शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

आभासी माध्यमांपासून दूर राहून सकस साहित्य अभिरुची निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची ...

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची मशागत करते. माणूसपण घडवते, समकालीन साहित्यानेच इथली माती समताधिष्ठित ठेवली आहे. त्यामुळे आभासी माध्यमातून दूर राहून सकस साहित्य अभिरुची वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा धुळे व आंतरभारतीय अनुसंधान केंद्र, धुळेचे अध्यक्ष प्राचार्य जयपालसिंह सिसोदिया यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पद्मभूषण डॉ. उदित नारायण मानवविकास संसाधन केंद्र, एशियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नवी दिल्ली व सिंधुुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदी दिवसानिमित्त आयोजित एकदिवसीय हिंदी साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिसोदिया बोलत होते. साहित्य व सामाजिकता या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे आधिव्याख्याता प्रा. पंडित घनःश्याम थोरात यांनी सांगितले की, “सकस साहित्याने सामाजिकतेचे भान कायम ठेवून माणूसपणाचा जागर सतत जागता ठेवला पाहिजे. मुंशी प्रेमचंद यांनी साहित्याने विलक्षण मानवी सौंदर्य जपले. त्याच पाऊल वाटेने प्रत्येक सर्जनशील साहित्यिकांनी आपली प्रतिभा जपावी “असे विचार थोरात यांनी मांडले.

आपल्या विनोदी कवितांनी व राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्य गायनाने ज्येष्ठ कवी डॉ. रमेश जैन यांनी विडंबनात्मक काव्य सादर करुन मानवी जीवनाचे मूल्य प्रकट केेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष सुरेश कुंदनाणी, प्राचार्य अमिर खान, इंग्लिश अकॅडमीचे डी. एम. अहिरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक बापूसाहेब माळी व सिंधूरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक-शिक्षीकावर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शन अमोल माळी यांनी केले.