शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या ओसाडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 03:09 IST

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते.

समाजाचे सुदृढ असणे हे सर्वस्वी त्या राज्यातील आरोग्य आणि शिक्षणाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतु याकडेच दुर्लक्ष झाले की मग कुपोषित पिढी निर्माण होण्याचे भय असते. पुरोगामित्वाचे ढोल बडविणा-या महाराष्ट्रात सध्या हीच परिस्थिती आहे. शासनाचा आडमुठेपणा आणि अंगणवाडी कर्मचा-यांच्या हट्टामुळे महिन्याभरापासून राज्यातील लाखो बालके आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित झाल्या असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पोषण आहाराच्या माध्यमाने मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणारी यंत्रणाच मोडकळीस आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना दोघांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नाही, हे येथील जनतेचे दुर्दैवच म्हणायचे. मानधनवाढीच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात सरकारला अपयश आले असून वाटाघाटी फिसकटल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्धार राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. त्यात हा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेला आहे. त्याला पुढे काय वळण मिळणार यावर लाखो जीवांचे आरोग्य अवलंबून आहे. महिला व बालविकास विभागाद्वारे एकात्मक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण ९७,४७५ अंगणवाड्या व ११,१७५ मिनी अंगणवाड्यांमधून सहा वर्षांपर्यंतची ७९ लाख १२ हजार बालके व जवळपास साडेबारा लाख स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. या कामाची जबाबदारी दोन लाख अंगणवाडी कर्मचाºयांवर आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात तीन हजार अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील ६० हजारावर बालके त्यांचा लाभ घेतात. अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनिसांना अडीच हजार रुपये असे अत्यल्प मानधन दिले जात असल्याने त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांची मागणी रास्तच आहे. परंतु सरकार ती मानायला तयार नाही. या कोंडीत कुपोषित बालके नाहक सापडली आहे. राज्य शासनाने आरोग्यसेवा आणि पोषण आहाराच्या मुद्यांना अद्यापही प्राधान्य दिलेले नाही, हे यावरून अधोरेखित होते. राज्यात दरवर्षी १८ हजार मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. उच्च न्यायालयाने याबाबत वारंवार शासनाला फटकारूनही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. मानधनवाढीसाठी बालकांना उपाशी ठेवणे चुकीचे आहे, असे शासनाचे म्हणणे आहे. पण त्यांच्या आहाराची जबाबदारी सांभाळणाºया सेविकांना आदराने मानधन देण्याची मात्र तयारी नाही. आणखी काही दिवस हा प्रश्न असाच चिघळत राहिल्यास त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार