शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ? कररचनेत बदल न केल्याने करधारकांना दिलासा : युवक, गृहिणी व शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

अर्थसंकल्पातून मोठ्या सवलती मिळालेल्या नाहीत, मात्र आयकरात वाढदेखील झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच रस्ते, रेल्वे व पायाभूत ...

अर्थसंकल्पातून मोठ्या सवलती मिळालेल्या नाहीत, मात्र आयकरात वाढदेखील झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांच्या निधीत महाराष्ट्राला झुकते माफ दिले आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल.

- नरेंद्र नहार, व्यापारी

कापसावरील कस्टम ड्युटी वाढवल्याने कापसाचे भाव काही प्रमाणात वाढतील. मात्र शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पूर्ण करण्यात कितपत यश मिळेल याबाबत शंका वाटते. कृषी क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद होईल अशी अपेक्षा होती. पण, कोणतीही तरतूद न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

- ॲड. प्रकाश पाटील, कृषीभूषण शेतकरी

स्टार्टअपबाबत मोठी घोषणा होईल अशी तरुणांना अपेक्षा होती. मात्र त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने तरुण व्यवसायाच्या संधी शोधात आहेत. व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याच्या योजनांचा लाभ कमी तरुणांना मिळतो.

- मनोज चिंचोरे, युवक

वाहनांचे सुटे भाग महाग होणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. मागील वर्षी ९ महिने पूर्णपणे व्यवसाय बंद होता. वाहन खराब झाल्यास दुरुस्तीसाठी जादा पैसे मोजावे लागतील, त्यामुळे निराशा झाली.

- गोपाल वाघ, ऑटोचालक

मागील वर्षीचीच कर रचना ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे आयकरातील सूट कमी होईल असे वाटत होते. मात्र त्यात बदल न झाल्याने दिलासा मिळाला आहे.

- राहुल अग्रवाल, व्यापारी

निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरावा लागणार नाही अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र बँकेत ठेवी असलेल्या ज्येष्ठांनाही आयकरातून सुटका मिळायला हवी होती.

- शांताराम पाटील, ज्येष्ठ नागरिक

कोरोनाकाळात आमचा रोजगार पूर्णपणे बुडाला होता. अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील व्यावसायिक कामगारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्याबाबत घोषणा झाली नाही.

- गौतम अमृतसागर, भाजीपाला विक्रेता

तांब्याच्या वस्तू महाग होणार आहेत. मात्र विम्याचे हफ्ते व विजेचे बिल स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली. सध्या विजेचे बिल जास्त येत आहे. विजेचे बिल कमी आले तर चांगले होईल.

- सुवर्णा पाटील, गृहिणी

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र व पायाभूत सुविधांच्या विकासाला अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. उद्योग क्षेत्राला गती मिळाली तर अधिक रोजगार निर्मिती व्हायला मदत होईल.

- योगेश सोनवणे, खासगी नोकरदार

अर्थसंकल्पात पेट्रोलवरील सेस वाढवण्यात आला आहे. त्याचा ग्राहकांना कोणताही तोटा होणार नाही. मात्र पेट्रोल व डिझेलवर कोरोना काळात लावलेला अधिभार कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र तशी कोणतीही तरतूद झाली नाही.

- राकेश जगताप, पेट्रोलपंप चालक