शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आनंदघन नव्हे चिंतेचे ढग, अभ्यासकांपुढे मोठे आव्हान; अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:31 IST

सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

यंदा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर मान्सून दाखल होणार, यंदाचे पर्जन्यमान देशाच्या सरासरीइतके किंवा झालेच तर त्याहून अधिक असेल. यंदा पाऊस लहरी राहणार नाही, सगळीकडे सारखा बरसेल वगैरे भारतीय हवामान खात्याने गेल्या महिना-दीड महिन्यात देशवासीयांना दिलेल्या आनंदवार्ता वाऱ्यावर उडून गेल्या आहेत. सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

हिंदी महासागरातून मोठ्या जोशात निघालेले मोसमी पावसाचे ढग मध्येच थबकले, अडकले. गोवा व कोकण किनारपट्टीवर पडणारा पाऊस महाराष्ट्रात सह्याद्री घाटमाथ्यावर सुखाचा सांगावा धाडतो. गोव्यात पाऊस पडतोय पण, तो मान्सूनचा नाही. मान्सून पश्चिमेकडे बंगळुरू, कारवारमध्ये तर पूर्व किनाऱ्यावर पुदुचेरीपर्यंतच पाेहोचला आहे. मध्य भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नवतपा संपल्यानंतर, अगदी मृग नक्षत्राची सुरुवात होतानाही उन्हाच्या प्रचंड झळा सुरू आहेत. परिणामी, हवामान खात्याने दिलेल्या आनंदवार्ता चिंता व निराशा बनतात की काय, असे वाटू लागले आहे.

हवामान खात्याचा जवळचा किंवा लांबचा अंदाज चुकणे आता सवयीचे झाले आहे. अब्जावधी रुपये खर्च करून उभी केलेली हवामान खात्याची डॉपलर रडार, निरीक्षणकेंद्रे, अद्ययावत यंत्रसामग्री ही यंत्रणा, त्यात काम करणारे शेकडो हवामानशास्त्रज्ञ १४० कोटी जनतेला पावसाचा तंतोतंत अंदाज देऊ शकत नाहीत. त्यामुळे हंगामाचे व वर्षभराचे शेती, अर्थकारणाचे नियोजन शक्य होत नाही. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागते. जगातील प्रगत देशांना शक्य झाले ते भारतात का नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते. दुबार पेरणीचे संकट ओढवते, आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचा गैरफायदा अनेकजण घेतात.

बोगस बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात. हे पाहता हवामान खाते पावसाचे अंदाज देताना अन्य शक्याशक्यतांचा विचार करीत नाही का, असा प्रश्न पडतो. कारण, भारतात सारे काही मोसमी पावसावर अवलंबून आहे. हिंदी महासागरात दूरवर मान्सूनचे ढग घेऊन उत्तरेकडे निघायला तयार हाेत असतात तेव्हा देश उष्णतेच्या झळांनी त्रस्त असतो. मान्सून दक्षिण किनाऱ्यावर धडकतो तेव्हा उत्तर भारतात उष्णतेची लाट असते. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या दोन्ही शाखा अर्धगोलाकार आकारात एकमेकांच्या हातात हात घालून भारतीय उपखंड कवेत घेत पुढे सरकत जातात.

देशाच्या वायव्य टोकावर, राजस्थानच्या सीमावर्ती भागात जुलैमध्ये मोसमी पाऊस पोहोचतो तेव्हा दक्षिणेकडे पिकांची कापणी सुरू झालेली असते. हा प्रवास दरवर्षी कमीअधिक प्रमाणात असाच होतो. कधी अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ तर कधी ला निनो म्हणजे तापमानात घट या कारणांनी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे वाहणाऱ्या, पाण्याने लदबदलेल्या ढगांची दिशा बदलते, ढगांची जलघनता कमीअधिक होते आणि त्याचा परिणाम पावसाच्या प्रमाणावर होतो.

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतुमानात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आदींमुळे मोसमी पाऊस अलीकडे अधिक लहरी बनला आहे. ऋतुमान विस्कळीत झाले आहे. हिवाळ्यात पाऊस किंवा पावसाळ्यात दडी असे प्रकार वाढले आहेत. जुलैमधील पाऊस कमी होऊन तो अलीकडच्या जूनमध्ये वाढल्याचे तर ऑगस्टमधील पाऊस सप्टेंबरमध्ये सरकल्याच्या काही नोंदी आहेत. प्रशांत व हिंदी या दोन महासागरांसह मान्सूनसाठी अनेक घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्यामुळे कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या पलीकडील भूप्रदेशासारखा नेमका अंदाज मोसमी पावसाबद्दल देणे जिकरीचे व जटील आहे, हे खरे.

परंतु, आता आपण एकविसाव्या शतकात, डिजिटल युगात आहोत. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात माणसांचे जगणे सुखकर बनविण्याइतके प्रगत विज्ञान हातात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवी इतिहासातील सर्वोच्च बिंदू गाठला आहे. कित्येक प्रकाशवर्षे दूर अशा ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांचा, तसेच महासागराच्या खोल तळाचा वेध घेण्याइतके प्रगत विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध असताना पावसाच्या अंदाजासाठी नशिबावर अवलंबून राहावे लागणे अजिबात भूषणावह नाही. आपले शास्त्रज्ञ व अभ्यासकांपुढे हे मोठे आव्हान आहे.  

टॅग्स :Rainपाऊस