शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या ओसाडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:09 IST

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते.

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते. पुरोगामित्वाचे ढोल बडविणा-या महाराष्ट्रात सध्या हीच परिस्थिती आहे. शासनाचा आडमुठेपणा आणि अंगणवाडी कर्मचा-यांच्या हट्टामुळे महिन्याभरापासून राज्यातील लाखो बालके आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित झाल्या असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पोषण आहाराच्या माध्यमाने मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणारी यंत्रणाच मोडकळीस आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नाही, हे येथील जनतेचे दुर्दैवच म्हणायचे. मानधनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात सरकारला अपयश आले असून वाटाघाटी फिसकटल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्धार राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. त्यात हा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेला आहे. त्याला पुढे काय वळण मिळणार यावर लाखो जीवांचे आरोग्य अवलंबून आहे. महिला व बालविकास विभागाद्वारे एकात्मक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण ९७,४७५ अंगणवाड्या व ११,१७५ मिनी अंगणवाड्यांमधून सहा वर्षांपर्यंतची ७९ लाख १२ हजार बालके व जवळपास साडेबारा लाख स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. या कामाची जबाबदारी दोन लाख अंगणवाडी कर्मचाºयांवर आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात तीन हजार अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील ६० हजारावर बालके त्यांचा लाभ घेतात. अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनिसांना अडीच हजार रुपये असे अत्यल्प मानधन दिले जात असल्याने त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांची मागणी रास्तच आहे. परंतु सरकार ती मानायला तयार नाही. या कोंडीत कुपोषित बालके नाहक सापडली आहे. राज्य शासनाने आरोग्यसेवा आणि पोषण आहाराच्या मुद्यांना अद्यापही प्राधान्य दिलेले नाही, हे यावरून अधोरेखित होते. राज्यात दरवर्षी १८ हजार मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. उच्च न्यायालयाने याबाबत वारंवार शासनाला फटकारूनही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. मानधनवाढीसाठी बालकांना उपाशी ठेवणे चुकीचे आहे, असे शासनाचे म्हणणे आहे. पण त्यांच्या आहाराची जबाबदारी सांभाळणाºया सेविकांना आदराने मानधन देण्याची मात्र तयारी नाही. आणखी काही दिवस हा प्रश्न असाच चिघळत राहिल्यास त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार