शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

गर्भारपण आणि अपत्यजन्माच्या काळात संगीताची जादुई कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 10:18 IST

भारतातील प्रत्येक राज्यात स्त्रीचे गर्भारपण आणि अपत्यजन्माचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती आहेत. त्यात गाणेही येते. या काळात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण!

शरत पांडे

भारतात  दरवर्षी ११ एप्रिलला सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो. कस्तुरबा गांधी यांचा हा जन्मदिवस. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा महिला सक्षमीकरणाचे प्रतीक होत्या. सर्वांना निरोगी आयुष्य मिळून सर्वांचे कल्याण व्हावे यादृष्टीने शाश्वत विकासाच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांशी भारताने हा दिवस साजरा करणे हे सुसंगतच होय. मातेचे आरोग्य भारतही महत्त्वाचे मानतो. 

गर्भारपण, अपत्याचा जन्म आणि नंतरचा काळ हा स्वास्थ्यकारक जाण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. एक उपचार पद्धती म्हणून त्याकडे पाहिले जाते. संगीत भावस्थितीवर अत्यंत अनुकूल परिणाम करते. तणाव कमी करते आणि शीण घालवते. मातेची काळजी घेण्याच्या अन्य प्रयत्नांबरोबर संगीताचा उपयोग अनेक प्रकारे लाभदायी ठरतो. भारतीय लोकसंगीत वैविध्यपूर्ण आहे; कारण भारतात सांस्कृतिक वैविध्य आहे. वेगवेगळ्या भाषा, बोलीत, ठेक्यात ते गायले जाते. 

गर्भारपण आणि अपत्यजन्म या काळात तणाव आणि चिंता लक्षणीयरीत्या वाढतात. भारतातील प्रत्येक राज्यात स्त्रीचे गर्भारपण आणि अपत्य जन्माचे स्वागत करण्याच्या अनोख्या पद्धती आहेत. त्यात गाणेही येते. ‘द इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन मॅटर्नल हेल्थ, ॲन इम्पिरिकल ॲनॅलिसिस’ या आपल्या लेखात तन्वी कश्यप आणि प्राध्यापक अनुराधा शर्मा यांनी प्रसूतीपूर्व आणि पश्चात काळात संगीताचा वापर करणे कसे लाभदायी ठरते यावर प्रकाश टाकला आहे. आधीच्या प्रसूतीदरम्यान ज्या स्त्रियांना त्रास झाला होता त्यांची प्रसूती संगीतामुळे सुलभ झाल्याचे दाखले त्या देतात. संगीत गुंगी आणणारे, बधीर करणारे परिणाम साधते. वेदना शमनासाठी त्याचा उपयोग होतो. प्रसूतीच्या वेळी मातेला असह्य कळा सोसाव्या लागतात. आल्हादकारक संगीतामुळे या कळा सुसह्य होतात. ‘गेट कंट्रोल थिअरी ऑफ पेन’ असे या उपचार पद्धतीला म्हटले जाते. आदिवासींमध्ये अपत्य जन्माच्या वेळी ढोल वाजवण्याचा प्रघात आहे. ढोलाच्या लयबद्ध आवाजामुळे मातेला प्रसूती सुसह्य होण्यास मदत होते. 

भावना उद्दिपित करून नाती जोडण्याची क्षमता संगीतात आहे. जन्म घेतलेल्या मुलाबरोबर संगीत ऐकणे किंवा पाळणा गीत म्हणणे यातून बाळ आणि माता यांच्यातील नाते दृढ होते. सामूहिकपणे गाणी म्हणण्याचाही रिवाज काही ठिकाणी आहे. आधुनिक काळात बाळाला अंघोळ घालणे हा एक महत्त्वाचा समारंभ असतो. आईला त्यातून कुटुंबाचा भावनिक पाठिंबा मिळतो. पूर्वी उत्तर भारतात गोदभराई केली जात असे. तामिळनाडूत वलईकप्पू किंवा कर्नाटकात सीमांथ, आंध्रात पेलीकुतुरू याचबरोबर बंगालीत शाड आणि राजस्थानमध्ये श्रीमंथम असे विधी साजरे केले जातात. होऊ घातलेल्या मातेला इस्पितळातील वातावरण बेचैन करते अशा वेळी मंद संगीत उपयोगी पडते. उत्तराखंडमध्ये जागर हे पारंपरिक लोकसंगीत बाळंतपण सुखरूप व्हावे याकरिता वापरतात. ख्रिश्चन समाजातही मातेला धीर देण्यासाठी गाणी म्हणतात, सामूहिक प्रार्थना करतात. अनेक मुस्लीमबहुल संस्कृतीत परंपरेने चालत आलेली अंगाई गीते आढळतात. अशा प्रसंगी गाण्यातून प्रेम, सुरक्षा, नात्यांचे बंध पक्के केले जातात. आपण कुटुंबात सुरक्षित आहोत हा भाव बाळापर्यंत पोहोचतो. अपत्य जन्मानंतरही संगीत उपयोगी पडते. प्रसूतीकाळात मोठ्या स्थित्यंतरातून जात असलेल्या स्त्रीला त्याचा आधार मिळतो. 

काश्मीरमध्ये वनवून हे पारंपरिक लोकसंगीत सादर करून नवजात बाळाचे सर्वजण स्वागत करतात. गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात संगीत ऐकल्याने बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्याचा धोका कमी होतो. शिवाय त्यासाठी अन्य उपचार घ्यावे लागल्यास येणाऱ्या खर्चापेक्षा संगीतोपचार स्वस्तही पडतो असे संशोधनात आढळून आले आहे. थोडक्यात सुरक्षित मातृत्वाची सांगड संगीतोपचार पद्धतीशी घातल्याने मातेचे शरीर आणि मनाची काळजी घेण्याचा समग्रलक्ष्यी प्रयत्न केला जातो. सुप्रजननाच्या दृष्टीने संगीताचा उपयोग मोलाचा आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला