शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाशांची तीच ती कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ...

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केलेली असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू ठेवली आहे. एसटीला जिल्हाबंदीची अट नसली, तरी प्रवासीसंख्या २२ पेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट घालून देण्यात आलेली आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंदणी केली जात आहे. दिव्यांगासह एक प्रवासी प्रवास करू शकतो. सर्वसामान्यांना प्रवासास बंदी आहे. मात्र, अत्यावश्यकच असल्यास त्यांना प्रवास करू दिला जातो. मात्र, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिकेेचे आरोग्य पथक प्रत्येक आगारात नियुक्त केलेले आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्याने, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार नाही. त्यातच लॉकडाऊन वाढल्यास खायाचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाल्याने, बहुतेकांना आता घरी जाण्याचे वेध लागलेले आहे. जिल्हाबंदीमुळे इतर मालवाहतूक व्यतिरिक्त इतर वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे.त्यामुळे प्रवाशांनाही एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवासासाठी प्रवासीही तीच ती कारणे सांगू लागले आहेत.

धुळे जिल्ह्यात केवळ ५ आगार असून, त्यापैकी चार आगारांतर्फेच बसगाड्या सोडण्यात येत आहे. यात धुळे आगारातून नाशिकसाठी दोन-तीन फेऱ्या व जळगावसाठी एक फेरी होते, तर साक्री, शिरपूर, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी एक-दोन फेऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागाासाठी एकही फेरी सुरू नाही. साधारत: सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी होते. प्रवाशांअभावी बस स्थानकातही शुकशुकाट असतो.

कारणे सारखीच

साहेब, घरी आई-वडील आजारी असून, त्यांना भेटायला जायचे आहे.

शहरात रोजगारच राहिलेला नाही, त्यामुळे आता गावीच काहीतरी कामधंदा करू, म्हणून जायचे आहे.

गावाकडे शेतीची कामे बाकी आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.

नाशिक, जळगाव मार्गावरच गाड्या

धुळे जिल्ह्यातील आगारामार्फत मोजक्या गाड्या सोडल्या जात आहे. त्यात धुळ्यातून नाशिक, जळगावसाठी तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी बस सोडण्यात येत आहे. मात्र, या सर्व बसगाड्यांमध्ये २२ प्रवासी बसविले जात आहे. सध्या प्रवासी संख्या रोडावल्याने, फक्त एक-दोन फेऱ्या होत आहे. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांशी वाद

सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवताना राज्य शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासावे लागत आहे. जे सर्वसामान्य प्रवासी असतील, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारून घ्यायचा आहे. मात्र, काही प्रवासी ओळखपत्रही दाखवित नाही, होमक्वारंटाइनचा शिक्का मारण्यासही नकार देतात. त्यामुळे अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांशी प्रवासी वाद घालत असल्याचे सांगण्यात आले.