शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कोराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पहिल्या टप्यात ९ वी ते१२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. ...

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कोराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पहिल्या टप्यात ९ वी ते१२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून माध्यमिकच्या शाळा सुरुवातीला ग्रामीण भागात नंतर शहरी भागात सुरू झाल्या.

आता दुसऱ्या टप्यात शहरी व ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी एकाचवेळी म्हणजे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्याप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली. शाळा सुरू होणार असल्याने, शाळांनीही अगोदरच तयारी करून ठेवलेली होती. शाळा परिसर, वर्ग खोल्या स्वच्छ केलेल्या होत्या. एका वर्गात फक्त ५० टक्केच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे आदेश आहेत.

दरम्यान, शाळा सुरू होणार असल्याने, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. कडाक्याची थंडी असतानाही सकाळी ७ वाजेपूर्वी काही ठिकाणी विद्यार्थी शाळेच्या आवारात हजर झालेले होते. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे थर्मल गन हातावर लावून तापमान मोजण्यात आले. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ॲाक्सिमीटरने ॲाक्सिजनचे प्रमाण मोजण्यात आले. एकाही विद्यार्थी-विद्यार्थिनीला कोरोनाची लक्षणे दिसून न आल्याने, शिक्षकांनीही सुटकेचा श्वास सोडला.

अगोदरच शाळा उशिरा सुरू झालेल्या आहेत. तसेच द्वितीय सत्राचा कालावधीही कमी असल्याने, धुळ्यातील अनेक शाळांनी पहिल्या दिवसापासूनच शिकविण्यास सुरूवात केली. तर ग्रामीण भागात मात्र पहिल्या दिवशी ॲानलाईन अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यात आला. पहिला दिवशी फक्त चार तासिका घेण्यात आल्या.

दरम्यान, दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिणी भेटल्याने विद्यार्थ्यांनाही आनंद झालेला होता. तर गेल्या नऊ महिन्यांपासून विद्यार्थ्यांअभावी सुनासुना झालेला शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेला होता.