जगायचे कसे? असा यक्षप्रश्न त्यांना पडला होता म्हणे. आता पोलिसांनी आपली कारवाई अशीच युद्धपातळीवर सुरू ठेवली तर येथेही असेच होणार आहे, हे या थुंकीबहाद्दरांनी ध्यानात ठेवावे. लोकांनीही या मोहिमेत स्वेच्छेने सहभागी होण्याची गरज आहे. कारण सरकारने स्वच्छतेसाठी कितीही निधी खर्च केला तरी लोकांच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही. सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचा निर्धार नागरिकांनी केला तरच शहर स्वच्छ राहील.

 

टॅग्स :nagpurनागपूर