शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

न्यायमूर्तींची २८ वर्षांपूर्वीची पत्रकार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:37 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी घेतलेली घटना अभूतपूर्व असल्याचे म्हटले गेले. परंतु २८ वर्षांपूर्वी सन १९८९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या. शरद मनोहर यांनीही अशीच पत्रकार परिषद घेतली होती. ती न्यायमूर्तींमधील आपसातील कुलंगड्या बाहेर काढणारी नव्हती.

- अजित गोगटेसर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी घेतलेली घटना अभूतपूर्व असल्याचे म्हटले गेले. परंतु २८ वर्षांपूर्वी सन १९८९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या. शरद मनोहर यांनीही अशीच पत्रकार परिषद घेतली होती. ती न्यायमूर्तींमधील आपसातील कुलंगड्या बाहेर काढणारी नव्हती. मात्र ती पत्रकार परिषदही न्यायालयीन औचित्याला सोडून असल्याने वादग्रस्त ठरली होती.मुंबई महापालिकेने शहरातील एका भागातील अनधिकृत झोपड्या पाडण्याचे योजले. संबंधितांना नोटिसा काढल्या. त्यापैकी काहींनी शहर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यांचे म्हणणे होते की, १९८५ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे महापालिका या झोपड्या पाडू शकत नाही.दिवाणी न्यायालयाने मनार्ई हुकूम देण्यास नकार दिला. प्रकरण अपिलात उच्च न्यायालयात न्या. मनोहर यांच्यापुढे आले. त्यांनी झोपड्यांना संरक्षण देण्याच्या सरकारी धोरणाच्या कायदेशीरपणावर प्रश्नचिन्ह उभे केले. अ‍ॅडव्होकेट जनरलना नोटीस काढली गेली. त्यांनी धोरणाचे समर्थन केले. न्या. मनोहर यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमधील एका तरतुदीचा आधार घेऊन सविस्तर सुनावणी घेऊन अहवाल देण्यासाठी एवढाच मुद्दा दिवाणी न्यायालयातील न्या. भुता यांना मुक्रर केले.न्यायाधीश भुता यांनी कायदेशीर तरतुदींचे परिशीलन करून सरकारी धोरणाला कायदेशीर आधार नसल्याचा अहवाल उच्च न्यायालयास दिला. न्या. मनोहर यांनी त्यावर पुन्हा सुनावणी घेतली आणि १९८५ नंतरच्या सर्व अनधिकृत झोपड्या ४८ तासांत पाडून टाकण्याचा अंतरिम आदेश दिला.पुढे सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला. कालांतराने झोपड्यांच्या संरक्षणाची कालमर्यादा प्रत्येक निवडणुकीपूर्वी वाढत गेली. सरकारनेही या धोरणातील कायदेशीर उणिवा लक्षात घेऊन त्याला वैधानिक पाठबळ दिले.हे प्रकरण सुरू असताना न्या. मनोहर प्रस्तुत प्रतिनिधीस अनेक वेळा चेंबरमध्ये बोलावून घ्यायचे व अनधिकृत झोपड्यांची समस्या कशी गंभीर आहे, यावर भडभडून बोलायचे. यास खंबीरपणे पायबंद केला नाही, तर उद्या याच अनधिकृत झोपड्यांमधील मतदारांच्या जोरावर निवडून आलेले आमदार अधिकृत, कायदेशीर घरांमध्ये राहणाºया मुंबईकरांच्या डोक्यावर बसतील, असे त्यांचे म्हणणे असायचे. चार-पाच वेळा असे बोलणे झाल्यावर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना, तुमचे हे म्हणणे पत्रकार परिषद घेऊन जनतेपुढे का मांडत नाही?, असे सुचविले.त्यानुसार न्या. मनोहर यांनी खरोखरच चर्चगेटजवळ असलेल्या शॅट्यू विण्डसर गेस्ट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपले मन मोकळे केले. या पत्रकार परिषदेतील आक्षेपार्ह भाग असा की, न्या. मनोहर यांनी त्यांच्यापुढे न्यायाधीश म्हणून विचारणीय असलेल्या विषयावर न्यायालयीन निकाल देण्याआधीच आपली व्यक्तिगत मते जाहीरपणे मांडली होती. ते उघडपणे न्यायालयीन औचित्यास सोडून होते. यावरून वादही झाला. परंतु मुख्य न्यायाधीशांच्या परवानगीने पत्रकार परिषद घेतली, असा न्या. मनोहर यांचा बचाव होता.पुढे वर्षभरात न्या. मनोहर यांच्यासह पाच न्यायाधीशांविरुद्ध वकील संघटनांनी अविश्वास ठराव केले. मुख्य न्यायाधीशांनी या पाच न्यायाधीशांकडून न्यायालयीन कामकाज काढून घेतले. न्या. मनोहर यांना निवृत्त व्हायला काहीच महिने शिल्लक होते. त्यामुळे ते वगळून इतर चार न्यायाधीशांच्या अन्य उच्च न्यायालयांवर बदल्या केल्या गेल्या. न्यायालयीन काम नसल्याने न्या. मनोहर येऊन चेंबरमध्ये बसून राहायचे. तशाच मानखंडनेच्या अवस्थेत ते नंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय