शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

स्कूल बसमधून विकला जातोय भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

भूषण चिंचोरे धुळे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसचालकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने काही ...

भूषण चिंचोरे

धुळे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसचालकांवर बेरोजगारीची वेळ आल्याने काही चालकांनी भाजीपाला विकण्यासाठी, तर काहींनी खाद्यपदार्थ विकण्यासाठी स्कूल बसचा वापर सुरू केला आहे.

मागील वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिकत आहेत. मात्र त्यांना शाळेत वेळेत सोडणाऱ्या व शाळा सुटल्यानंतर घरी सुरक्षित घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शाळा बंद झाल्याने त्यांची मिळकत मागील दीड वर्षांपासून थांबली आहे. दीड वर्षातील बहुतांश काळ कडक लॉकडाऊन लावण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांना प्रवासी वाहतूकदेखील करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे काही स्कूल बसचालकांनी आपल्या वाहनाचा वापर करत भाजीपाला विक्री, तर काहींनी पाव, खारी आदी खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गाडीवरील कर्ज कसे फेडणार

कोरोना संसर्गामुळे मोठे नुकसान झाले आहे. दीर्घ काळापासून शाळा बंद असल्याने वाहने जागेवरच उभी आहेत. आता वाहनांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता सतावते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याची गरज आहे.

- राजू माळी, गाडीमालक

कोरोनापूर्वी रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जायचो. मात्र कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने रोजगार बुडाला आहे. लॉकडाऊन असल्याने प्रवासी वाहतूकदेखील करता येत नव्हती. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

गोपाल वाघ, गाडीमालक

चालकांचे हाल वेगळेच

रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करायचो. आता मात्र शाळा बंद असल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजीपाला घेऊन जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतो व स्टॉल लावून भाजीपाला विक्री करत आहे.

- संदीप पाटील

शाळा बंद होतील व रोजगार जाईल, असे कधीच वाटले नव्हते. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद झाल्याने मिळकत पूर्णपणे थांबली होती. कोरोनाच्या काळात प्रवासी वाहतूकदेखील करू शकत नव्हतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नारळ विक्री, खारी विक्री आदी व्यवसाय केले.

विलास निकम

असा होतोय स्कूल बसचा वापर

१ - देवपूर येथील रहिवासी संदीप पाटील हे आपल्या रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण करीत होते. मात्र कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांचा रोजगार पूर्णपणे गेला. त्यामुळे त्यांनी रिक्षाचा वापर करीत भाजीपाला विक्री सुरू केली आहे.

२ - संदीप पाटील आपल्या रिक्षाचा वापर भाजीपाला विक्रीसाठी करत आहेत. भाजीपाला मार्केट येथून रिक्षातून भाजीपाला आणतात व शहरात विविध ठिकाणी स्टॉल लावून भाजीपाला विक्री करतात.

३ शाळा बंद झाल्याने स्कूल बसचालक विलास निकम यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यामुळे त्यांनी नारळ विक्री तसेच खारी-टोस्ट विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे.