शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रामायणातून भारतीय संस्कृतीची मूल्ये प्रकट होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ...

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, रामदास स्वामी यांचे वंशज भूषण स्वामी होते.

राज्यपाल काेश्यारी पुढे म्हणाले, आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते. अशा विद्वान, संत-महात्म्यांचा हा देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळलेला आहे. एवढेच नाही तर विदेशातही मंत्र-तंत्र, योगा याचा प्रभाव वाढत चालला आहे. जगातील विविध देशांत रामायण पोहोचलेले आहे. श्रीरामाचे समुद्रासारखे गांभीर्य आणि हिमालयासारखे धैर्य सर्वांसाठी आदर्श आहे. श्रीराम हे देशाचे सांस्कृतिक प्रतीक आहे. समर्थ वाग्देवता मंदिरात साहित्याचे भांडार आहे. समर्थ रामदासांच्या साहित्यातील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात देवेंद्र डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखितांविषयी माहिती घेतली. तसेच अभिप्रायही नोंदविला. याप्रसंगी रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या. अंबादास जोशी (मुंबई), डॉ. अरुंधती जोशी (पुणे), डॉ. रूपाली कापडे (संगमनेर), प्रा. डॉ. शोभा शिंदे (धुळे), कलनिधी वासुदेव कामत (मुंबई), बाळूबुवा

रामदासी (सातारा), हर्षवर्धन कुळकर्णी (सातारा), डॉ. नीलेश जोशी वैशंपायन (मुंबई) यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण स्वामी यांनी ‘कल्याणकारी रामदास प्रार्थना’ म्हटली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा बेडकर यांनी तर आभार डॉ. रवींद्र महाजनी यांनी मानले.

यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., ‘उत्तर महाराष्ट्र’चे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

पाच लाखांचा निधी देण्याचे जाहीर

समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्त्वाचे असून, संस्थेच्या कार्यासाठी राज्यपाल कोशातून ५ लाख रुपये देण्याचे कोश्यारी यांनी जाहीर केले.