शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार कोटींसाठी!.........

By admin | Updated: July 10, 2015 22:39 IST

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेवरुन भाजपात सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजपाने देखील शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणे सुरु केल्यामुळे आघाडी सरकार असताना जे काँग्रेस-राष्ट्रवादीत घडत होते तेच आता भाजपा-शिवसेनेत सुरु झाल्याचे चित्र आहे. जे काही घडते आहे त्याला मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुक होईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वबळाचा नारा मुंबई दौऱ्यात दिला, त्याच्याही आधी भाजपा शिवसेनेत प्रत्येक छोट्या गोष्टीवरुन धुसफूस सुरु आहे.महापालिकेत शिवसेना वरचढ आहे तर राज्य सरकारमध्ये भाजपा. राज्य सरकारच्या प्रत्येक चुकीवर शिवसेना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाही. तेच काम महापालिकेच्या कारभाराच्या बाबतीत भाजपा करीत आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि नाले सफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. त्यासाठी त्यांनी पक्षांतर्गत नगरसेवकांची चौकशी समिती नेमली. मुंबई तुंबल्याच्या प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेशी आपले काही घेणे देणे नाही, जे काही वाईट घडते आहे, चुकीचे होत आहे त्याची सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे असे चित्र तयार करत शेलार यांनी भाजपाला वेगळे करण्याचा आटापीटा चालवला आहे. ज्यावेळी नाले सफाईची कामे होत होती त्यावेळी भाजपाचे नगरसेवक काय करत होते? त्यांचा याच्याशी काहीच संबंध नसेल तर नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते कमी पडले का, याचा एका शब्दानेही खुलासा न करता स्वत:ला सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून दूर करण्यात शेलार धन्यता मानीत आहेत.शिवसेना देखील हेच करते आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्यावर टीका केली, तेव्हा सामना मधून अग्रलेख लिहिला गेला. तावडेंच्या पदवी प्रकरणावर देखील उध्दव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले तर पंकजा मुंडेंचा घोटाळा गंभीर विषय आहे असे सांगत भावाने बहिणीवर टीका केली. सत्तेत असताना सामूहीक जबाबदारी असते याचेही भान न ठेवता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.मुंबईत होणारा कोस्टल रोड हे तर या वादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीलिंक नको असे सांगत कोस्टल रोडची संकल्पना मांडली. त्यांच्या काळात ती होऊ शकली नाही मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिल्लीत अडलेल्या काही परवानग्या मिळवल्या. त्यानंतर आशिष शेलार यांनी जणू काही कोस्टल रोडच पूर्ण झाला या थाटात मुंबईभर पोस्टर लावली. त्यावर शिवसेनेने देखील कोस्टल रोड मनपा करणार आहे, भाजपा सरकार नाही असे सांगून शेलारांच्या पोस्टरवर पाणी टाकले. शेलार हे ‘पोस्टर बॉय’ आहेत अशी मल्लीनाथीही सेनेच्या एका नेत्याने केली. हेच शेलार मुंबईच्या रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकबद्दल का बोलत नाहीत, ई-सॅप प्रणालीमुळे पालिकेच्या झालेल्या नुकसानीबद्दल का आरोप करत नाहीत असे चिमटे सेनेतून घेतले जात आहेत.‘आमचा तो बंडू, तुमचे ते कार्टे’ या न्यायाने दोघेही वागत आहेत. शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी वॉर्डनिहाय माहिती असणाऱ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही अमित शहा यांच्या हस्ते केले होते. त्याच्या मर्यादित प्रती केल्या गेल्या. त्यात जातीनिहाय, समाजनिहाय मतदारांचे गणीत मांडलेले आहे. काही करुन शिवसेनेला महापालिका सोडायची नाही, आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत पूर्ण सत्ता हवी आहे. ३० हजार कोटीचे बजेट असणारी पालिकेची सत्ता दोघांनाही हवी आहे त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत दोघांमधील ही भांडणे अशीच वाढत जातील. किंबहुना ती दरवेळी नवनवे रुप घेतील. जाता जाता : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सत्तेत राहून भांडण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, असा (अनाहूत?) सल्ला शिवसेनाला दिला आहे.- अतुल कुलकर्णी