शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दहा रुपयांमध्ये चप्पल मिळते का हो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST

धुळे - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी मिळकत असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे. असे असले तरी तुटपुंज्या मानधनावर ...

धुळे - महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कमी मिळकत असलेल्यांचे जगणे कठीण झाले आहे. असे असले तरी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांचा चप्पल भत्ता मात्र केवळ दहा रुपये इतका आहे.

पूर्वीपासून कोतवालांना मानधनासोबतच चप्पल भत्ता दिला जातो. महागाई वाढली तरी त्यात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे दहा रुपयात कुठे चप्पल मिळते का हो ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

तलाठी कार्यालयात कोतवाल मदतनीस म्हणून काम पाहतात. शेतसारा गोळा करण्यासाठी तलाठ्याला मदत करतात. तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते त्यावेळी पंचनाम्यासाठी मदत करतात. मात्र त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. पदोन्नती मिळावी अशी मागणी कोतवाल संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

२०११ पासून पदोन्नती नाही ...

कोतवालांना २०११ सालापासून पदोन्नती मिळालेली नाही. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. पदोन्नतीच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलने, उपोषणे व मोर्चेही काढले; मात्र काहीएक फायदा झाला नाही. तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील कोतवालांना काम करावे लागत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

कामांची यादी भली मोठी ..

तलाठ्याचा मदतनीस म्हणून कोतवाल काम करतो. गावस्तरावर महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांना मदत करणे. दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीचे नुकसान झाल्यास शेतात जाऊन पंचनामा करण्यासाठी मदत करणे. दुष्काळ यादी, गावातील नुकसानीची माहिती प्रशासनाला देणे, त्यांना सहकार्य करणे . गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची देखभाल करणे आदी कामे कोतवालांना करावी लागतात .

अपुऱ्या मानधनात कसे भागणार ?

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलसह, गॅस व इतर वस्तूचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या महागाईप्रमाणे आमच्या मानधनात कोणतीही वाढ होत नाही. आमचे मानधन जसेच्या तसे आहे. चप्पल भत्तासाठी केवळ दहा रुपये दिले जातात. दहा रुपयात चप्पल मिळणे शक्य तरी आहे का? महागाई वाढत आहे त्यानुसार मानधनातही वाढ करावी अशी आमची मागणी आहे.

- कोतवाल

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मानधनात वाढ झालेली नाही. मानधन वाढावे यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. मागच्या १० वर्षांपासून पदोन्नतीचा प्रश्नही रखडला आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. मानधन वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

- कोतवाल