शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

मालपूर धरणात अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता ...

मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प २८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास धरण कोरडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती व नाई नदीवरील संगमावर पर्यटनस्थळाच्या वरील बाजूस धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती धरण बांधण्यात आलेले आहे. त्या काळी या नद्यांना बारमाही पाणी असायचे. सध्या या नद्या कोरड्या आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास, धरण भरते हे दोन वर्षांच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे. नैसर्गिक परिस्थिती बघता, परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे धरण आहे. ज्याच्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात अमरावती व नाई नदीला मोठा पूर येतो. मात्र, या वर्षी पावसाळा हा अत्यल्प स्वरूपाचा होत असल्यामुळे धरणात अद्याप जलसाठा झालेला नाही.

यामुळे धरण पूर्ण क्षमतेने अद्यापपर्यंत या वर्षी भरलेले नाही. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. जोरदार पाऊस झाल्याशिवाय धरण भरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अशीच परिस्थिती तालुक्यातील वाडी शेवाडी, धरणांची झालेली आहे. या सर्व सिंचन प्रकल्पांची पाण्याची पातळी कमी होताना दिसून येत आहे. मालपूरसह तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस होऊन धरणे अद्यापपर्यंत निम्मेही भरलेली नाहीत. मुसळधार पाऊस न झाल्यास, येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील या मध्यम प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा जमा झालेला नाही. विशेषत: बहुतांशी सर्व प्रकल्प कोरडेच आहेत.

मालपूरसह परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मालपूर धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता ६.७६ दलघमी असताना, आतापर्यंत या पावसाळ्यात २२२ मी. पाण्याचा साठा म्हणजेच २८ टक्के पाण्याने भरले आहे. या धरणाची सर्वोत्तम पाणीपातळी २२५.७० मीटर असल्याचे सांगितले जाते.

पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. त्यानंतर, पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमजू लागली होती. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली होती. अशा वेळी येथून आवर्तन सोडण्यात आले होते.

दरम्यान, पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांसाठी विहिरींना पाणी असणे गरजेचे आहे. आगामी काही दिवसांत अजून दमदार पाऊस झाला, तरच विहिरींनाही पाणी येईल, अन्यथा त्याचा परिणाम रब्बीच्या हंगामावर होऊ शकेल.