शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

पाण्यासाठी आबाल, वृद्धांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:38 PM

न्याहळोद : जलयुक्तची कामे अपूर्ण झाल्याने अत्यल्प फायदा, अक्कलपाड्याच्या आवर्तनाकडे लक्ष

विजय माळी।लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी स्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने नळाजवळ भांडी ठेऊन ग्रामस्थांना ताटकळत उभे रहावे लागत आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उपाय योजना केल्या तरी पांझरेच्या आवर्तनावरच पुढील उन्हाळा अवलंबून राहणार आहे.सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात घरोघरी नळ जोडण्या आहेत. पांझरा नदीकाठी असलेल्या गाव विहिरीतून पाण्याची टाकी भरली जाते. मात्र, येथूनच परिसरातील सात गावांच्या पाणी पुरवठा विहिरी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने मूळ गावातच पाणीटंचाई निर्माण होते.टंचाईवर मात करण्यासाठी युवकांनी श्रमदानातून जुनी पाण्याची टाकी व विहीर दुरुस्ती केली. याचा फायदा झाला; परंतू पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.जलयुक्तची कामे झाली. परंतू गावाची लोकसंख्या व शेत शिवाराचे क्षेत्रफळ पाहता अत्यंत कमी काम झाल्याचे दिसून येत आहे. कामे सर्वत्र झाली तरच जलयुक्त शिवार कामांचा उपयोग होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागातर्फे बुधवारी अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गावाजवळ पोहचल्या नंतर काही दिवसांनी विहिरींची जल पातळी वाढणार आहे. त्यामुळे सर्वांचे या पाण्याच्या आवर्तनाकडे लक्ष लागून आहे. पाणी जूनपर्यंत हवे, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने तब्बल आठ महिने नदी पात्र कोरडे आहे. त्यामुळे गावात प्रथमच पाण्याचे टँकर, बोअरींग करणे, खाजगी शेतकºयाच्या विहिरीचे पाणी घेणे अशा पर्यायी उपाययोजना कराव्या लागल्या. पाणी भरण्यावरून अनेकवेळा वाद देखील झाले. आता आवर्तनाचे पाणी कधी पोहचते, त्यावरच पाणीटंचाई दूर होणे अवलंबून राहणार आहे.पाणी पुरवठा विहिरीतील गळ काढणे, आडवे बोअर करणे यासह जुनी पाणी वितरण व्यवस्थेची गळती बंद केली. शासकीय मदत अजून घेतली नाही.-ज्योती भिल, सरपंच न्याहळोद

टॅग्स :Dhuleधुळे