शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

अविद्यामंदिर!

By admin | Updated: May 6, 2017 00:12 IST

आपल्याकडच्या कोणत्याही लहान गावातले असावे तसे हे ‘मोठ्ठे’ कॉलेज. मोठ्या शहरातलेही मोठ्ठे कॉलेज याहून वेगळे नसतात. कॉलेजची इमारत

आपल्याकडच्या कोणत्याही लहान गावातले असावे तसे हे ‘मोठ्ठे’ कॉलेज. मोठ्या शहरातलेही मोठ्ठे कॉलेज याहून वेगळे नसतात. कॉलेजची इमारत भव्य. वर्ग हवेशीर असावेत म्हणून काचबंद खिडक्या; पण त्यांच्या काचा बहुतेक फुटलेल्या. वर्गात मोडक्या खुर्च्याच जास्त कारण आनंद दाखवायला खुर्च्यांवर नाचायचे आणि राग-संताप यांना वाट करून देण्यासाठी खुर्च्यांची फेकाफेकच विद्यार्थ्यांनी करायची ! वर्गाच्या पांढऱ्या भिंती आणि फळे यावर अर्वाच्य साहित्याचे विद्रूप प्रदर्शन !शॉर्ट ब्रेकमध्ये कॉलेजच्या पटांगणात (कानाला सतत मोबाइल लावलेल्या) मुलामुलींचा समूह हेलकावत असतो. मुलांचे केस मानेपर्यंत वाढलेले तर मुलींचे केस मानेपर्यंत कापलेले ! डोळ्यांवर लहरणाऱ्या बटातून आपल्याकडे कोणाचे किती लक्ष आहे याचा अंदाज ते दोघेही घेत असतात. आर्ट्सच्या, कॉमर्सच्या मुलांकडे पेन, वह्या, पुस्तके, अभावानेच आढळतात. विज्ञान शाखेतील मुलांच्या पाठीला मात्र जड बॅग असते. यापैकी काही मुले साध्या कपड्यातली, तेल लावून भांग पाडणारी. काही मुली घट्ट वेण्या वगैरे घालतात. वह्या-पुस्तकांचे ओझे सावरत लायब्ररीत दंग असतात. अभ्यास करून, करिअरचे ध्येय बाळगत, आई-वडिलांच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या असतात. इतर मुले अशा विद्यार्थ्यांना तोंडावर स्कॉलर म्हणतात तर पाठीमागे बावळट म्हणून शिक्का मारतात ! यात अडीच वर्षे एकाच वर्गात रेंगाळणारी, पहिल्या वर्षी शॉर्ट अटेंडन्स, दुसऱ्या वर्षी अभ्यासाला वेळच उरला नाही म्हणून ‘थर्ड इयर इन फर्स्ट इयर’ असे स्वत:विषयी त्यातील काही मुले अभिमानाने सांगत असतात. वर्गात जाणाऱ्या शिक्षकांच्या मागे ते निघतातही; पण बाकीची मुले त्यांचे मन:परिवर्तन करतात. शिकवणाऱ्या शिक्षकांपासून दूर पळणारी मुले काहींच्या भोवती कोंडाळे करतात. आज हे बंद उद्या ते बंद कसे ठेवायचे याविषयी त्यांचे मार्गदर्शन घेतात. कारण मोर्चे, आंदोलने या काळात प्राचार्यांना अशांचाच तर आधार वाटतो. विद्यार्थ्यांची जेव्हा मिटिंग भरते तेव्हा वर्ग झाले नाहीत तर परीक्षांचे काय होणार याच्या काळजीने काहींचे चेहरे काळवंडले असतात. कँटीन चांगले हवे. पिकनिक वरच्या वर असाव्यात. प्रेझेंटीची अट नसावी. या मागण्यांसाठी बाकीचे एकवटून चढ्या स्वरात बोलत असतात. मिटिंग संपताच अधिकतर मुले कोणत्याशा सिनेमा थिएटरकडे वळतात. त्यातील भडक नाचगाण्यांवरच्या चर्चेत ते दंग असतात. परीक्षा आली की अभ्यासू मुलांचे चेहरे काळजीने काळवंडलेले तर बाकीच्यांच्या चेहऱ्यावर अतीव प्रसन्नता असते. परीक्षा काही कारणाने पुढे ढकलल्या जातात. आपल्या विद्यामंदिरांमध्ये सारे काही आलबेल असल्याचा गोड समज मात्र सगळीकडे कायम असतो. शिक्षणमंत्रीही तृप्ततेने सांगत असतात, ‘आॅल इज वेल’, विद्यामंदिर हे हळूहळू अविद्यामंदिर होत चालले आहे, हे त्यांच्या गावीही नसते !- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -