शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अभिमन्यू, अर्जुन, रणछोड आणि रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:56 IST

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात ...

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात अवतरल्याचा भास मतदारांना पदोपदी जाणवत आहे. कधी स्वत: उमेदवार स्वत:ला ही पात्रे असल्याचे भासवतो तर कधी मतदार त्याला त्या पात्राच्या भूमिकेत असल्याचे बघतात. निवडणुकीच्या रणांगणातून काहींनी पलायन करताना तात्विक कारणे दिली आहेत, तर काहींनी वैयक्तिक अडचणी मांडल्या आहेत. एकंदर रणांगणावर महायुध्द रंगात आले आहे.मुक्ताईनगर हा मतदारसंघ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा गड आहे. परंतु, गेल्या साडेतीन वर्षांपासून पक्षांतर्गत विरोधकांमुळे खडसे अडचणीत आले आहेत. मंत्रिपद गेले. चौकशीचा ससेमिरा लागला. निष्पन्न काही झालेले नसतानाही खडसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले नाहीच, शिवाय त्यांना यंदा विधानसभेची उमेदवारी सुध्दा नाकारण्यात आली. भुसावळच्या सभेत काल खडसे यांनी अनेक बाबी उघड केल्या. सहावेळा आमदार राहून चुकलेल्या खडसे यांना एकदा पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. कन्या रोहिणीला उमेदवारी मिळाली हे त्यातल्या त्यात समाधान म्हणावे लागेल. तरीही खडसे यांच्या मनातील शल्य कायम आहे. पक्षाने उमेदवारी का नाकारली, माझा काय गुन्हा हे मी पक्षाला निश्चित विचारणार आहे, हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. राष्टÑवादीने दिलेले तिकीट व विरोधी पक्षनेतेपदाच्या आॅफरविषयी गौप्यस्फोट करताना खडसे म्हणाले, ४२ वर्षे ज्या पक्षाला वाढविले, विस्तार केला आणि पक्षाने देखील सहा वेळा आमदार, विधिमंडळात गटनेते, विरोधी पक्षनेते, १२ खात्यांचे मंत्रिपद असा मानसन्मान दिला असताना आता पक्ष सोडण्याचा विचार मनात येणार नाही. पक्षांतर्गत विरोधकांनी ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न केला, पण मी अर्जुन आहे हे लक्षात घ्या. सगळ्यांना मी पुरुन उरेल. एवढी संकटे, आपत्ती झेलूनदेखील खडसे ज्या तडफेने पुन्हा सामना करण्याला सज्ज होतात, हे त्यांचे सर्वात मोठे गुणवैशिष्टय म्हणावे लागेल.शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ज्यांची राज्यभर ओळख आहे, असे सहकार राज्यमंत्री, सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांची आप्तस्वकीय आणि प्रतिस्पर्र्धींनी कोंडी केली आहे. या कोंडीचा विस्फोट पंतप्रधानांच्या सभास्थळी झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे सख्य आहे. परंतु, तरीही गुलाबरावांचा संताप बरेच काही सांगून जाणारा आहे. मुळात जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांना घेरणारी मंडळी पूर्वीचे त्यांचेच सहकारी होते. पी.सी.पाटील, चंद्रशेखर अत्तरदे हे खडसे गटाचे ओळखले जातात. खडसे-गुलाबराव यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. असे वेगवेगळे कंगोरे या बंडखोरीमागे आहे. एक मात्र खरे मंत्रिपद मिळाल्यानंतर केवळ जनतेच्या नव्हे तर आप्तस्वकीयांच्या अपेक्षा वाढतात आणि सगळ्यांचे समाधान करता येत नसल्याने नाराजांचे प्रमाण वाढते.हा अनुभव सध्या गुलाबराव पाटील घेत आहेत.चोपड्यात सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही चहुबाजूने कोंडी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घरकूल प्रकरणाचा निकाल लागला आणि सोनवणे यांना कारागृहात जावे लागले. गेल्यावेळी सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांना त्यांच्या पक्षाने साथ दिली होती, तशीच यावेळी सोनवणे यांनाही दिली. पत्नी लता सोनवणे यांना सेनेची उमेदवारी मिळाली. परंतु, भाजपचे जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबत युतीधर्माला हरताळ फासत भाजपचे पदाधिकारी जाणे हे एकवेळ समजू शकते. परंतु, सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील हे उघडपणे बंडखोर उमेदवारासोबत फिरत आहे. सेनेने हकालपट्टीची कारवाई केली, त्याचा कितपत लाभ आता लता सोनवणे यांना मिळतो, हे बघायचे.एकेका मतदारसंघात अनेक इच्छुक असताना एकालाच उमेदवारी मिळाली. बाकी इच्छुक पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासनानुसार ‘रणछोड’ बनले. खान्देशात दखलपात्र असे १६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी किमान दोन-तीन अंतिम टप्प्यापर्यंत टिकून राहिले आहेत. आता कोण अभिमन्यू होतो, कोण अर्जुन ठरतो हे २४ ला कळेल.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव