शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

अभिजित पाटील यांच्या उमेदवारीने रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:08 IST

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले

मिलिंद कुलकर्णीविधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांना अपेक्षेप्रमाणे भाजपकडून उमेदवारी मिळाली; मात्र महाविकास आघाडीकडून अचानकपणे काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील यांना तिकीट मिळाल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले.अमरीशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. नैसर्गिक न्यायतत्त्वाप्रमाणे पटेल यांचा दावा रास्त आहे. मात्र राज्यात सत्ता न आल्याने नाराज असलेल्या भाजप नेत्यांना किमान विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. त्यात धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची नावे आघाडीवर होती. महाविकास आघाडीतून अनेक नावांची चर्चा असली तरी अभिजित पाटील यांचे नाव कोठेही नव्हते. परंतु, आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी अभिजित पाटील या तरुण सहकाऱ्याला संधी दिली.उमेदवार निश्चितीचा पहिला टप्पा आटोपला. आता रणनीती आखण्यास सुरुवात होईल. अनेक अर्थाने ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल हे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात, मात्र त्यांचा शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे आणि पूर्वी नंदुरबार जिल्हा निर्मितीपूर्वी धुळे हा संयुक्त जिल्हा असल्याने राजकीय संबंध सर्वपक्षीयांशी आहेत. अभिजित पाटील हे तरुण नेते आहेत. जिल्हा परिषदेत त्यांनी कार्याची छाप उमटवली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे ते प्रतिनिधीत्व करीत आहेत.नंदुरबार विरुध्द धुळे असा उमेदवारांचा सामना होणार असला तरी मतदार संख्या सर्वाधिक म्हणजे २३८ धुळे जिल्ह्यातील आहे. नंदुरबारचे मतदार हे २०० आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी ५६ आहेत. धुळ्यात भाजपची तर नंदुरबारात महाविकास आघाडीची सत्ता आहे. धुळ्यात भाजपचे ३९ तर नंदुरबारात २३ सदस्य आहेत. काँग्रेसचे नंदुरबारात २३ तर धुळ्यात ७ सदस्य आहेत. पालिकांचा विचार केला तरी भाजपचे बºयापैकी प्राबल्य दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा पालिकेवर भाजपची सत्ता आहे. नवापूर, नंदुरबार व धडगाव येथे आघाडीचे वर्चस्व आहे. धुळे जिल्ह्यात धुळे महापालिका, दोंडाईचा, शिंदखेडा, शिरपूर या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. साक्रीत आघाडीची सत्ता आहे.कागदावर हे संख्याबळ असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्षांतरामुळे विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीवर कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिजित पाटील हे काँग्रेसचे जि.प.सदस्य आहेत, पण त्यांचे पिताश्री मोतीलाल पाटील हे भाजपचे शहाद्यातील लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. सभागृहात दीपक पाटील यांना मानणाºया काँग्रेस नगरसेवकांचे प्राबल्य असून दीपक पाटील हे आता भाजपमध्ये गेले आहेत. नंदुरबार पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक बहुमतात आहेत, पण नेते चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत गेल्याने साहजिकपणे पालिकेवर भगवा फडकला आहे. शिरपूर पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे, पटेल यांच्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. पण पटेल भाजपमध्ये गेल्याने पालिका भाजपमय झाली.पंचायत समित्यांवर असाच परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांचे सभापती आता नेमके कोणाला मतदान करतात, हे पाहणे रंजक ठरेल.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणे अगदी स्वाभाविक आहे. माजी मंत्र्याविरुध्द काँग्रेसचा तरुण उमेदवार अशी लढत आहे. भाजपकडून ही जागा खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल. जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.हीना गावीत, डॉ.सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, भरत गावीत ही नेते मंडळी प्रयत्नशील राहतील. महाविकास आघाडीसाठी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, सुरुपसिंग नाईक, रोहिदास पाटील, चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, आमदार मंजुळा गावीत, आमदार कुणाल पाटील, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी, पद्माकर वळवी हे जोर लावतील. निकाल काय लागतो, हे ३१ मार्चला कळेल, मात्र तोवर या दोन्ही जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल, हे मात्र निश्चित.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव