शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा!

By संदीप प्रधान | Updated: March 13, 2024 07:50 IST

भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. एकाकी वृद्धांच्या मानसिक गरजांची तीव्रता समजूनच घेतली जात नाही.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे

माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी एका ६७ वर्षांच्या महिलेसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच पुरुषसुलभ आंबटशौकीन प्रतिक्रियांचा तडका त्याला दिला गेला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील अविवाहित किंवा विधूर सदस्यांना मरडॉक यांच्या आचरणाचे शहाजोग सल्लेही दिले गेले. 

गतवर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ५७ व्या वर्षी लग्न केल्याची बातमी अशीच खमंग चर्चेचा विषय ठरली होती. अभिनेते आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये काही वर्षांपूर्वी जयंत जोशी व लीना जोशी हे जोडपे सहभागी झाले होते. जयंत यांच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर जयंत एकाकी पडले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. लीना यांनी जयंत यांच्याशी विवाह केला. भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे केवळ पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. 

गेल्या काही वर्षांत एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलगा व सून अथवा मुलगी आणि जावई दूर राहतात. वृद्ध जोडपी एकत्र असतात तोपर्यंत उभयतांना एकमेकांचा आधार असतो. परंतु जोडीदाराचे निधन झाल्यावर खरी पंचाईत होते. 

पत्नीचे निधन झाल्याने विधूर पुरुषांचे हाल अधिक होतात. अनेकांना घरकामाची सवय नसते. त्यामुळे जेवणाखाणाचे हाल सुरू होतात. परिणामी प्रकृती ढासळते. खिशात पैसा असूनही एकाकीपणा व प्रकृती अस्वास्थ्य यामुळे ते त्रस्त होतात. मुंबई, ठाण्यासह कोकण प्रांतात ५५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या संघाच्या वतीने त्यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. 

मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. पोलिस ठाण्यांना त्यांच्या क्षेत्रातील एकट्या वृद्धांची माहिती दिलेली असते. पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना विचारपूस करणारा फोन जाईल, याची व्यवस्था केलेली असते. केवळ ठाणे शहरात असे ८१ एकाकी वृद्ध स्त्री-पुरुष आहेत ज्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जाते. मात्र सामाजिक दडपणामुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे उतारवयात विवाह करून एकाकी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग पत्करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा ४० ते ४२ वर्षांचा संसार झाल्यानंतर जोडीदाराचे निधन होते तेव्हा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक असते. तीन ते सहा महिन्यांत जर मागे राहिलेला जोडीदार दु:ख व एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर आला नाही तर हळूहळू मानसिक आजारांना बळी पडतो. आत्महत्येचाही प्रयत्न होतो. जोडीदारापैकी एकाचे निधन झाल्याने डिप्रेशन येणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आपली मुले, नातवंडे यांच्यासोबत बॉन्डिंग किती आहे यावर बरेच अवलंबून असते. अनेकांचे आपला मुलगा अथवा मुलगी किंवा सून आणि जावई यांच्याशी वादविवाद होत असल्याने त्यांच्या घरात त्यांना स्थान नसते. अशा व्यक्तींमध्ये एकाकीपणाची भावना वाढण्याची शक्यता अधिक असते. 

उतारवयातील विवाहाकडे पाश्चिमात्य फॅड म्हणून पाहिले जाते. पाश्चिमात्य देशांत मुलगा-मुलगी १८ वर्षांचे होताच आई-वडिलांना दुरावतात. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत असली तरी आई-वडिलांकडे ढुंकूनही पाहायचे नाही, अशी पद्धत नाही. त्यामुळे उतारवयात लग्नाचा विचार बोलून दाखवायला एकाकी पालक तयार होत नाही व आम्ही तुमच्याकडे बघायला असताना तुम्ही या फंदात का पडता, अशी भूमिका मुले घेतात. अर्थात, कालांतराने भारतामधील ज्येष्ठ नागरिकांना या पर्यायाचा विचार करावा लागेल. उतारवयातील विवाह हा शारीरिक भूक भागवण्यापेक्षा मानसिक आधाराकरता आहे हा विचार त्याकरता रुजणे गरजेचे आहे. 

टॅग्स :marriageलग्न