निवेदनात म्हटले आहे की,
शिंदखेडा शहरासह व परिसरातील शेती पंप आणि घर वापराचे विजेचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना विजेचे प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे शेती उत्पनामध्ये नुकसान होत आहे. तसेच सध्या विद्यार्थी घरीच ऑनलाइन अभ्यास करत आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण करता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे शिंदखेडा शहर व परिसरातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा. निवेदन देतेवेळी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सूरज देसले, अजय मालचे, परेश शिंपी, महेश गुरव, अक्षय वाणी, पंकज राजपूत, बबलू भिल, जयेश देसले आदी उपस्थित होते.