शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

संपादकीय - १९८० : इतिहास घडवणाऱ्यांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:47 IST

लोकमत वृत्तसमूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचा आज ९८ वा जन्मदिन. बाबूजींच्या राजकीय जीवनातील एका विलक्षण घटनेचा धांडोळा....

ठळक मुद्देजनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला.

मधुकर भावे

२८ जुलै १९७९ या दिवशी जनता सरकार कोसळले. चरणसिंग यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ते लोकसभेला सामोरेच गेले नाहीत. इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनवले होते. पण, सरकार बनल्यानंतर ताबडतोब श्रीमती इंदिरा गांधी यांनी चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात गेले आणि कोसळले. काळजीवाहू सरकार म्हणून राष्ट्रपतींनी चरणसिंग यांना काम पाहण्यास सांगितले. सरकार कोसळल्यानंतर  इंदिरा गांधी मुंबईला आल्या होत्या. एका भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला, ‘आपने चरणसिंगजी को समर्थन दिया था, बाद में समर्थन वापस लिया. इसकी क्या वजह है?’ इंदिराजी ताडकन म्हणाल्या, ‘काँग्रेस ने चरणसिंगजी को सरकार बनानेके लिए समर्थन दिया था, चलानेके लिए नहीं.’ इंदिराजींचे ते उत्तर खूप गाजले होते. 

मुंबईचा दौरा आटोपून इंदिराजी दिल्लीला गेल्या; कारण लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नवीन आखणी करणे गरजेचे होते. लोक आपल्याबरोबर आहेत याची त्यांना खात्री पटली होती. या प्रचितीची सुरुवात झाली नागपूरपासून आणि त्यातही बाबूजी (जवाहरलाल दर्डा) यांच्या घरी झालेल्या भेटीतून! या भेटीनंतर इंदिराजी पवनारला निघाल्या (३१ ऑगस्ट १९७७) त्यांच्या स्वागतासाठी  पवनारपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा  प्रचंड गर्दी होती.  इंदिराजी पुन्हा सत्तेवर येणार याची खात्री पटवणारी ही गर्दी होती. पवनारचा दौरा आटोपून इंदिराजी पुन्हा दिल्लीला गेल्या. मध्ये दीड वर्ष गेले, इंदिराजींची बदनामी चालूच होती. दरम्यान, चरणसिंग सरकारला पाठिंबा देऊन इंदिराजींनी मोठी राजकीय चाल खेळली. ते सरकार कोसळणारच होते, तसे कोसळले. ताबडतोब लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवायला इंदिराजींनी सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून काही राज्यांतील अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना त्यांनी दिल्लीला बोलावून घेतले. १५ ऑक्टोबर १९७९ या दिवशी प्रचाराची दिशा ठरविण्याकरिता इंदिराजींनी दिल्लीमध्ये महत्त्वाची राजकीय बैठक बोलावली. या बैठकीला त्या वेळचे खासदार वसंत साठे, सी.एम. स्टीफन, राज्यसभेचे खासदार बॅ. ए.आर. अंतुले, कर्नाटकचे गुंडु राव, राजस्थानचे त्या वेळचे मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडीया आणि विदर्भातून जवाहरलाल दर्डा उपस्थित होते. प्रत्येकाने बैठकीत आपापले सादरीकरण करावे, असे सर्वांना आधीच सांगण्यात आले होते. इंदिराजी त्या वेळी १२ विलिग्डंन क्रेसंट रोड येथे राहत असत. बैठक दुपारी ३ वाजता सुरू झाली. या बैठकीत ज्याला ‘सादरीकरण’ म्हणता येईल असे फक्त बाबूजींनी एका चित्रासह  स्पष्ट केले.

जनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला. इंदिराजी म्हणाल्या, “बिलकुल सही है!” देशातील सर्व भाषेत या चित्राचा अर्थ सांगून ती पोस्टर्स लावावीत, असा निर्णय त्या बैठकीत झाला. इंदिराजींच्या सूचनेनुसार देशातील सगळ्या प्रांतात २० डिसेंबर १९७९ ते ७ जानेवारी १९८० च्या निवडणुकीपर्यंत हीच पोस्टर्स झळकली होती. या निवडणुकीत इंदिराजींना बहुमत मिळाले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या.  निवडणुकीपूर्वी जांबुवंतराव धोटे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नागपूरची जागा त्यांनी जिंकली. रामटेकहून जतिराम बर्वे, भंडाऱ्याहून केशवराव पारधी, चंद्रपूरहून शांताराम पोटदुखे, चिमुरहून विलास मुत्तेमवार, अमरावतीहून उषाताई चौधरी, अकोल्याहून मधुसूदन वैराळे, बुलडाण्याहून बाळकृष्ण वासनिक, यवतमाळहून सदाशिवराव ठाकरे असे सर्वच्या सर्व काँग्रेस उमेदवार विदर्भातून विजयी झाले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. 

महाराष्ट्रात ४८ पैकी ४७ जागा त्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकल्या होत्या. १४ जानेवारी १९८० रोजी इंदिराजी  पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि विशेष म्हणजे त्याच रात्री ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या सुरुची भोजन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. त्याच दिवशी त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखतही दिली होती. या सर्व राजकीय लढाईत बाबूजींची भूमिका फार मोठी होती. विदर्भातल्या यशाचे महानायक बाबूजीच होते आणि इंदिराजींचे विश्वासू सहकारीसुद्धा.  देशभर गाजलेल्या त्या राजकीय  पोस्टरचे निर्मातेही बाबूजीच होते. याच निवडणूक प्रचारात मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत इंदिराजी म्हणाल्या होत्या, ‘विदर्भ में मैं लोकमत के हथियार से लड़ रही हूँ।’ या यशाचे पडद्यामागचे सूत्रधार असलेल्या बाबूजींनी केलेल्या कामाची कधी जाहिरात केली नाही. मात्र आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. पुढच्या वर्षी, २ जुलै २०२२ रोजी, बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना, इतिहास घडविणाऱ्यांची आणि लढवणाऱ्यांची नवीन पिढीला माहिती व्हावी, याच भावनेने हे लिहिले आहे. कारण या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

(लेखक लोकमतचे निवृत्त संपादक आहेत)

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी