शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा पीक धोक्यात

By admin | Updated: February 2, 2016 00:25 IST

कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

विहिरीतील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत असल्याने तसेच कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

सद्य:स्थितीत कांद्याचे दर प्रती क्विंटलला 800 ते एक हजार रुपयांर्पयत आहेत. हाच दर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तीन हजारांर्पयत होता, तर त्या आधी सप्टेंबर्पयत पाच हजार रुपये प्रती क्विंटलने विक्री झाला. कांद्याचे असे चढे दर मिळत असल्याने साहजिकच शेतकरीवर्गाच्या नजरा कांदा पिकाकडे वळल्या. परिणामी दीड ते दोन हजार रुपये प्रती किलोने कांदा बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली व रेकॉर्ड ब्रेक कांदा लागवडही करण्यात आली. त्याला कारणही तसेच होते. बाजारात कांद्याला उच्चांकी भाव मिळतोय. सप्टेंबर महिन्यातील जोरदार पावसाने उपशावर असणा:या विहिरी तुडुंब भरून आल्याने कांदा पीक हमखास निघण्याची खात्री झाली. मात्र त्यानंतर पाऊसच न झाल्याने नद्या-नाले गेल्या दोन महिन्यांपासूनच आटण्यास सुरुवात झाली आहे. केटीवेअर बंधारे, लहान बंधारे पूर्णपणे कोरडे झाल्याने आता गुरांनादेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

विहिरी आटण्याच्या मार्गावर

डिसेंबरर्प्यत ब:यापैकी चालून हंगाम निघण्याची आशा शेतकरीवर्गात बळावली होती. मात्र महिनाभरापासून विहिरीतील पाणीपातळी कमालीची खालावत आहे. दिवसभर चालणा:या विहिरी आता जेमतेम एक ते दीड तासार्पयत टिकून राहतात. तेही दिवसातून एकदाच उपसा होत आहे. एकदा उपसा झाला की, दुस:या दिवशीच पिकांना पाणी मिळत आहे. विहिरींची अशी अवस्था झाल्याने रब्बीतील गव्हाचे पीकही वाया जाण्याची भीती असल्याने कांद्याचे पीक निघण्याची शक्यताच कमी असल्याचे दिसून येत आहे.

कूपनलिकाही पडू लागल्या कोरडय़ा

हजारो रुपये भांडवली खर्च करून कांद्याचे पीक जगविण्यासाठी शेतकरीवर्गाने कंबर कसली आहे. एकीकडे विहिरी दिवसातून जेमतेम उपसा करीत असून, कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. विहिरींवर पूर्ण बागायत होत नसल्याने पाणी अपूर्ण पडू लागल्याने बहुतेक शेतक:यांनी कूपनलिका केल्या आहेत. 700 ते 800 फुटांर्पयत करण्यात आलेल्या कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. एकीकडे विहिरी जेमतेम तासभर चालत असल्याने व कूपनलिकाही बंद पडत असल्याने कांदा पीक जगविण्यासाठी शेतक:यांची घालमेल सुरू झाली आहे.

शेजारील शेतक:यांचीही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याने पाण्याअभावी शेतकरीवर्गावर मोठे संकट घोंगावू पहात आहे. हे संकट उत्तरोत्तर अधिक गहिरे होण्याचे संकेत मिळत असल्याने शेतकरीवर्गही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.