शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भरड धान्य खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

शासनाकडून दरवर्षी मका, हरभरा, ज्वारी हे भरडधान्य शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केले जाते़. त्यासाठी नोंदणी आवश्यक असते़. येथील केंद्र ...

शासनाकडून दरवर्षी मका, हरभरा, ज्वारी हे भरडधान्य शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केले जाते़. त्यासाठी नोंदणी आवश्यक असते़. येथील केंद्र शेतकरी सहकारी संघाकडे हे खरेदी केंद्र असून ३० एप्रिलपर्यंत भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे़. त्यांच्याच शेतमालाची खरेदी केली जाणार आहे़ ६८० शेतकऱ्यांनी या केंद्रांवर नोंदणी केली आहे़ त्यात २९४ शेतकऱ्यांनी मकाची नोंदणी केली आहे़ ३७४ शेतकरी ज्वारीचे तर १२ लोकांनी गव्हाची नोंदणी केली आहे़ मकाला १८५०, ज्वारी २६२० तर गव्हाला १९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने हमीभाव जाहीर केला आहे़

१ मे ते ३० जूनपर्यंत भरडधान्यांची खरेदी केली जाणार होती, परंतु राज्यात कुठेही भरडधान्याची खरेदी सुरू झालेली नाही़ . वरिष्ठ पातळीवरून अद्यापपर्यंत खरेदीचे आदेश मिळालेले नाहीत़. एकरी किती शेतमाल घ्यावा हे देखील सूचित करण्यात आलेले नाही़. त्यामुळे एका शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त किती माल खरेदी करावा हे मात्र अद्यापही गुलदस्तात आहे़

गेल्यावर्षी रब्बीचे उत्पादन हाती येताच कोरोनामुळे टाळेबंदी झाली़ शेतकऱ्यांना उत्पादित शेतमाल दोन महिने घरात सांभाळून ठेवावा लागला़ यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते़ मात्र, यंदा चांगले उत्पन्न आले तर पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी त्रास सहन करावा लागत आहे़. कडक ऊन असतानादेखील शेतकरी उन्हाची पर्वा न करता मार्केट आवारात वाहनांची रांगा लावून थांबलेले असतात़. मात्र, यावर्षी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़

मार्केट सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना या वेळेत आपले धान्य विक्रीसाठी आणणे शक्य होत नाही़ त्याचा परिणाम धान्याची आवक मंदावली आहे तसेच भावातही काहीशी घसरण झाली आहे़

बाजारभाव कमी

येथील मार्केटला मका १ हजार ३००, ज्वारीला १ हजार ५० व गहू १ हजार ५२६ रुपयांप्रमाणे खरेदी केला जात आहे़ गरजू शेतकरी हमीभावाकडे दुर्लक्ष करून मिळेल त्या भावाने शेतमाल विक्री करत आहे़ मालाची विक्री केल्यानंतर शेती उपयोगी साहित्य व बी-बियाणांची खरेदी करताना शेतकरी दिसत आहे़ हमीभावापेक्षा मका ५००, ज्वारी १६०० तर गहू ३०० रुपये कमी भावाने खरेदी केला जात आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत शेतमाल गरजेअभावी विकावा लागत आहे़