शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्कूटरस्वार खासदारांना लोकवर्गणीतून चारचाकी, सामान्य गुरुजी बनले खासदार

By यदू जोशी | Updated: April 7, 2024 07:47 IST

बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेले घंगारे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील घोराडचे. पवनारच्या शाळेत ते शिकले.

 यदु जोशी

१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. काँग्रेस राजीव गांधींच्या नेतृत्वात लढत होती. श्रीपेरंम्बदुरमध्ये राजीवजींची हत्या झाली आणि देश हादरला. काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती. वर्धा लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते आणि आधी याच मतदारसंघातून तीनवेळा खासदार राहिलेले वसंतराव साठे उमेदवार होते. तरीही पूर्वाश्रमीच्या एका सामान्य शिक्षकाने साठे यांचा धक्कादायक पराभव केला. ते होते कॉम्रेड रामचंद्र घंगारे!

बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेले घंगारे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील घोराडचे. पवनारच्या शाळेत ते शिकले. राजकारणात नंतर मोठे यश मिळवलेले दत्ताभाऊ मेघे हे घंगारेंचे वर्गमित्र. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये काही वर्षे शिक्षक राहिल्यानंतर ते वर्धा जिल्ह्यात परतले आणि कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागले. १९६७ ते ७२ या काळात ते वर्धेचे आमदार राहिले आणि त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी ते लोकसभा निवडणूक जिंकले. त्यावेळी सावलीसारखी त्यांची सोबत करणारे यशवंत झाडे यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतरही वर्षभर घंगारे साहेब स्कूटरवरच फिरत असत. मग पक्षाचे कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकांतील लोकांनी निधी जमा केला आणि त्यांना चारचाकी गाडी घेऊन दिली. राहण्या-वागण्यातील साधेपणा त्यांनी अखेरपर्यंत जपला. हिंगणघाटला एकदा रात्रीची सभा होती, त्यावेळी कडक आचारसंहिता नसायची. 

रात्रीचे बारा वाजले तरी सभास्थानी रामचंद्र घंगारे येईनात. त्यांना यायला उशीर होत असल्याने सभा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा मोबाइल वगैरे नव्हतेच. घंगारे रात्री १ वाजता सभास्थानी पोहोचले. गावात पुन्हा दवंडी दिली गेली, जेवढे लोक घरी गेले त्यापेक्षा जास्त लोक सभेला आले अन् या गर्दीसमोर घंगारेंचे जोरदार भाषण झाले. एकदा त्यांचे कार्यकर्ते पहाटे ४ वाजेपर्यंत भिंती रंगवत होते. ५ वाजता ते झोपायला आले असता, गावातले लोक आले व आमच्या भिंती घंगारे साहेबांच्या प्रचारासाठी रंगवा, अशी विनंती केली. मग काय सकाळी ९ वाजेपर्यंत हे काम चालले. घंगारे यांचा सामान्य माणसांशी असा ‘कनेक्ट’ होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४DhuleधुळेElectionनिवडणूक