शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार कोटींसाठी!.........

By admin | Updated: July 10, 2015 22:39 IST

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना जे काँग्रेस-राष्ट्रवादीत घडत होते तेच आता भाजपा-शिवसेनेत सुरु झाल्याचे चित्र आहे. जे काही घडते आहे त्याला मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुक होईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाचा नारा मुंबई दौऱ्यात दिला, त्याच्याही आधी भाजपा शिवसेनेत प्रत्येक छोट्या गोष्टीवरुन धुसफूस सुरु आहे.महापालिकेत शिवसेना वरचढ आहे तर राज्य सरकारमध्ये भाजपा. राज्य सरकारच्या प्रत्येक चुकीवर शिवसेना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. तेच काम महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत भाजपा करीत आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गत नगरसेवकांची चौकशी समिती नेमली. मुंबई तुंबल्याच्या प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेशी आपले काही घेणे देणे नाही, जे काही वाईट घडते आहे, चुकीचे होत आहे त्याची सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे असे चित्र तयार करत शेलार यांनी भाजपाला वेगळे करण्याचा आटापीटा चालवला आहे. ज्यावेळी नाले सफाईची कामे होत होती त्यावेळी भाजपाचे नगरसेवक काय करत होते? त्यांचा याच्याशी काहीच संबंध नसेल तर नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते कमी पडले का, याचा एका शब्दानेही खुलासा न करता स्वत:ला सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून दूर करण्यात शेलार धन्यता मानीत आहेत.शिवसेना देखील हेच करते आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्यावर टीका केली, तेव्हा सामना मधून अग्रलेख लिहिला गेला. तावडेंच्या पदवी प्रकरणावर देखील उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले तर पंकजा मुंडेंचा घोटाळा गंभीर विषय आहे असे सांगत भावाने बहिणीवर टीका केली. सत्तेत असताना सामूहीक जबाबदारी असते याचेही भान न ठेवता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.मुंबईत होणारा कोस्टल रोड हे तर या वादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीलिंक नको असे सांगत कोस्टल रोडची संकल्पना मांडली. त्यांच्या काळात ती होऊ शकली नाही मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिल्लीत अडलेल्या काही परवानग्या मिळवल्या. त्यानंतर आशिष शेलार यांनी जणू काही कोस्टल रोडच पूर्ण झाला या थाटात मुंबईभर पोस्टर लावली. त्यावर शिवसेनेने देखील कोस्टल रोड मनपा करणार आहे, भाजपा सरकार नाही असे सांगून शेलारांच्या पोस्टरवर पाणी टाकले. शेलार हे ‘पोस्टर बॉय’ आहेत अशी मल्लीनाथीही सेनेच्या एका नेत्याने केली. हेच शेलार मुंबईच्या रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकबद्दल का बोलत नाहीत, ई-सॅप प्रणालीमुळे पालिकेच्या झालेल्या नुकसानीबद्दल का आरोप करत नाहीत असे चिमटे सेनेतून घेतले जात आहेत.‘आमचा तो बंडू, तुमचे ते कार्टे’ या न्यायाने दोघेही वागत आहेत. शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी वॉर्डनिहाय माहिती असणाऱ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही अमित शहा यांच्या हस्ते केले होते. त्याच्या मर्यादित प्रती केल्या गेल्या. त्यात जातीनिहाय, समाजनिहाय मतदारांचे गणीत मांडलेले आहे. काही करुन शिवसेनेला महापालिका सोडायची नाही, आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पूर्ण सत्ता हवी आहे. ३० हजार कोटीचे बजेट असणारी पालिकेची सत्ता दोघांनाही हवी आहे त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत दोघांमधील ही भांडणे अशीच वाढत जातील. किंबहुना ती दरवेळी नवनवे रुप घेतील. जाता जाता : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सत्तेत राहून भांडण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, असा (अनाहूत?) सल्ला शिवसेनाला दिला आहे.- अतुल कुलकर्णी