शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकही उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. याआधी नववी ते १२ वीचे वर्ग ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. याआधी नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. ७ डिसेंबरपासून जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प प्रमाणात होती. मात्र आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मागील १० महिन्यांपासून घरीच असल्यामुळे विद्यार्थीही कंटाळले होते. त्यामुळे आता शाळा सुरू होणार असल्यामुळे ते आनंदी झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असल्याची माहिती पालकांनी दिली. तसेच ऑनलाईन शिक्षण घेत असतानाच मुलांमध्ये मोबाईल खेळण्याचे प्रमाण वाढले होते. प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या धाकामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो. मात्र घरी असताना अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. वर्ग कधीपासून सुरू करायचे त्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता ७ डिसेंबरपासून नववी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आता मात्र उपस्थिती वाढली आहे.

प्रतिक्रिया

माझा मुलगा इयत्ता आठवीला आहे. शाळा दिवाळीनंतरच सुरू होणे अपेक्षित होते. सर्व खबरदारी घेऊन पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळेनेही योग्य काळजी घ्यावी.

- अशोक बडगुजर, पालक, अवधान

माझा मुलगा सातवीला आहे. कोरोनाचे नियम पाळून मुलाला शाळेत पाठवणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे गरजेचे आहे. मुलाला शाळेत पाठवताना मास्क देणार आहोत.

राकेश पाटील, पालक, अवधान

ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण जास्त प्रभावी आहे. शिक्षकांच्या धाकामुळे मुलांचा अभ्यास चांगला होतो. पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळांनीही उपाययोजना कराव्यात.

- प्रमोद पाटील, धुळे

संयुक्त तपासणी केली जाईल

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. तालुका आरोग्याधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळांची संयुक्त तपासणी करणार आहोत. तसेच पालकांचे संमतीपत्र घेणार आहोत.

मनीष पवार, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी - ४३३९१

सहावी - ४०८७७

सातवी - ४०९२४

आठवी - ३९५६४

जिल्ह्यातील शाळांची संख्या - ११५३

जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या - ४०६५