शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

एसटी प्रवाशांची तीच ती कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ...

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केलेली असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू ठेवली आहे. एसटीला जिल्हाबंदीची अट नसली, तरी प्रवासीसंख्या २२ पेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट घालून देण्यात आलेली आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंदणी केली जात आहे. दिव्यांगासह एक प्रवासी प्रवास करू शकतो. सर्वसामान्यांना प्रवासास बंदी आहे. मात्र, अत्यावश्यकच असल्यास त्यांना प्रवास करू दिला जातो. मात्र, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिकेेचे आरोग्य पथक प्रत्येक आगारात नियुक्त केलेले आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्याने, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार नाही. त्यातच लॉकडाऊन वाढल्यास खायाचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाल्याने, बहुतेकांना आता घरी जाण्याचे वेध लागलेले आहे. जिल्हाबंदीमुळे इतर मालवाहतूक व्यतिरिक्त इतर वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे.त्यामुळे प्रवाशांनाही एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवासासाठी प्रवासीही तीच ती कारणे सांगू लागले आहेत.

धुळे जिल्ह्यात केवळ ५ आगार असून, त्यापैकी चार आगारांतर्फेच बसगाड्या सोडण्यात येत आहे. यात धुळे आगारातून नाशिकसाठी दोन-तीन फेऱ्या व जळगावसाठी एक फेरी होते, तर साक्री, शिरपूर, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी एक-दोन फेऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागाासाठी एकही फेरी सुरू नाही. साधारत: सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी होते. प्रवाशांअभावी बस स्थानकातही शुकशुकाट असतो.

कारणे सारखीच

साहेब, घरी आई-वडील आजारी असून, त्यांना भेटायला जायचे आहे.

शहरात रोजगारच राहिलेला नाही, त्यामुळे आता गावीच काहीतरी कामधंदा करू, म्हणून जायचे आहे.

गावाकडे शेतीची कामे बाकी आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.

नाशिक, जळगाव मार्गावरच गाड्या

धुळे जिल्ह्यातील आगारामार्फत मोजक्या गाड्या सोडल्या जात आहे. त्यात धुळ्यातून नाशिक, जळगावसाठी तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी बस सोडण्यात येत आहे. मात्र, या सर्व बसगाड्यांमध्ये २२ प्रवासी बसविले जात आहे. सध्या प्रवासी संख्या रोडावल्याने, फक्त एक-दोन फेऱ्या होत आहे. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांशी वाद

सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवताना राज्य शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासावे लागत आहे. जे सर्वसामान्य प्रवासी असतील, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारून घ्यायचा आहे. मात्र, काही प्रवासी ओळखपत्रही दाखवित नाही, होमक्वारंटाइनचा शिक्का मारण्यासही नकार देतात. त्यामुळे अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांशी प्रवासी वाद घालत असल्याचे सांगण्यात आले.