शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आनंदघन नव्हे चिंतेचे ढग, अभ्यासकांपुढे मोठे आव्हान; अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:31 IST

सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

यंदा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर मान्सून दाखल होणार, यंदाचे पर्जन्यमान देशाच्या सरासरीइतके किंवा झालेच तर त्याहून अधिक असेल. यंदा पाऊस लहरी राहणार नाही, सगळीकडे सारखा बरसेल वगैरे भारतीय हवामान खात्याने गेल्या महिना-दीड महिन्यात देशवासीयांना दिलेल्या आनंदवार्ता वाऱ्यावर उडून गेल्या आहेत. सरकारी हवामान खाते किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी सांगितलेला केरळमध्ये मोसमी पावसाच्या बरसातीचा महूर्तही नेमकेपणाने साधला नाही. मोसमी पाऊस दाखल झाला की नाही, यावरूनही हवामान खाते व स्कायमेट यांच्यात चकमक उडाली.

हिंदी महासागरातून मोठ्या जोशात निघालेले मोसमी पावसाचे ढग मध्येच थबकले, अडकले. गोवा व कोकण किनारपट्टीवर पडणारा पाऊस महाराष्ट्रात सह्याद्री घाटमाथ्यावर सुखाचा सांगावा धाडतो. गोव्यात पाऊस पडतोय पण, तो मान्सूनचा नाही. मान्सून पश्चिमेकडे बंगळुरू, कारवारमध्ये तर पूर्व किनाऱ्यावर पुदुचेरीपर्यंतच पाेहोचला आहे. मध्य भारतात जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नवतपा संपल्यानंतर, अगदी मृग नक्षत्राची सुरुवात होतानाही उन्हाच्या प्रचंड झळा सुरू आहेत. परिणामी, हवामान खात्याने दिलेल्या आनंदवार्ता चिंता व निराशा बनतात की काय, असे वाटू लागले आहे.

हवामान खात्याचा जवळचा किंवा लांबचा अंदाज चुकणे आता सवयीचे झाले आहे. अब्जावधी रुपये खर्च करून उभी केलेली हवामान खात्याची डॉपलर रडार, निरीक्षणकेंद्रे, अद्ययावत यंत्रसामग्री ही यंत्रणा, त्यात काम करणारे शेकडो हवामानशास्त्रज्ञ १४० कोटी जनतेला पावसाचा तंतोतंत अंदाज देऊ शकत नाहीत. त्यामुळे हंगामाचे व वर्षभराचे शेती, अर्थकारणाचे नियोजन शक्य होत नाही. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागते. जगातील प्रगत देशांना शक्य झाले ते भारतात का नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते. दुबार पेरणीचे संकट ओढवते, आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचा गैरफायदा अनेकजण घेतात.

बोगस बी-बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात. हे पाहता हवामान खाते पावसाचे अंदाज देताना अन्य शक्याशक्यतांचा विचार करीत नाही का, असा प्रश्न पडतो. कारण, भारतात सारे काही मोसमी पावसावर अवलंबून आहे. हिंदी महासागरात दूरवर मान्सूनचे ढग घेऊन उत्तरेकडे निघायला तयार हाेत असतात तेव्हा देश उष्णतेच्या झळांनी त्रस्त असतो. मान्सून दक्षिण किनाऱ्यावर धडकतो तेव्हा उत्तर भारतात उष्णतेची लाट असते. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या दोन्ही शाखा अर्धगोलाकार आकारात एकमेकांच्या हातात हात घालून भारतीय उपखंड कवेत घेत पुढे सरकत जातात.

देशाच्या वायव्य टोकावर, राजस्थानच्या सीमावर्ती भागात जुलैमध्ये मोसमी पाऊस पोहोचतो तेव्हा दक्षिणेकडे पिकांची कापणी सुरू झालेली असते. हा प्रवास दरवर्षी कमीअधिक प्रमाणात असाच होतो. कधी अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ तर कधी ला निनो म्हणजे तापमानात घट या कारणांनी विषुववृत्ताच्या उत्तरेकडे वाहणाऱ्या, पाण्याने लदबदलेल्या ढगांची दिशा बदलते, ढगांची जलघनता कमीअधिक होते आणि त्याचा परिणाम पावसाच्या प्रमाणावर होतो.

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतुमानात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आदींमुळे मोसमी पाऊस अलीकडे अधिक लहरी बनला आहे. ऋतुमान विस्कळीत झाले आहे. हिवाळ्यात पाऊस किंवा पावसाळ्यात दडी असे प्रकार वाढले आहेत. जुलैमधील पाऊस कमी होऊन तो अलीकडच्या जूनमध्ये वाढल्याचे तर ऑगस्टमधील पाऊस सप्टेंबरमध्ये सरकल्याच्या काही नोंदी आहेत. प्रशांत व हिंदी या दोन महासागरांसह मान्सूनसाठी अनेक घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्यामुळे कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या पलीकडील भूप्रदेशासारखा नेमका अंदाज मोसमी पावसाबद्दल देणे जिकरीचे व जटील आहे, हे खरे.

परंतु, आता आपण एकविसाव्या शतकात, डिजिटल युगात आहोत. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात माणसांचे जगणे सुखकर बनविण्याइतके प्रगत विज्ञान हातात आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मानवी इतिहासातील सर्वोच्च बिंदू गाठला आहे. कित्येक प्रकाशवर्षे दूर अशा ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहताऱ्यांचा, तसेच महासागराच्या खोल तळाचा वेध घेण्याइतके प्रगत विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध असताना पावसाच्या अंदाजासाठी नशिबावर अवलंबून राहावे लागणे अजिबात भूषणावह नाही. आपले शास्त्रज्ञ व अभ्यासकांपुढे हे मोठे आव्हान आहे.  

टॅग्स :Rainपाऊस