लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा/ मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकºयांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.मालपूरसह परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत आहेत. मात्र, साधे खत देखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. येथे गेल्या आठवड्यापासून युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ आदी खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. यामुळे येथील शेतकरी खत घेण्यासाठी दोंडाईचा येथे जात आहेत. मात्र त्यांना तेथेही खत मिळत नाही. तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खते लिंक पध्दतीने विक्री करीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तसेच याबाबत कृषी विभागाशी संपर्क करुनही समाधान होत नसल्याचे मालपूर परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. त्याला येथील शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली. मात्र, त्याचे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नाही.मालपूर येथे युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ खतांचा साठा संपला असून रॅक लागल्यावरच खते मिळतील, असे येथील दुकानदार सांगत आहेत. मात्र तो साठा येथील क्षेत्रफळाच्या तुलनेत खुपच कमी असतो. दोन ते तीन टन खत मिळते. मात्र, ते पुरत नसल्यामुळे येथे नेहमीच खतांची टंचाई जाणवत असते. शेतकरी मागतील ते बियाणे व हवे तेवढे खत शेतकºयाना मिळाले पाहिजे, यासाठी पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खताची विक्री करणे, हा दरवर्र्षीचा प्रकार आहे. मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना सर्रास नाडले जात आहे.येथील बागायती व कोरडवाहू कापसाला खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार आदी ठिकाणी वणवण फिरत आहेत. मात्र, सद्यस्थितीत कुठेही खत सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बांधावर खत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल, असे म्हणण्याची वेळ येथील शेतकºयांवर आली आहे. शेतकºयांना त्वरित युरिया व खताची उपलब्धता करुन द्यावी.
युरिया खताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:22 IST