शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंगणवाड्या ओसाडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:09 IST

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते.

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते. पुरोगामित्वाचे ढोल बडविणा-या महाराष्ट्रात सध्या हीच परिस्थिती आहे. शासनाचा आडमुठेपणा आणि अंगणवाडी कर्मचा-यांच्या हट्टामुळे महिन्याभरापासून राज्यातील लाखो बालके आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित झाल्या असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पोषण आहाराच्या माध्यमाने मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणारी यंत्रणाच मोडकळीस आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नाही, हे येथील जनतेचे दुर्दैवच म्हणायचे. मानधनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात सरकारला अपयश आले असून वाटाघाटी फिसकटल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्धार राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. त्यात हा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेला आहे. त्याला पुढे काय वळण मिळणार यावर लाखो जीवांचे आरोग्य अवलंबून आहे. महिला व बालविकास विभागाद्वारे एकात्मक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण ९७,४७५ अंगणवाड्या व ११,१७५ मिनी अंगणवाड्यांमधून सहा वर्षांपर्यंतची ७९ लाख १२ हजार बालके व जवळपास साडेबारा लाख स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. या कामाची जबाबदारी दोन लाख अंगणवाडी कर्मचाºयांवर आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात तीन हजार अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील ६० हजारावर बालके त्यांचा लाभ घेतात. अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनिसांना अडीच हजार रुपये असे अत्यल्प मानधन दिले जात असल्याने त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांची मागणी रास्तच आहे. परंतु सरकार ती मानायला तयार नाही. या कोंडीत कुपोषित बालके नाहक सापडली आहे. राज्य शासनाने आरोग्यसेवा आणि पोषण आहाराच्या मुद्यांना अद्यापही प्राधान्य दिलेले नाही, हे यावरून अधोरेखित होते. राज्यात दरवर्षी १८ हजार मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. उच्च न्यायालयाने याबाबत वारंवार शासनाला फटकारूनही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. मानधनवाढीसाठी बालकांना उपाशी ठेवणे चुकीचे आहे, असे शासनाचे म्हणणे आहे. पण त्यांच्या आहाराची जबाबदारी सांभाळणाºया सेविकांना आदराने मानधन देण्याची मात्र तयारी नाही. आणखी काही दिवस हा प्रश्न असाच चिघळत राहिल्यास त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार