शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

आभासी माध्यमांपासून दूर राहून सकस साहित्य अभिरुची निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची ...

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची मशागत करते. माणूसपण घडवते, समकालीन साहित्यानेच इथली माती समताधिष्ठित ठेवली आहे. त्यामुळे आभासी माध्यमातून दूर राहून सकस साहित्य अभिरुची वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा धुळे व आंतरभारतीय अनुसंधान केंद्र, धुळेचे अध्यक्ष प्राचार्य जयपालसिंह सिसोदिया यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पद्मभूषण डॉ. उदित नारायण मानवविकास संसाधन केंद्र, एशियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नवी दिल्ली व सिंधुुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदी दिवसानिमित्त आयोजित एकदिवसीय हिंदी साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिसोदिया बोलत होते. साहित्य व सामाजिकता या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे आधिव्याख्याता प्रा. पंडित घनःश्याम थोरात यांनी सांगितले की, “सकस साहित्याने सामाजिकतेचे भान कायम ठेवून माणूसपणाचा जागर सतत जागता ठेवला पाहिजे. मुंशी प्रेमचंद यांनी साहित्याने विलक्षण मानवी सौंदर्य जपले. त्याच पाऊल वाटेने प्रत्येक सर्जनशील साहित्यिकांनी आपली प्रतिभा जपावी “असे विचार थोरात यांनी मांडले.

आपल्या विनोदी कवितांनी व राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्य गायनाने ज्येष्ठ कवी डॉ. रमेश जैन यांनी विडंबनात्मक काव्य सादर करुन मानवी जीवनाचे मूल्य प्रकट केेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष सुरेश कुंदनाणी, प्राचार्य अमिर खान, इंग्लिश अकॅडमीचे डी. एम. अहिरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक बापूसाहेब माळी व सिंधूरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक-शिक्षीकावर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शन अमोल माळी यांनी केले.