शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा

By किरण अग्रवाल | Updated: October 21, 2021 16:10 IST

Accurate observation of excess rainfall is required : अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

- किरण अग्रवाल

 परतीच्या पावसाने केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र दाणादाण उडवून मोठे नुकसान घडविले. या पावसाने होत्याचे नव्हते करून ठेवले. नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुढे जाण्याखेरीज पर्याय नसतो हे खरेच; पण नेहमीच्या होऊन गेलेल्या या संकटात मदतीला धावून जाण्याच्या सरकारच्याही मर्यादा लक्षात घेता, वेळी-अवेळी होणारा पाऊस व अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या यंत्रणांच्या सक्षमपणे उपयोगितेचा यासंबंधाने विचार होणे अपेक्षित आहे.

 कोरोनाच्या संकटात अगोदरच झालेल्या नुकसानीमुळे समाज जीवनावर निराशेचे मळभ दाटलेले असताना पावसाच्या फटक्याने त्यात भर घालून ठेवली आहे. यंदा तसा मान्सून चांगला झाल्याने पिके जोमात होती, त्यामुळे यंदाचा दसरा, दिवाळी चांगली जाईल, असा अंदाज होता. येईन येईन म्हणून भीती बाळगली गेलेली कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात सुदैवाने आतापर्यंत तरी यश आलेले दिसत आहे, त्यामुळेही जनजीवन पूर्वपदावर आलेले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. अशात शेतीपिकेही तरारून आल्याने बळिराजा काहीसा सुखावलेला होता. परंतु, निसर्गाला ते मान्य नसावे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात आलेल्या परतीच्या पावसाने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यांत दाणादाण उडविली. दक्षिणेत केरळमध्ये तर हाहाकार उडाला असून, काहीजणांचे बळीही गेले आहेत. महाराष्ट्रातही विशेषता विदर्भ, मराठवाड्याला मोठा फटका बसून गेला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, धान व मक्यासह वेचणीला आलेला कापूस या परतीच्या पावसात जमीनदोस्त झाला. इतरही पिकांची हानी झाली, त्यामुळे बळिराजाच्या डोळ्यात अश्रू तरारले. ऐन सणावाराच्या तोंडावर हे संकट ओढवल्याने, एकातून सुटले आणि दुसऱ्यात अडकले, अशी अवस्था साऱ्यांची झाली आहे.

 नैसर्गिक आपत्तीला इलाज नसतो, त्यामुळे बळिराजावर ओढवलेल्या या संकटातून त्यास काहीसा आधार किंवा दिलासा देण्यासाठी सरकारही आपल्या पातळीवर जमेल ते प्रयत्न करीत आहेच. मात्र, ते पुरेसे ठरू शकत नाहीत. तेव्हा रोगावर इलाज करण्यापेक्षा रोगापासूनच दूर कसे राहता येईल या अंगाने यासंदर्भात विचार होणे गरजेचे ठरले आहे. पाणी, पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या वेधशाळा व हवामान खाते आपल्याकडे आहे, त्यांचे अंदाज कधी खरे, तर कधी खोटेही ठरतात. परंतु, आहेत त्या यंत्रणांचा सक्षमपणे उपयोग होताना दिसत नाही. विशेषतः वातावरणातील बदलामुळे मान्सून पॅटर्न वेगाने बदलतो आहे. तासाभरात एक, एक हजार मिलिमीटर पाऊस पडू लागला आहे. २०१० पासून ढगफुटीचे प्रमाण वाढले आहे. अगदी चेरापुंजीचे रेकॉर्ड तोडणारा पाऊस अलीकडे महाराष्ट्रात होऊ लागला आहे, तेव्हा या संदर्भातील आधुनिक व अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अंदाज नव्हे, तर सुस्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था होणे अपरिहार्य बनले आहे.

 महत्त्वाचे म्हणजे राज्याला किंवा देशालाच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाला ढगफुटीची आगाऊ माहिती देण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने भारताची नोडल एजन्सी म्हणून निवड केलेली आहे. याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून दिला जात असतो. तेव्हा ‘एक्स बँड डॉप्लर रडार’ व सुपर कम्प्युटर (HPC) सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध असल्याने त्या यंत्रणेचा वापर करून ‘क्लाऊड बस्ट’ व ‘फ्लॅश फ्लड’ची माहिती मिळविणे व ती स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन संभाव्य नुकसान टाळणे अवघड नाही. दुसरे म्हणजे, मान्सून पॅटर्न बदलत असल्याचे पाहता पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन ''क्राफ्ट पॅटर्न'' बदलाचा विचार करणेही आवश्यक आहे, परंतु याहीसंदर्भात पुरेसे जनजागरण होताना दिसत नाही. कृषी विद्यापीठांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, परंतु ती शिक्षण, संशोधन व विश्लेषणातच अधिकतर व्यस्त असतात. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत व पद्धतीने निसर्गात होत असलेले बदल व त्याप्रमाणे शेतीत करावयाचे बदल समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीच्या नापिकीसारख्या समस्या ओढवत आहेत. याहीदृष्टीने बदल केला गेला तर होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस