शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

३० हजार कोटींसाठी!.........

By admin | Updated: July 10, 2015 22:39 IST

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना जे काँग्रेस-राष्ट्रवादीत घडत होते तेच आता भाजपा-शिवसेनेत सुरु झाल्याचे चित्र आहे. जे काही घडते आहे त्याला मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुक होईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाचा नारा मुंबई दौऱ्यात दिला, त्याच्याही आधी भाजपा शिवसेनेत प्रत्येक छोट्या गोष्टीवरुन धुसफूस सुरु आहे.महापालिकेत शिवसेना वरचढ आहे तर राज्य सरकारमध्ये भाजपा. राज्य सरकारच्या प्रत्येक चुकीवर शिवसेना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. तेच काम महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत भाजपा करीत आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गत नगरसेवकांची चौकशी समिती नेमली. मुंबई तुंबल्याच्या प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेशी आपले काही घेणे देणे नाही, जे काही वाईट घडते आहे, चुकीचे होत आहे त्याची सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे असे चित्र तयार करत शेलार यांनी भाजपाला वेगळे करण्याचा आटापीटा चालवला आहे. ज्यावेळी नाले सफाईची कामे होत होती त्यावेळी भाजपाचे नगरसेवक काय करत होते? त्यांचा याच्याशी काहीच संबंध नसेल तर नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते कमी पडले का, याचा एका शब्दानेही खुलासा न करता स्वत:ला सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून दूर करण्यात शेलार धन्यता मानीत आहेत.शिवसेना देखील हेच करते आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्यावर टीका केली, तेव्हा सामना मधून अग्रलेख लिहिला गेला. तावडेंच्या पदवी प्रकरणावर देखील उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले तर पंकजा मुंडेंचा घोटाळा गंभीर विषय आहे असे सांगत भावाने बहिणीवर टीका केली. सत्तेत असताना सामूहीक जबाबदारी असते याचेही भान न ठेवता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.मुंबईत होणारा कोस्टल रोड हे तर या वादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीलिंक नको असे सांगत कोस्टल रोडची संकल्पना मांडली. त्यांच्या काळात ती होऊ शकली नाही मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिल्लीत अडलेल्या काही परवानग्या मिळवल्या. त्यानंतर आशिष शेलार यांनी जणू काही कोस्टल रोडच पूर्ण झाला या थाटात मुंबईभर पोस्टर लावली. त्यावर शिवसेनेने देखील कोस्टल रोड मनपा करणार आहे, भाजपा सरकार नाही असे सांगून शेलारांच्या पोस्टरवर पाणी टाकले. शेलार हे ‘पोस्टर बॉय’ आहेत अशी मल्लीनाथीही सेनेच्या एका नेत्याने केली. हेच शेलार मुंबईच्या रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकबद्दल का बोलत नाहीत, ई-सॅप प्रणालीमुळे पालिकेच्या झालेल्या नुकसानीबद्दल का आरोप करत नाहीत असे चिमटे सेनेतून घेतले जात आहेत.‘आमचा तो बंडू, तुमचे ते कार्टे’ या न्यायाने दोघेही वागत आहेत. शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी वॉर्डनिहाय माहिती असणाऱ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही अमित शहा यांच्या हस्ते केले होते. त्याच्या मर्यादित प्रती केल्या गेल्या. त्यात जातीनिहाय, समाजनिहाय मतदारांचे गणीत मांडलेले आहे. काही करुन शिवसेनेला महापालिका सोडायची नाही, आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पूर्ण सत्ता हवी आहे. ३० हजार कोटीचे बजेट असणारी पालिकेची सत्ता दोघांनाही हवी आहे त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत दोघांमधील ही भांडणे अशीच वाढत जातील. किंबहुना ती दरवेळी नवनवे रुप घेतील. जाता जाता : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सत्तेत राहून भांडण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, असा (अनाहूत?) सल्ला शिवसेनाला दिला आहे.- अतुल कुलकर्णी