शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

उन्हाळी कांदा पीक धोक्यात

By admin | Updated: February 2, 2016 00:25 IST

कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

विहिरीतील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत असल्याने तसेच कूपनलिकांची पाणीपातळीदेखील खालावत चालल्याने उन्हाळी कांदा पीक धोक्यात आले आहे.

सद्य:स्थितीत कांद्याचे दर प्रती क्विंटलला 800 ते एक हजार रुपयांर्पयत आहेत. हाच दर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तीन हजारांर्पयत होता, तर त्या आधी सप्टेंबर्पयत पाच हजार रुपये प्रती क्विंटलने विक्री झाला. कांद्याचे असे चढे दर मिळत असल्याने साहजिकच शेतकरीवर्गाच्या नजरा कांदा पिकाकडे वळल्या. परिणामी दीड ते दोन हजार रुपये प्रती किलोने कांदा बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली व रेकॉर्ड ब्रेक कांदा लागवडही करण्यात आली. त्याला कारणही तसेच होते. बाजारात कांद्याला उच्चांकी भाव मिळतोय. सप्टेंबर महिन्यातील जोरदार पावसाने उपशावर असणा:या विहिरी तुडुंब भरून आल्याने कांदा पीक हमखास निघण्याची खात्री झाली. मात्र त्यानंतर पाऊसच न झाल्याने नद्या-नाले गेल्या दोन महिन्यांपासूनच आटण्यास सुरुवात झाली आहे. केटीवेअर बंधारे, लहान बंधारे पूर्णपणे कोरडे झाल्याने आता गुरांनादेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

विहिरी आटण्याच्या मार्गावर

डिसेंबरर्प्यत ब:यापैकी चालून हंगाम निघण्याची आशा शेतकरीवर्गात बळावली होती. मात्र महिनाभरापासून विहिरीतील पाणीपातळी कमालीची खालावत आहे. दिवसभर चालणा:या विहिरी आता जेमतेम एक ते दीड तासार्पयत टिकून राहतात. तेही दिवसातून एकदाच उपसा होत आहे. एकदा उपसा झाला की, दुस:या दिवशीच पिकांना पाणी मिळत आहे. विहिरींची अशी अवस्था झाल्याने रब्बीतील गव्हाचे पीकही वाया जाण्याची भीती असल्याने कांद्याचे पीक निघण्याची शक्यताच कमी असल्याचे दिसून येत आहे.

कूपनलिकाही पडू लागल्या कोरडय़ा

हजारो रुपये भांडवली खर्च करून कांद्याचे पीक जगविण्यासाठी शेतकरीवर्गाने कंबर कसली आहे. एकीकडे विहिरी दिवसातून जेमतेम उपसा करीत असून, कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. विहिरींवर पूर्ण बागायत होत नसल्याने पाणी अपूर्ण पडू लागल्याने बहुतेक शेतक:यांनी कूपनलिका केल्या आहेत. 700 ते 800 फुटांर्पयत करण्यात आलेल्या कूपनलिकाही बंद पडू लागल्या आहेत. एकीकडे विहिरी जेमतेम तासभर चालत असल्याने व कूपनलिकाही बंद पडत असल्याने कांदा पीक जगविण्यासाठी शेतक:यांची घालमेल सुरू झाली आहे.

शेजारील शेतक:यांचीही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याने पाण्याअभावी शेतकरीवर्गावर मोठे संकट घोंगावू पहात आहे. हे संकट उत्तरोत्तर अधिक गहिरे होण्याचे संकेत मिळत असल्याने शेतकरीवर्गही हवालदिल झाल्याचे चित्र आहे.