शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
5
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
6
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
7
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
8
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
9
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
10
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
11
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
12
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
13
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
14
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
15
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
16
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
17
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
18
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
19
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
20
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

एसटी प्रवाशांची तीच ती कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ...

गेल्या वेळी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे बससेवा पूर्णत: बंद करण्यात आलेली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केलेली असली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू ठेवली आहे. एसटीला जिल्हाबंदीची अट नसली, तरी प्रवासीसंख्या २२ पेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट घालून देण्यात आलेली आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंदणी केली जात आहे. दिव्यांगासह एक प्रवासी प्रवास करू शकतो. सर्वसामान्यांना प्रवासास बंदी आहे. मात्र, अत्यावश्यकच असल्यास त्यांना प्रवास करू दिला जातो. मात्र, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिकेेचे आरोग्य पथक प्रत्येक आगारात नियुक्त केलेले आहे.

लॉकडाऊन जाहीर केल्याने, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार नाही. त्यातच लॉकडाऊन वाढल्यास खायाचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाल्याने, बहुतेकांना आता घरी जाण्याचे वेध लागलेले आहे. जिल्हाबंदीमुळे इतर मालवाहतूक व्यतिरिक्त इतर वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे.त्यामुळे प्रवाशांनाही एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रवासासाठी प्रवासीही तीच ती कारणे सांगू लागले आहेत.

धुळे जिल्ह्यात केवळ ५ आगार असून, त्यापैकी चार आगारांतर्फेच बसगाड्या सोडण्यात येत आहे. यात धुळे आगारातून नाशिकसाठी दोन-तीन फेऱ्या व जळगावसाठी एक फेरी होते, तर साक्री, शिरपूर, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी एक-दोन फेऱ्या होत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागाासाठी एकही फेरी सुरू नाही. साधारत: सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी होते. प्रवाशांअभावी बस स्थानकातही शुकशुकाट असतो.

कारणे सारखीच

साहेब, घरी आई-वडील आजारी असून, त्यांना भेटायला जायचे आहे.

शहरात रोजगारच राहिलेला नाही, त्यामुळे आता गावीच काहीतरी कामधंदा करू, म्हणून जायचे आहे.

गावाकडे शेतीची कामे बाकी आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.

नाशिक, जळगाव मार्गावरच गाड्या

धुळे जिल्ह्यातील आगारामार्फत मोजक्या गाड्या सोडल्या जात आहे. त्यात धुळ्यातून नाशिक, जळगावसाठी तर शिरपूर, साक्री, शिंदखेडा या आगारातून फक्त धुळ्यासाठी बस सोडण्यात येत आहे. मात्र, या सर्व बसगाड्यांमध्ये २२ प्रवासी बसविले जात आहे. सध्या प्रवासी संख्या रोडावल्याने, फक्त एक-दोन फेऱ्या होत आहे. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांशी वाद

सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवताना राज्य शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासावे लागत आहे. जे सर्वसामान्य प्रवासी असतील, त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारून घ्यायचा आहे. मात्र, काही प्रवासी ओळखपत्रही दाखवित नाही, होमक्वारंटाइनचा शिक्का मारण्यासही नकार देतात. त्यामुळे अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांशी प्रवासी वाद घालत असल्याचे सांगण्यात आले.