शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अभिमन्यू, अर्जुन, रणछोड आणि रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:56 IST

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात ...

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात अवतरल्याचा भास मतदारांना पदोपदी जाणवत आहे. कधी स्वत: उमेदवार स्वत:ला ही पात्रे असल्याचे भासवतो तर कधी मतदार त्याला त्या पात्राच्या भूमिकेत असल्याचे बघतात. निवडणुकीच्या रणांगणातून काहींनी पलायन करताना तात्विक कारणे दिली आहेत, तर काहींनी वैयक्तिक अडचणी मांडल्या आहेत. एकंदर रणांगणावर महायुध्द रंगात आले आहे.मुक्ताईनगर हा मतदारसंघ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा गड आहे. परंतु, गेल्या साडेतीन वर्षांपासून पक्षांतर्गत विरोधकांमुळे खडसे अडचणीत आले आहेत. मंत्रिपद गेले. चौकशीचा ससेमिरा लागला. निष्पन्न काही झालेले नसतानाही खडसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले नाहीच, शिवाय त्यांना यंदा विधानसभेची उमेदवारी सुध्दा नाकारण्यात आली. भुसावळच्या सभेत काल खडसे यांनी अनेक बाबी उघड केल्या. सहावेळा आमदार राहून चुकलेल्या खडसे यांना एकदा पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. कन्या रोहिणीला उमेदवारी मिळाली हे त्यातल्या त्यात समाधान म्हणावे लागेल. तरीही खडसे यांच्या मनातील शल्य कायम आहे. पक्षाने उमेदवारी का नाकारली, माझा काय गुन्हा हे मी पक्षाला निश्चित विचारणार आहे, हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. राष्टÑवादीने दिलेले तिकीट व विरोधी पक्षनेतेपदाच्या आॅफरविषयी गौप्यस्फोट करताना खडसे म्हणाले, ४२ वर्षे ज्या पक्षाला वाढविले, विस्तार केला आणि पक्षाने देखील सहा वेळा आमदार, विधिमंडळात गटनेते, विरोधी पक्षनेते, १२ खात्यांचे मंत्रिपद असा मानसन्मान दिला असताना आता पक्ष सोडण्याचा विचार मनात येणार नाही. पक्षांतर्गत विरोधकांनी ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न केला, पण मी अर्जुन आहे हे लक्षात घ्या. सगळ्यांना मी पुरुन उरेल. एवढी संकटे, आपत्ती झेलूनदेखील खडसे ज्या तडफेने पुन्हा सामना करण्याला सज्ज होतात, हे त्यांचे सर्वात मोठे गुणवैशिष्टय म्हणावे लागेल.शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ज्यांची राज्यभर ओळख आहे, असे सहकार राज्यमंत्री, सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांची आप्तस्वकीय आणि प्रतिस्पर्र्धींनी कोंडी केली आहे. या कोंडीचा विस्फोट पंतप्रधानांच्या सभास्थळी झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे सख्य आहे. परंतु, तरीही गुलाबरावांचा संताप बरेच काही सांगून जाणारा आहे. मुळात जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांना घेरणारी मंडळी पूर्वीचे त्यांचेच सहकारी होते. पी.सी.पाटील, चंद्रशेखर अत्तरदे हे खडसे गटाचे ओळखले जातात. खडसे-गुलाबराव यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. असे वेगवेगळे कंगोरे या बंडखोरीमागे आहे. एक मात्र खरे मंत्रिपद मिळाल्यानंतर केवळ जनतेच्या नव्हे तर आप्तस्वकीयांच्या अपेक्षा वाढतात आणि सगळ्यांचे समाधान करता येत नसल्याने नाराजांचे प्रमाण वाढते.हा अनुभव सध्या गुलाबराव पाटील घेत आहेत.चोपड्यात सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही चहुबाजूने कोंडी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घरकूल प्रकरणाचा निकाल लागला आणि सोनवणे यांना कारागृहात जावे लागले. गेल्यावेळी सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांना त्यांच्या पक्षाने साथ दिली होती, तशीच यावेळी सोनवणे यांनाही दिली. पत्नी लता सोनवणे यांना सेनेची उमेदवारी मिळाली. परंतु, भाजपचे जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबत युतीधर्माला हरताळ फासत भाजपचे पदाधिकारी जाणे हे एकवेळ समजू शकते. परंतु, सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील हे उघडपणे बंडखोर उमेदवारासोबत फिरत आहे. सेनेने हकालपट्टीची कारवाई केली, त्याचा कितपत लाभ आता लता सोनवणे यांना मिळतो, हे बघायचे.एकेका मतदारसंघात अनेक इच्छुक असताना एकालाच उमेदवारी मिळाली. बाकी इच्छुक पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासनानुसार ‘रणछोड’ बनले. खान्देशात दखलपात्र असे १६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी किमान दोन-तीन अंतिम टप्प्यापर्यंत टिकून राहिले आहेत. आता कोण अभिमन्यू होतो, कोण अर्जुन ठरतो हे २४ ला कळेल.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव