शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:19 IST

उन्हाळा : थंड पेयाची दुकाने बंद, यंदा पाण्यावरच भागतेय तहान, उन्हाळ्यात घरगुती उपायांवर भर, रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : एप्रिल महिन्यात उन्हाची तिव्रता वाढली असून चटके जाणवू लागले आहेत़ शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे़एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांची संचारबंदी तर दुसरीकडे कडक उन्हाळा पडला आहे़ त्यामुळे उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत़ रस्त्यावर माणसांची रहदारी कमी असल्याने तेवढा परिणाम जावणत नाही़ मात्र कोरोनाच्या संकटामुळे थंड पेयावरही संकट उभे ठाकले आहे़त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांना थंड पेयाऐवजी आपली तहान घरातील पाण्यावर भागवावी लागत आहे़ बाजारात कलिंगड विक्रीला येतात पण ग्राहकच नसल्याने कवडीमोल भावाने ही फळे विकावी लागत आहेत़ऋतुकाळाप्रमाणे एप्रिल महिला सुरू होताच उष्णतेचे चटके बसू लागले आहेत़ खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे़ बाहेर फिरतांना उष्णतेचे चटके अंगाला जाणवतात़ कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक दुकाने वगळता शहरात सर्वच बंद ठेवण्यात आले आहेत़ त्यामुळे शीतपेय तसेच इतर फळे मिळणे आता दुरापास्त बनले आहे़पहाटे-सकाळच्या सुमारास हवेत थोडा गारवा असला तरी बाराच्या नंतर अचानक उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते़ बाजारात लॉकडाऊन असल्याने एक तर गर्दी नसते़ त्यामुळे उन्ह्याची तीव्रता जाणवत नाही़अंगातून घामाच्या धारा वाहात असल्याने गर्मीचे प्रमाण अधिक वाढलेले असेच जाणवते़ लॉकडाऊन काळात पोलिस सतत रस्त्यावर असतात़ त्यांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे़ सध्या गावागावात लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणीही दिसत नाही़ तसेच मुले क्रिकेट खेळतानांही दिसत नाही़ त्यामुळे मुलांना घरातच बसावे लागत आहे़गेल्या वर्षापर्यंत उन्हाळा आला की सुटीचे दिवस सुरू झाले असे म्हणावे लागत असत़अनेकजण सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी नदीपात्रात पोहण्यासाठी अथवा मोकळ्या जागेवर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी जात असत, पण यावेळी तशी संधीही मिळत नाही़ बाहेर जाणे सोडा पण स्वत:च्या घरातून बाहेर पडतांना पोलिसांची लाठी आता पाठीत पडेल की नंतर अशीच स्थिती सध्या सर्वत्र आहे़ त्यामुळे थंड पेय लॉकडाऊनच्या गर्तेत सापडले आहेत़गेल्या २१ दिवसांपासुन घरात राहून कंटाळलेल्या नागरीकांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा आहे़ परंतु मुख्यमंत्र्यांनी ३० तारखेपर्यंत लॉकडाउन कायम केल्याने चिंता वाढली आहे़प्रकल्पांमधील सध्याचा जलसाठाशिरपुरात घराघरात पाण्याची तीव्रता सध्यातरी भासत नसली तरी करवंद धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट होतांना दिसत आहे़ तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी सध्यातरी घटत आहे़ आजपर्यंत करवंद धरणात ४० टक्के पाण्याचा साठा कागदोपत्री दिसत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ अनेर धरणात ५८ टक्के पाण्याचा साठा आहे़ अभणपूर धरणात ४५ टक्के, बुडकी १२, गधडदेव २८, जळोद १५, कालीकराड १६, खामखेडा १५, लौकी २२, मिटगांव ५, नांदर्डे ४५, रोहिणी २, विखरण ४, वाडी ७, वकवाड धरणात ७ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे़

टॅग्स :Dhuleधुळे