शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर शहराबाहेरून त्वरित बायपास करावा, ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निजामपूर : निजामपूर शहराबाहेरून वळण रस्ता त्वरित व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपालिकेच्यावतीने मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निजामपूर : निजामपूर शहराबाहेरून वळण रस्ता त्वरित व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामपालिकेच्यावतीने मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नासिक यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.

सरवड - ब्राह्मणवेल या राज्य मार्ग क्रमांक १३ चे निजामपूर गावातील मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठेतून निर्माण कार्य होत आहे. यामुळे अवजड वाहनांची व अन्य वाहनांची वर्दळ वाढेल आणि या रस्त्याच्या दुतर्फा शाळा, बँका, दवाखाने, दुकाने, मंगल कार्यालये, मंदिर, रहिवासी घरे असून, वाढणाऱ्या वर्दळीमुळे भविष्यात दुर्घटना व प्राणहानी होण्याची भीती व्यक्त होते आहे. तसेच गावातील प्रदूषणही वाढेल. यातून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीर होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे गावासाठी बाह्यवळण रस्ता होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांची व परिसरातील जनतेची ही मागणी जुनीच आहे. बाह्यवळण रस्त्यासाठी प्राथमिक अहवालसुद्धा तयार असून, मंजुरीची प्रतीक्षा आहे. निजामपूर गावातून शेवाळी - नेत्रन हा ७५३ बी राष्ट्रीय महामार्गही जातो. या महामार्गावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ग्रामस्थांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने निजामपूर गावासाठी त्वरित बाह्यवळण रस्ता व्हावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत निवेदनातून करण्यात आली आहे. निजामपूर शहराबाहेर वळण रस्ता तत्काळ मंजूर होण्याबाबत विनंतीवजा निवेदन मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नासिक यांना सरपंच प्रतिनिधी मिलिंद भार्गव व जाकीर तांबोळी यांनी दिले. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषिमंत्री दादा भुसे, साक्री आमदार, बांधकाम सचिव, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), मंत्रालय, मुंबई अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांना पाठविल्या आहेत.

180921\img-20210917-wa0266.jpg

मुख्य अभियंता सार्व बांधकाम नासिक याना निवेदन देतांना मिलिंद भार्गव,जाकीर तांबोळी