शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
2
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
3
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
4
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
5
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
6
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
7
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
8
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
9
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
10
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
11
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
12
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
13
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
14
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
15
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
16
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
17
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
18
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
19
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
20
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं

रामायणातून भारतीय संस्कृतीची मूल्ये प्रकट होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ...

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामीलिखित ‘वाल्मीकी रामायण-किष्किंधाकांड’या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, रामदास स्वामी यांचे वंशज भूषण स्वामी होते.

राज्यपाल काेश्यारी पुढे म्हणाले, आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते. अशा विद्वान, संत-महात्म्यांचा हा देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळलेला आहे. एवढेच नाही तर विदेशातही मंत्र-तंत्र, योगा याचा प्रभाव वाढत चालला आहे. जगातील विविध देशांत रामायण पोहोचलेले आहे. श्रीरामाचे समुद्रासारखे गांभीर्य आणि हिमालयासारखे धैर्य सर्वांसाठी आदर्श आहे. श्रीराम हे देशाचे सांस्कृतिक प्रतीक आहे. समर्थ वाग्देवता मंदिरात साहित्याचे भांडार आहे. समर्थ रामदासांच्या साहित्यातील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात देवेंद्र डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मीळ साहित्य व हस्तलिखितांविषयी माहिती घेतली. तसेच अभिप्रायही नोंदविला. याप्रसंगी रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या. अंबादास जोशी (मुंबई), डॉ. अरुंधती जोशी (पुणे), डॉ. रूपाली कापडे (संगमनेर), प्रा. डॉ. शोभा शिंदे (धुळे), कलनिधी वासुदेव कामत (मुंबई), बाळूबुवा

रामदासी (सातारा), हर्षवर्धन कुळकर्णी (सातारा), डॉ. नीलेश जोशी वैशंपायन (मुंबई) यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण स्वामी यांनी ‘कल्याणकारी रामदास प्रार्थना’ म्हटली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा बेडकर यांनी तर आभार डॉ. रवींद्र महाजनी यांनी मानले.

यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., ‘उत्तर महाराष्ट्र’चे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

पाच लाखांचा निधी देण्याचे जाहीर

समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्त्वाचे असून, संस्थेच्या कार्यासाठी राज्यपाल कोशातून ५ लाख रुपये देण्याचे कोश्यारी यांनी जाहीर केले.