शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

चीनला शिकवला चांगलाच धडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:03 IST

भारत-चीन यांच्यातील गलवान येथील संघर्ष, सेनादलांतील सैनिक पातळीवरील भरतीची अग्निपथ योजना, आगामी पुस्तक आदी बाबींवर जनरल नरवणे यांनी यावेळी मत व्यक्त केले.

मुद्द्याची गोष्ट :  माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे गुरुवारी (15 ऑगस्ट रोजी) स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी-विश्व शांती विद्यापीठात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ‘लोकमत’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डन्ट सचिन दिवाण यांनी त्यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. भारत-चीन यांच्यातील गलवान येथील संघर्ष, सेनादलांतील सैनिक पातळीवरील भरतीची अग्निपथ योजना, आगामी पुस्तक आदी बाबींवर जनरल नरवणे यांनी यावेळी मत व्यक्त केले.

लडाखमधील गलवान येथे १५-१६ जून २०२० रोजी भारत आणि चीन यांच्या सैन्यांत झटापट झाली. त्यात भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल भारतानेही चीनचे अनेक सैनिक ठार मारले. चीनने त्यांचे केवळ चार ते पाच सैनिक मारले गेल्याचे मान्य केले, तर भारताच्या मते तो आकडा साधारण ४० च्या आसपास आहे. याबाबत विचारले असता जनरल नरवणे म्हणाले की, नेमके किती चिनी सैनिक मारले गेले. याच्या तपशिलात मी जात नाही; पण त्या दिवशी भारतीय सैन्याने चीनला चांगलाच धडा शिकवला, इतके मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.

चीनच्या लडाखमधील घुसखोरीबाबत उलटसुलट माहिती समोर आली आहे. त्याने याविषयी संभ्रमात भर पडली आहे. चीनने अद्याप लडाखच्या देप्सांग भागातून माघार घेतलेली नाही. हे प्रकरण घडले तेव्हा लष्करप्रमुखपदाची सूत्रे आपल्या हाती होती. या प्रकरणात काही तरी चूक झाले आहे, एवढे नक्की. नेमका दोष कोणाचा आहे, असे विचारले असता जनरल नरवणे यांनी सांगितले की, यात काही चूक झाली आहे, असे मला वाटत नाही. लडाखमध्ये भारत आणि चीन यांची सीमारेषा अद्याप स्पष्टपणे आखलेली नाही. दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या दावा रेषा आहेत. त्यामधील प्रदेशाबाबत वाद आहे. तो मिटविणे गरजेचे आहे.

दोन्ही देशांमध्ये सीमा व्यवस्थापनासंदर्भात विविध करार झाले होते. मात्र, चीनने नेहमीच थोड्या-थोड्या प्रमाणात भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याला सलामी स्लाइसिंग असे म्हटले जाते. एकेका स्वतंत्र घटनेवेळी तिचा मोठा परिणाम जाणवत नाही; पण दीर्घकाळात त्याचा एकत्रित परिणाम मोठा होतो. अशाप्रकारे चीनने सीमावर्ती प्रदेशातील परिस्थितीत बदल घडवलेला असतो. हे कोठे तरी थांबवण्याची गरज होती. गलवान येथील घटनेननंतर भारतीय सेनादलांनी चीनच्या या हालचालींना खंबीरपणे तोंड दिले आहे.

आत्मचरित्रात आक्षेपार्ह काय?जनरल नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी : ॲन ऑटोबायोग्राफी अशा शीर्षकाचे आत्मचरित्र पेंग्विन प्रकाशन संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी प्रकाशित होणे अपेक्षित होते. त्यात नरवणे यांनी अग्निपथ योजना सरकारने लागू केल्यानंतर धक्का बसला, असे नमूद केले असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन स्थगित करण्यात आले. सध्या या पुस्तकाचा संरक्षण मंत्रालयाकडून आढावा घेतला जात आहे. पुस्तकात नेमके काय आक्षेपार्ह आहे, असे विचारले असता जनरल नरवणे यांनी सांगितले की, माझे काम पुस्तक लिहून देण्याचे होते. ते मी पूर्ण केले.पुढील परवानगी वगैरे घेण्याचे काम प्रकाशकांचे आहे. सध्या संरक्षण मंत्रालयाकडून या पुस्तकाचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर ते प्रकाशित होईल. नेमका कोणत्या मजकुराबाबत आक्षेप आहे, ते संरक्षण मंत्रालयच सांगू शकेल.

अग्निपथ योजनेला स्थिरावण्यास वेळ द्यायला हवाभारतीय सेनादलांनी सैनिक पातळीवरील भरतीसाठी जुनी पद्धत सोडून अग्निपथ ही नवी योजना लागू केली आहे. त्यानुसार दरवर्षी भूदल, नौदल आणि वायू दलात अग्विवीरांची चार वर्षांसाठी भरती केली जाते आणि चार वर्षांनंतर त्यातील केवळ २५ टक्के सैनिकांना सेवेत कायम करून घेण्याची तरतूद आहे.या योजनेवर बरीच टीका होत आहे. त्याविषयी जनरल नरवणे म्हणाले की, कोणतेही धोरण फेरआढावा घेण्यासाठी खुले असते. मात्र, एखादी योजना लागू केल्यानंतर तिला स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. तिच्या अंमलबजावणीनंतर जो प्रतिसाद येतो तो विचारात घेऊन योजनेत काही बदल करता येऊ शकतात.त्यात काळ्या दगडावरची रेघ आखल्यासारखे काही नाही. संरक्षणमंत्र्यांनीही या योजनेत गरज भासल्यास बदल करण्याची तयारी दाखवली आहे. तेव्हा मला वाटते की, या योजनेला स्थिर होऊ देण्यास थोडा वेळदिला पाहिजे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवान