शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

९२ वर्षांचे रुपर्ट मरडॉक पाचवे लग्न करतात तेव्हा!

By संदीप प्रधान | Updated: March 13, 2024 07:50 IST

भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. एकाकी वृद्धांच्या मानसिक गरजांची तीव्रता समजूनच घेतली जात नाही.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे

माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी एका ६७ वर्षांच्या महिलेसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच पुरुषसुलभ आंबटशौकीन प्रतिक्रियांचा तडका त्याला दिला गेला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील अविवाहित किंवा विधूर सदस्यांना मरडॉक यांच्या आचरणाचे शहाजोग सल्लेही दिले गेले. 

गतवर्षी अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ५७ व्या वर्षी लग्न केल्याची बातमी अशीच खमंग चर्चेचा विषय ठरली होती. अभिनेते आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोमध्ये काही वर्षांपूर्वी जयंत जोशी व लीना जोशी हे जोडपे सहभागी झाले होते. जयंत यांच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर जयंत एकाकी पडले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली. लीना यांनी जयंत यांच्याशी विवाह केला. भारतामध्ये उतारवयातील विवाहाकडे केवळ पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले जाते. 

गेल्या काही वर्षांत एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलगा व सून अथवा मुलगी आणि जावई दूर राहतात. वृद्ध जोडपी एकत्र असतात तोपर्यंत उभयतांना एकमेकांचा आधार असतो. परंतु जोडीदाराचे निधन झाल्यावर खरी पंचाईत होते. 

पत्नीचे निधन झाल्याने विधूर पुरुषांचे हाल अधिक होतात. अनेकांना घरकामाची सवय नसते. त्यामुळे जेवणाखाणाचे हाल सुरू होतात. परिणामी प्रकृती ढासळते. खिशात पैसा असूनही एकाकीपणा व प्रकृती अस्वास्थ्य यामुळे ते त्रस्त होतात. मुंबई, ठाण्यासह कोकण प्रांतात ५५० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. या संघाच्या वतीने त्यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. 

मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते. पोलिस ठाण्यांना त्यांच्या क्षेत्रातील एकट्या वृद्धांची माहिती दिलेली असते. पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना विचारपूस करणारा फोन जाईल, याची व्यवस्था केलेली असते. केवळ ठाणे शहरात असे ८१ एकाकी वृद्ध स्त्री-पुरुष आहेत ज्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जाते. मात्र सामाजिक दडपणामुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे उतारवयात विवाह करून एकाकी जीवनातून मुक्त होण्याचा मार्ग पत्करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा ४० ते ४२ वर्षांचा संसार झाल्यानंतर जोडीदाराचे निधन होते तेव्हा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक असते. तीन ते सहा महिन्यांत जर मागे राहिलेला जोडीदार दु:ख व एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर आला नाही तर हळूहळू मानसिक आजारांना बळी पडतो. आत्महत्येचाही प्रयत्न होतो. जोडीदारापैकी एकाचे निधन झाल्याने डिप्रेशन येणाऱ्यांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आपली मुले, नातवंडे यांच्यासोबत बॉन्डिंग किती आहे यावर बरेच अवलंबून असते. अनेकांचे आपला मुलगा अथवा मुलगी किंवा सून आणि जावई यांच्याशी वादविवाद होत असल्याने त्यांच्या घरात त्यांना स्थान नसते. अशा व्यक्तींमध्ये एकाकीपणाची भावना वाढण्याची शक्यता अधिक असते. 

उतारवयातील विवाहाकडे पाश्चिमात्य फॅड म्हणून पाहिले जाते. पाश्चिमात्य देशांत मुलगा-मुलगी १८ वर्षांचे होताच आई-वडिलांना दुरावतात. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत असली तरी आई-वडिलांकडे ढुंकूनही पाहायचे नाही, अशी पद्धत नाही. त्यामुळे उतारवयात लग्नाचा विचार बोलून दाखवायला एकाकी पालक तयार होत नाही व आम्ही तुमच्याकडे बघायला असताना तुम्ही या फंदात का पडता, अशी भूमिका मुले घेतात. अर्थात, कालांतराने भारतामधील ज्येष्ठ नागरिकांना या पर्यायाचा विचार करावा लागेल. उतारवयातील विवाह हा शारीरिक भूक भागवण्यापेक्षा मानसिक आधाराकरता आहे हा विचार त्याकरता रुजणे गरजेचे आहे. 

टॅग्स :marriageलग्न