शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - १९८० : इतिहास घडवणाऱ्यांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:47 IST

लोकमत वृत्तसमूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचा आज ९८ वा जन्मदिन. बाबूजींच्या राजकीय जीवनातील एका विलक्षण घटनेचा धांडोळा....

ठळक मुद्देजनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला.

मधुकर भावे

२८ जुलै १९७९ या दिवशी जनता सरकार कोसळले. चरणसिंग यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. ते लोकसभेला सामोरेच गेले नाहीत. इंदिरा काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनवले होते. पण, सरकार बनल्यानंतर ताबडतोब श्रीमती इंदिरा गांधी यांनी चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात गेले आणि कोसळले. काळजीवाहू सरकार म्हणून राष्ट्रपतींनी चरणसिंग यांना काम पाहण्यास सांगितले. सरकार कोसळल्यानंतर  इंदिरा गांधी मुंबईला आल्या होत्या. एका भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला, ‘आपने चरणसिंगजी को समर्थन दिया था, बाद में समर्थन वापस लिया. इसकी क्या वजह है?’ इंदिराजी ताडकन म्हणाल्या, ‘काँग्रेस ने चरणसिंगजी को सरकार बनानेके लिए समर्थन दिया था, चलानेके लिए नहीं.’ इंदिराजींचे ते उत्तर खूप गाजले होते. 

मुंबईचा दौरा आटोपून इंदिराजी दिल्लीला गेल्या; कारण लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नवीन आखणी करणे गरजेचे होते. लोक आपल्याबरोबर आहेत याची त्यांना खात्री पटली होती. या प्रचितीची सुरुवात झाली नागपूरपासून आणि त्यातही बाबूजी (जवाहरलाल दर्डा) यांच्या घरी झालेल्या भेटीतून! या भेटीनंतर इंदिराजी पवनारला निघाल्या (३१ ऑगस्ट १९७७) त्यांच्या स्वागतासाठी  पवनारपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा  प्रचंड गर्दी होती.  इंदिराजी पुन्हा सत्तेवर येणार याची खात्री पटवणारी ही गर्दी होती. पवनारचा दौरा आटोपून इंदिराजी पुन्हा दिल्लीला गेल्या. मध्ये दीड वर्ष गेले, इंदिराजींची बदनामी चालूच होती. दरम्यान, चरणसिंग सरकारला पाठिंबा देऊन इंदिराजींनी मोठी राजकीय चाल खेळली. ते सरकार कोसळणारच होते, तसे कोसळले. ताबडतोब लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवायला इंदिराजींनी सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून काही राज्यांतील अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना त्यांनी दिल्लीला बोलावून घेतले. १५ ऑक्टोबर १९७९ या दिवशी प्रचाराची दिशा ठरविण्याकरिता इंदिराजींनी दिल्लीमध्ये महत्त्वाची राजकीय बैठक बोलावली. या बैठकीला त्या वेळचे खासदार वसंत साठे, सी.एम. स्टीफन, राज्यसभेचे खासदार बॅ. ए.आर. अंतुले, कर्नाटकचे गुंडु राव, राजस्थानचे त्या वेळचे मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडीया आणि विदर्भातून जवाहरलाल दर्डा उपस्थित होते. प्रत्येकाने बैठकीत आपापले सादरीकरण करावे, असे सर्वांना आधीच सांगण्यात आले होते. इंदिराजी त्या वेळी १२ विलिग्डंन क्रेसंट रोड येथे राहत असत. बैठक दुपारी ३ वाजता सुरू झाली. या बैठकीत ज्याला ‘सादरीकरण’ म्हणता येईल असे फक्त बाबूजींनी एका चित्रासह  स्पष्ट केले.

जनता पक्षाची राजवट म्हणजे काटेरी कुंपण. या काटेरी कुंपणात फसलेल्या सामान्य माणसाला इंदिराजींचा हातच बाहेर काढू शकतो, असे ते चित्र होते. त्या बैठकीत हे चित्र सादर करून बाबूजींनी त्याचा तपशील सांगितला. इंदिराजी म्हणाल्या, “बिलकुल सही है!” देशातील सर्व भाषेत या चित्राचा अर्थ सांगून ती पोस्टर्स लावावीत, असा निर्णय त्या बैठकीत झाला. इंदिराजींच्या सूचनेनुसार देशातील सगळ्या प्रांतात २० डिसेंबर १९७९ ते ७ जानेवारी १९८० च्या निवडणुकीपर्यंत हीच पोस्टर्स झळकली होती. या निवडणुकीत इंदिराजींना बहुमत मिळाले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या.  निवडणुकीपूर्वी जांबुवंतराव धोटे काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि नागपूरची जागा त्यांनी जिंकली. रामटेकहून जतिराम बर्वे, भंडाऱ्याहून केशवराव पारधी, चंद्रपूरहून शांताराम पोटदुखे, चिमुरहून विलास मुत्तेमवार, अमरावतीहून उषाताई चौधरी, अकोल्याहून मधुसूदन वैराळे, बुलडाण्याहून बाळकृष्ण वासनिक, यवतमाळहून सदाशिवराव ठाकरे असे सर्वच्या सर्व काँग्रेस उमेदवार विदर्भातून विजयी झाले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. 

महाराष्ट्रात ४८ पैकी ४७ जागा त्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकल्या होत्या. १४ जानेवारी १९८० रोजी इंदिराजी  पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि विशेष म्हणजे त्याच रात्री ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या सुरुची भोजन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. त्याच दिवशी त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखतही दिली होती. या सर्व राजकीय लढाईत बाबूजींची भूमिका फार मोठी होती. विदर्भातल्या यशाचे महानायक बाबूजीच होते आणि इंदिराजींचे विश्वासू सहकारीसुद्धा.  देशभर गाजलेल्या त्या राजकीय  पोस्टरचे निर्मातेही बाबूजीच होते. याच निवडणूक प्रचारात मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत इंदिराजी म्हणाल्या होत्या, ‘विदर्भ में मैं लोकमत के हथियार से लड़ रही हूँ।’ या यशाचे पडद्यामागचे सूत्रधार असलेल्या बाबूजींनी केलेल्या कामाची कधी जाहिरात केली नाही. मात्र आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. पुढच्या वर्षी, २ जुलै २०२२ रोजी, बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना, इतिहास घडविणाऱ्यांची आणि लढवणाऱ्यांची नवीन पिढीला माहिती व्हावी, याच भावनेने हे लिहिले आहे. कारण या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

(लेखक लोकमतचे निवृत्त संपादक आहेत)

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी