शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

दोंडाईचात युरीयाच्या दोनशे बॅग उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:54 PM

दिलासा। मालपूर परिसरातील शेतकऱ्यांना होती खताची प्रतिक्षा

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपून शिवारातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापासून युरिया खताची टंचाई भासत होती़ दरम्यान, कृषी विभागाने युरीया खताच्या २०० बॅग उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़मालपूर येथील शेतकरी दोंडाईचा येथे हातात पैसे घेवुन वणवण भटकत होते. परंतु युरीया खत मिळत नव्हते़ त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकºयांना होती़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित शेतकºयांची व्यथा मांडली होती़ तसेच तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्याकडे सतत पाठपुरावा देखील केला होता़ या वृत्ताची कृषी विभागाने दखल घेत दोंडाईचा येथील एका कृषी दुकानात दोनशे बॅग युरीया खतांचा पुरवठा करण्यात आला़़ खताच्या किमतीवर देखील कृषी विभागाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़मालपूरसह परीसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून आहे़ यामुळे पिकांची देखभाल व योग्य वेळी खत व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे. मात्र हातात पैसे घेवुन येथील शेतकरी वणवण फिरतांना दिसुन येत होते. परंतु खत उपलब्ध होत नव्हते़गरज नसताना खते उपलब्ध होत असतात मात्र गरजेवेळी का नाही. येथे सध्या गेल्या महिनाभरापासून खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत होते़ तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खतांचा लिंक पध्दतीने विक्री करत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होती़ या विषयी कृषी विभागाशी संपर्क केल्यावर देखील शेतकºयांचे समाधान होईल असा प्रतिसाद मिळत नव्हता़मालपूर येथे युरियासह अन्य खतांची नेहमीच टंचाई जाणवत असते. मागेल ते बियाणे व पाहिजे तेवढे खत हा शेतकºयांचा अधिकार आहे़ परंतु कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खतांची विक्री करण्याचा प्रकार दरवर्षी घडतो़ कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नाडला जातो़ येथील बागायती कापुस व कोरडवाहू कापुस या दोघांना खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते़ शेतकºयांना खतासाठी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार अशी भटकंती करावी लागते़ मात्र सध्या कुठेही खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. यामुळे बांधावर खत योजनेचा येथे पुरता फज्जा उडाला असुन दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल अशी स्थिती होती़ आडातच नाही तर पोहºयात कुठुन येईल असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली होती़ मात्र लोकमतच्या वृत्तानंतर शेतकºयांना खत उपलब्ध झाले आहे़ दोंडाईचा येथील दुकानातून शेतकºयांनी खत घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़आॅनलाईन नोंदणीचे काय झाले?कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली होती़ मात्र या नोंदणीचे पुढे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नसल्यामुळे प्रशासनाने शेतकºयांची फसगत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे