शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 07:07 IST

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़ या नियमांचा शोध घेऊन विज्ञानाने निसर्गाच्या लुप्त असलेल्या अनेक रहस्यांची उकल केलेली असून त्याच आधारावर मानवाने सुध्दा अनेक नियम बनविलेले आहेत.

जशी निसर्ग नियमानुसार सृष्टी चालत असते, त्याचप्रमाणे मानवाने तयार केलेल्या नियमानुसार हे जीवन आणि समाज चालत असतो. जेव्हा या नियमांचे उल्लंघन होत असते, तेव्हा रचना विस्कळीत होऊन दुर्घटना घडत असते. जेव्हा समाजामधील आरोग्याचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा शारीरिक आणि मानसिक रोगांची उत्पत्ती होत असते. जेव्हा नैतिकतेचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा समाजामध्ये भेदभाव वाढत असतो़ आर्थिक नियमांचे उल्लंघन होणे ही या गोष्टीची साक्ष आहे की, समाजामध्ये आर्थिक गुन्हे/अपराध वाढलेले आहेत़ तसेच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजेच दुर्घटनेला निमंत्रण देणे होय.़ रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या दुर्घटना, भारतवर्षाकरिता फारच चिंताजनक अशी बाब आहे़ संपूर्ण भारतवर्षामध्ये एका वर्षात १ लक्ष ४० हजार लोक दुुर्घटनांमध्ये मृत्यू पावतात. केवळ महाराष्टÑ राज्यामध्ये रहदारींचे उल्लंघन करून मृत पावणाºयांची संख्या ३३,००० पेक्षा जास्त आहे़ इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटनांमध्ये मृत पावणाºया लोकांची संख्या फक्त भारतामध्येच आहे़ दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण वाहन चालकांची चूक होय़ आपल्या देशामध्ये ७० ते ८० टक्के दुर्घटना या वाहनचालकांच्या चुकांमुळे घडत असतात़ सदर दु:खद दुर्घटना घडण्यामध्ये १६ ते ३५ वर्षे वय असलेल्या व्यक्तींचा सर्वात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जो वर्ग देश, समाज आणि परिवाराचा आधार आहे, तोच या दुर्घटनेचा शिकार होत आहे़ अशा प्रकारच्या दुर्घटनांना थांबविण्याचे काम हे प्रशासनाचे तर आहेच़ परंतु सामान्य जनतेच्या सक्रिय सहयोगाशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नाही़ याचा प्रारंभ आम्ही शिकत असलेल्या शाळेतून/विद्यालयातून व्हावयास पाहिजे़ पालकांची भूमिकासुध्दा यादृष्टीने फार महत्त्वाची आहे़ पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना समजावण्यापासून, स्वत: नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे़ त्यामुळे दुर्घटनांना आळा बसण्यास फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल़ अशा प्रकारे दुर्घटनांमुळे होणाºया मृत्यूंंना थांबवून आम्ही कधीही न भरल्या जाऊ शकणाºया नुकसानीला आळा घालू शकतो़

 - डॉ़ भूषण कुमार उपाध्याय

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीस