शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:19 IST

उन्हाळा : थंड पेयाची दुकाने बंद, यंदा पाण्यावरच भागतेय तहान, उन्हाळ्यात घरगुती उपायांवर भर, रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : एप्रिल महिन्यात उन्हाची तिव्रता वाढली असून चटके जाणवू लागले आहेत़ शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे़एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांची संचारबंदी तर दुसरीकडे कडक उन्हाळा पडला आहे़ त्यामुळे उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत़ रस्त्यावर माणसांची रहदारी कमी असल्याने तेवढा परिणाम जावणत नाही़ मात्र कोरोनाच्या संकटामुळे थंड पेयावरही संकट उभे ठाकले आहे़त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांना थंड पेयाऐवजी आपली तहान घरातील पाण्यावर भागवावी लागत आहे़ बाजारात कलिंगड विक्रीला येतात पण ग्राहकच नसल्याने कवडीमोल भावाने ही फळे विकावी लागत आहेत़ऋतुकाळाप्रमाणे एप्रिल महिला सुरू होताच उष्णतेचे चटके बसू लागले आहेत़ खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे़ बाहेर फिरतांना उष्णतेचे चटके अंगाला जाणवतात़ कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक दुकाने वगळता शहरात सर्वच बंद ठेवण्यात आले आहेत़ त्यामुळे शीतपेय तसेच इतर फळे मिळणे आता दुरापास्त बनले आहे़पहाटे-सकाळच्या सुमारास हवेत थोडा गारवा असला तरी बाराच्या नंतर अचानक उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते़ बाजारात लॉकडाऊन असल्याने एक तर गर्दी नसते़ त्यामुळे उन्ह्याची तीव्रता जाणवत नाही़अंगातून घामाच्या धारा वाहात असल्याने गर्मीचे प्रमाण अधिक वाढलेले असेच जाणवते़ लॉकडाऊन काळात पोलिस सतत रस्त्यावर असतात़ त्यांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे़ सध्या गावागावात लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणीही दिसत नाही़ तसेच मुले क्रिकेट खेळतानांही दिसत नाही़ त्यामुळे मुलांना घरातच बसावे लागत आहे़गेल्या वर्षापर्यंत उन्हाळा आला की सुटीचे दिवस सुरू झाले असे म्हणावे लागत असत़अनेकजण सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी नदीपात्रात पोहण्यासाठी अथवा मोकळ्या जागेवर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी जात असत, पण यावेळी तशी संधीही मिळत नाही़ बाहेर जाणे सोडा पण स्वत:च्या घरातून बाहेर पडतांना पोलिसांची लाठी आता पाठीत पडेल की नंतर अशीच स्थिती सध्या सर्वत्र आहे़ त्यामुळे थंड पेय लॉकडाऊनच्या गर्तेत सापडले आहेत़गेल्या २१ दिवसांपासुन घरात राहून कंटाळलेल्या नागरीकांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा आहे़ परंतु मुख्यमंत्र्यांनी ३० तारखेपर्यंत लॉकडाउन कायम केल्याने चिंता वाढली आहे़प्रकल्पांमधील सध्याचा जलसाठाशिरपुरात घराघरात पाण्याची तीव्रता सध्यातरी भासत नसली तरी करवंद धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट होतांना दिसत आहे़ तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी सध्यातरी घटत आहे़ आजपर्यंत करवंद धरणात ४० टक्के पाण्याचा साठा कागदोपत्री दिसत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ अनेर धरणात ५८ टक्के पाण्याचा साठा आहे़ अभणपूर धरणात ४५ टक्के, बुडकी १२, गधडदेव २८, जळोद १५, कालीकराड १६, खामखेडा १५, लौकी २२, मिटगांव ५, नांदर्डे ४५, रोहिणी २, विखरण ४, वाडी ७, वकवाड धरणात ७ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे़

टॅग्स :Dhuleधुळे