शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

मनाचिये गुंथी - एकारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:55 AM

झाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले.

- किशोर पाठकझाडे लावा झाडे जगवा ही हाक कुणापर्यंत पोचते कळत नाही. पण झाडे तोडणारेही ही पाटी वाचतात. माणूसजात प्रगत झाली आणि जास्त मूलगामी झाली. त्यांच्या मूलभूत हिंस्त्र भावनेला एक वैश्विक विचारांचे कोंदण आले. म्हणजे माणसाचे सहज मरणे आणि त्याला मारणे यात केवळ ‘कानाचा’ फरक, पण तो किती कठीण आणि न समजणारा. म्हणजे माणसाला माणूस जगायला हवा, त्याचा विचार जगायला हवा असे वाटते, पण माणूस जगत नाही जगवत नाही. आपल्याला एक इझम चिकटलाय. गंमत म्हणजे तो प्रत्येक माणूस जगायलाच हवा, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित हा घोष करीत राहतो आणि नेमके उलटे वागतो. माणूस जेवढा विविध तेवढे त्याचे विचारही भिन्न. मला जो माणूस माझा वाटतो तो इतरांना जवळचा वाटत नाही. म्हणजे दया, क्षमा, शांती हे शब्द प्रत्येकाला माहीत आहेत, मान्य आहेत परंतु ते तत्त्वज्ञान झाले याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय संबंध? म्हणजे न आवडणारा ठोकायलाच हवा ही आपली प्रवृत्ती. म्हणूनच माणूस जगतो आणि मरतोही. मग आपण एक वाक्य ऐकतो, वाचतो. माणूस मेला तरी विचार मरत नाहीत.गांधी गेले, शास्त्री गेले, जयप्रकाश नारायणही गेले, विनोबा गेले, श्यामच्या आईचे साने गुरुजी गेले काय बदल झाला आपल्यात? कुठल्या वैचारिक प्रचाराने आपण सुधारलो, बदललो. उलट दिवसेंदिवस आपण खूप एकांतिक होत चाललोत. आपण एकारलोत. हे एकारणे कुणाला हवे, कुणाला नको, मग भले त्यात माणूस चिरडला तरी जपायला हवा म्हणणारेही आहेत. याला शिक्षा व्हायलाच हवी. या व्यक्ती समाजात उंच मानेने चालतात, वावरतात आणि स्वयंघोषित संत-महंत तुरुंगात बसतात. कायदा कठीण आहे. तो हवा तेव्हा बदलता येतो किंवा त्याचा हवा तसा अर्थ लावता येतो. हे सोयीस्कर अर्थ लावणे यालाच वैचारिक परिभ्रमण म्हणतात, कुणी क्रांती म्हणतात कुणी आणीबाणी म्हणतात. कुणाला हा मुक्त संचार वाटतो, तर कुणाला मुस्कटदाबी वाटते. असा विचार करणारी माणसं एकमेकांसमोर आली तर काय होईल? मारामारी, दंगल आणि खून! पण हे वैचारिक, सर्वमान्य नाही. माणसांना सरळ खाणारा बिबट्या सापडला तर त्याला घनदाट जंगलात सोडतात. का तर तोही जगायला हवा. पण माणसाला ती मुभा का नाही? तू बोल वा बोलू नको. तू मला हवं ते बोल किंवा बोलूही नको! तुझे जगणे हे वैचारिक धारेत निरुपयोगी असेल तर जग, तू जगायला लायक नाहीतर मरायला तयार हो। खूप मोठ्याने म्हणतो आपण, माणूस मेला तरी चालेल विचार जगायला हवेत. पण मग एकच प्रश्न! जगण्याचा हक्क प्रत्येक माणसाचा, मग माणूस का जगायला नको? हा प्रश्न उत्तरहीन!