शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

मालपूर धरणात अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता ...

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती व नाई नदीवरील संगमावर पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती धरण बांधण्यात आलेले आहे. त्या काळी या नद्यांना बारमाही पाणी असायचे. सध्या या नद्या कोरड्या आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास, धरण भरते हे दोन वर्षांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. नैसर्गिक परिस्थिती बघता, परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात अमरावती व नाई नदीला मोठा पूर येतो. मात्र, या वर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाचा होत असल्यामुळे धरणात अद्याप जलसाठा झालेला नाही.

यामुळे धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत या वर्षी भरलेले नाही. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अशीच परिस्थिती तालुक्यातील वाडी शेवाडी, धरणांची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी होताना दिसून येत आहे. मालपूरसह तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस होऊन धरणे अद्यापपर्यंत निम्मेही भरलेली नाहीत. मुसळधार पाऊस न झाल्यास, येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील या मध्यम प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा जमा झालेला नाही. विशेषत: बहुतांशी सर्व प्रकल्प कोरडेच आहेत.

मालपूरसह परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मालपूर धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता ६.७६ दलघमी असताना, आतापर्यंत या पावसाळ्यात २२२ मी. पाण्याचा साठा म्हणजेच २८ टक्के पाण्याने भरले आहे. या धरणाची सर्वोत्तम पाणीपातळी २२५.७० मीटर असल्याचे सांगितले जाते.

पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. त्यानंतर, पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमजू लागली होती. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली होती. अशा वेळी येथून आवर्तन सोडण्यात आले होते.

दरम्यान, पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांसाठी विहिरींना पाणी असणे गरजेचे आहे. आगामी काही दिवसांत अजून दमदार पाऊस झाला, तरच विहिरींनाही पाणी येईल, अन्यथा त्याचा परिणाम रब्बीच्या हंगामावर होऊ शकेल.