शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नेरसह भदाणे गावाला पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी अयोग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST

सोडल्याने नेरसह भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित झाले होते. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते. ...

सोडल्याने नेरसह भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित झाले होते. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते. तेव्हा ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. यामुळे अजूनही दोन्ही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून, ग्रामपंचायतसह सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे, देवीदास माळी, कृष्णा खताळ यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

माथेफिरू टँकरचालकाने नेरजवळील सुरत -नागपूर महामार्गावरील नवे भदाणे गावालगत नाल्यात रसायन सोडल्यामुळे ते पांझरा नदीत आले होते. त्यामुळे नदीतील मासे व जीवजंतूंना जीव गमवावा लागला, तर नेर आणि भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या पांझरा नदीकाठावर असल्याने त्यांच्या पाण्यातही रसायनाचे तरंग आल्यामुळे हे पाणी नागरिकांसाठी जीवघेणे ठरणार होते. त्यामुळे तातडीने नेर ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन चार दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतर या पाण्याचे नमुने जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेने या पाण्याचे नमुने तपासून ग्रामपंचायतीला अहवाल दिला आहे. त्यानुसार नेर आणि भदाणे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागणार आहेत.

असा आहे अहवाल....

पिण्यास अयोग्य आढळलेल्या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरिनची प्रक्रिया करून व सीक्ष्मजीवीय पुनर्तपासणीमध्ये पिण्यास योग्य असल्यास खात्री झाल्यानंतरच ते पाणी पिण्यास वापरण्यात यावे, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ यांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीसह सामाजिक कार्यकर्ते धावले. गावाला पाणीपुरवठा करणारे पाणी दूषित झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नेर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खलाणे, देवीदास माळी यांनी टँकरने गावात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे, तसेच ग्रामपंचायतीने पाणी सोडून ग्रामस्थांना हे पाणी गरम करून केवळ अन्य कामांसाठी वापरावे, असे आवाहन केले आहे. भदाणे येथेही सामाजिक कार्यकर्ते कृष्णा खताळ यांनी टँकरने गावाला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

पुन्हा प्रयोगशाळेत नमुने पाठविले.

शुक्रवारी पाणी तपासणीचा अहवाल आला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने पुन्हा विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन ते जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. हा अहवाल आल्यानंतच नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडावे की नाही, याचा निर्णय ग्रामपंचायत घेणार आहे.