शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

आभासी माध्यमांपासून दूर राहून सकस साहित्य अभिरुची निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची ...

धुळे : अस्मितेच्या संघर्षात साहित्याच्या विविधांगी प्रवाहांनीच राष्ट्रीय ऐक्य व संवेदनशीलता कायम जिवंत ठेवली आहे. साहित्य, माणसाच्या मनाची मशागत करते. माणूसपण घडवते, समकालीन साहित्यानेच इथली माती समताधिष्ठित ठेवली आहे. त्यामुळे आभासी माध्यमातून दूर राहून सकस साहित्य अभिरुची वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा धुळे व आंतरभारतीय अनुसंधान केंद्र, धुळेचे अध्यक्ष प्राचार्य जयपालसिंह सिसोदिया यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पद्मभूषण डॉ. उदित नारायण मानवविकास संसाधन केंद्र, एशियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नवी दिल्ली व सिंधुुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदी दिवसानिमित्त आयोजित एकदिवसीय हिंदी साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिसोदिया बोलत होते. साहित्य व सामाजिकता या विषयावर विधी सेवा प्राधिकरणाचे आधिव्याख्याता प्रा. पंडित घनःश्याम थोरात यांनी सांगितले की, “सकस साहित्याने सामाजिकतेचे भान कायम ठेवून माणूसपणाचा जागर सतत जागता ठेवला पाहिजे. मुंशी प्रेमचंद यांनी साहित्याने विलक्षण मानवी सौंदर्य जपले. त्याच पाऊल वाटेने प्रत्येक सर्जनशील साहित्यिकांनी आपली प्रतिभा जपावी “असे विचार थोरात यांनी मांडले.

आपल्या विनोदी कवितांनी व राष्ट्रीय एकात्मतेच्या काव्य गायनाने ज्येष्ठ कवी डॉ. रमेश जैन यांनी विडंबनात्मक काव्य सादर करुन मानवी जीवनाचे मूल्य प्रकट केेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष सुरेश कुंदनाणी, प्राचार्य अमिर खान, इंग्लिश अकॅडमीचे डी. एम. अहिरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक बापूसाहेब माळी व सिंधूरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक-शिक्षीकावर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शन अमोल माळी यांनी केले.