शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सालगड्याचा पगार लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक ...

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक लाख रुपयापेक्षाही जास्त रकमेची मागणी करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील बहुतांश मजूर शेतात काम करण्यापेक्षा शहरात जाऊन कोणतेही काम केलेले बरे असे म्हणून शहराकडे कामासाठी निघून जात आहेत. त्यामुळे सालदार मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये सालदार मिळत नसल्याने व त्यांचे पगार लाखांच्यावर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक कारणांमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पगार देणे अवघड होऊन बसले आहे.

यंदा सालदारचा पगार कुठे ९० हजार तर कुठे १ लाखांवर गेल्याचे चित्र आहे. स्थानिक भागांमध्ये सालदार मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून (मध्य प्रदेश) येथून मजूर आणावे लागत आहेत. सहजासहजी सालदार मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करण्याला पसंती दिली आहे.

अनेक जण बैल मोडीत काढीत आहेत. शेती वाटणीने देण्याची पद्धत ही वाढली असून अर्धा हिस्सा अथवा तिसरा हिस्सा देऊन शेती केली जात आहे. त्यामुळे काम करणाऱ्यासोबत आपल्यालाही हिस्सा मिळत असल्याने संबंधित व्यक्ती चांगले कष्ट करून उत्पादनात वाढ करील आणि त्यातून आपल्याला हिस्सा मिळेल, या उद्देशाने शेती वाटणीने देण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महागाई वाढत असल्याने सालगड्यांनाही आपल्याला मिळणारा पगार वाढवून द्यावा, अशी अपेक्षा वाटत आहे. शहरात गेल्यावर छोटी-मोठी कामे केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपले कुटुंब बऱ्यापैकी चालते, म्हणून शहरात जाऊन कामे केलेली बरी असा मतप्रवाह मजुरांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे.

यांत्रिक शेतीवर भर - राज्य व केंद्र सरकारकडून शेती अवजारासाठी अनुदान मिळत असल्याने व मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरी यांत्रिक शेती करण्याकडे भर देत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र, दुसरीकडे सालगड्याची जीवनशैली बदलली असल्याने सालगडी ठरवणे व कराराप्रमाणे काम करून घेणे जिकिरीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणांचे शिक्षण झाले आहे, असे म्हणत शेतीतील कामांना टाळत आहेत. मागील पिढीतील युवा शेतकरी काम करण्यास तयार होतात. परंतु, तेही रोजंदारी पद्धतीवर. याचा मोठा परिणाम बटाई(निम्मे) असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे. लाख रुपये मोजनदेखील हवा तसा सालदार मिळत नसल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.