शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा!

By संदीप प्रधान | Updated: March 13, 2024 07:50 IST

भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. एकाकी वृद्धांच्या मानसिक गरजांची तीव्रता समजूनच घेतली जात नाही.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे

माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी एका ६७ वर्षांच्या महिलेसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच पुरुषसुलभ आंबटशौकीन प्रतिक्रियांचा तडका त्याला दिला गेला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील अविवाहित किंवा विधूर सदस्यांना मरडॉक यांच्या आचरणाचे शहाजोग सल्लेही दिले गेले. 

गतवर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ५७ व्या वर्षी लग्न केल्याची बातमी अशीच खमंग चर्चेचा विषय ठरली होती. अभिनेते आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये काही वर्षांपूर्वी जयंत जोशी व लीना जोशी हे जोडपे सहभागी झाले होते. जयंत यांच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर जयंत एकाकी पडले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. लीना यांनी जयंत यांच्याशी विवाह केला. भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे केवळ पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. 

गेल्या काही वर्षांत एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलगा व सून अथवा मुलगी आणि जावई दूर राहतात. वृद्ध जोडपी एकत्र असतात तोपर्यंत उभयतांना एकमेकांचा आधार असतो. परंतु जोडीदाराचे निधन झाल्यावर खरी पंचाईत होते. 

पत्नीचे निधन झाल्याने विधूर पुरुषांचे हाल अधिक होतात. अनेकांना घरकामाची सवय नसते. त्यामुळे जेवणाखाणाचे हाल सुरू होतात. परिणामी प्रकृती ढासळते. खिशात पैसा असूनही एकाकीपणा व प्रकृती अस्वास्थ्य यामुळे ते त्रस्त होतात. मुंबई, ठाण्यासह कोकण प्रांतात ५५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या संघाच्या वतीने त्यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. 

मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. पोलिस ठाण्यांना त्यांच्या क्षेत्रातील एकट्या वृद्धांची माहिती दिलेली असते. पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना विचारपूस करणारा फोन जाईल, याची व्यवस्था केलेली असते. केवळ ठाणे शहरात असे ८१ एकाकी वृद्ध स्त्री-पुरुष आहेत ज्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जाते. मात्र सामाजिक दडपणामुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे उतारवयात विवाह करून एकाकी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग पत्करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा ४० ते ४२ वर्षांचा संसार झाल्यानंतर जोडीदाराचे निधन होते तेव्हा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक असते. तीन ते सहा महिन्यांत जर मागे राहिलेला जोडीदार दु:ख व एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर आला नाही तर हळूहळू मानसिक आजारांना बळी पडतो. आत्महत्येचाही प्रयत्न होतो. जोडीदारापैकी एकाचे निधन झाल्याने डिप्रेशन येणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आपली मुले, नातवंडे यांच्यासोबत बॉन्डिंग किती आहे यावर बरेच अवलंबून असते. अनेकांचे आपला मुलगा अथवा मुलगी किंवा सून आणि जावई यांच्याशी वादविवाद होत असल्याने त्यांच्या घरात त्यांना स्थान नसते. अशा व्यक्तींमध्ये एकाकीपणाची भावना वाढण्याची शक्यता अधिक असते. 

उतारवयातील विवाहाकडे पाश्चिमात्य फॅड म्हणून पाहिले जाते. पाश्चिमात्य देशांत मुलगा-मुलगी १८ वर्षांचे होताच आई-वडिलांना दुरावतात. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत असली तरी आई-वडिलांकडे ढुंकूनही पाहायचे नाही, अशी पद्धत नाही. त्यामुळे उतारवयात लग्नाचा विचार बोलून दाखवायला एकाकी पालक तयार होत नाही व आम्ही तुमच्याकडे बघायला असताना तुम्ही या फंदात का पडता, अशी भूमिका मुले घेतात. अर्थात, कालांतराने भारतामधील ज्येष्ठ नागरिकांना या पर्यायाचा विचार करावा लागेल. उतारवयातील विवाह हा शारीरिक भूक भागवण्यापेक्षा मानसिक आधाराकरता आहे हा विचार त्याकरता रुजणे गरजेचे आहे. 

टॅग्स :marriageलग्न