शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकही उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. याआधी नववी ते १२ वीचे वर्ग ...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच कोरोनाची भीतीही कमी झाली आहे. याआधी नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. ७ डिसेंबरपासून जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प प्रमाणात होती. मात्र आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मागील १० महिन्यांपासून घरीच असल्यामुळे विद्यार्थीही कंटाळले होते. त्यामुळे आता शाळा सुरू होणार असल्यामुळे ते आनंदी झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असल्याची माहिती पालकांनी दिली. तसेच ऑनलाईन शिक्षण घेत असतानाच मुलांमध्ये मोबाईल खेळण्याचे प्रमाण वाढले होते. प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या धाकामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो. मात्र घरी असताना अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. वर्ग कधीपासून सुरू करायचे त्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता ७ डिसेंबरपासून नववी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आता मात्र उपस्थिती वाढली आहे.

प्रतिक्रिया

माझा मुलगा इयत्ता आठवीला आहे. शाळा दिवाळीनंतरच सुरू होणे अपेक्षित होते. सर्व खबरदारी घेऊन पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळेनेही योग्य काळजी घ्यावी.

- अशोक बडगुजर, पालक, अवधान

माझा मुलगा सातवीला आहे. कोरोनाचे नियम पाळून मुलाला शाळेत पाठवणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे गरजेचे आहे. मुलाला शाळेत पाठवताना मास्क देणार आहोत.

राकेश पाटील, पालक, अवधान

ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण जास्त प्रभावी आहे. शिक्षकांच्या धाकामुळे मुलांचा अभ्यास चांगला होतो. पाल्याला शाळेत पाठवणार आहे. शाळांनीही उपाययोजना कराव्यात.

- प्रमोद पाटील, धुळे

संयुक्त तपासणी केली जाईल

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. तालुका आरोग्याधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळांची संयुक्त तपासणी करणार आहोत. तसेच पालकांचे संमतीपत्र घेणार आहोत.

मनीष पवार, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी - ४३३९१

सहावी - ४०८७७

सातवी - ४०९२४

आठवी - ३९५६४

जिल्ह्यातील शाळांची संख्या - ११५३

जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या - ४०६५