शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याचा पगार लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक ...

गुढीपाडवा आला की शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी सालदाराचा शोध घेत असतात. परंतु, यंदा शेतात काम करण्यासाठी सालदार एक लाख रुपयापेक्षाही जास्त रकमेची मागणी करीत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील बहुतांश मजूर शेतात काम करण्यापेक्षा शहरात जाऊन कोणतेही काम केलेले बरे असे म्हणून शहराकडे कामासाठी निघून जात आहेत. त्यामुळे सालदार मिळणे कठीण झाले आहे. शेतीमध्ये सालदार मिळत नसल्याने व त्यांचे पगार लाखांच्यावर गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक कारणांमुळे शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पगार देणे अवघड होऊन बसले आहे.

यंदा सालदारचा पगार कुठे ९० हजार तर कुठे १ लाखांवर गेल्याचे चित्र आहे. स्थानिक भागांमध्ये सालदार मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यासह परराज्यातून (मध्य प्रदेश) येथून मजूर आणावे लागत आहेत. सहजासहजी सालदार मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करण्याला पसंती दिली आहे.

अनेक जण बैल मोडीत काढीत आहेत. शेती वाटणीने देण्याची पद्धत ही वाढली असून अर्धा हिस्सा अथवा तिसरा हिस्सा देऊन शेती केली जात आहे. त्यामुळे काम करणाऱ्यासोबत आपल्यालाही हिस्सा मिळत असल्याने संबंधित व्यक्ती चांगले कष्ट करून उत्पादनात वाढ करील आणि त्यातून आपल्याला हिस्सा मिळेल, या उद्देशाने शेती वाटणीने देण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महागाई वाढत असल्याने सालगड्यांनाही आपल्याला मिळणारा पगार वाढवून द्यावा, अशी अपेक्षा वाटत आहे. शहरात गेल्यावर छोटी-मोठी कामे केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आपले कुटुंब बऱ्यापैकी चालते, म्हणून शहरात जाऊन कामे केलेली बरी असा मतप्रवाह मजुरांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त जवळ आलेला असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे.

यांत्रिक शेतीवर भर - राज्य व केंद्र सरकारकडून शेती अवजारासाठी अनुदान मिळत असल्याने व मजुरांची उपलब्धता होत नसल्याने तालुक्यातील छोटे-मोठे शेतकरी यांत्रिक शेती करण्याकडे भर देत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. मात्र, दुसरीकडे सालगड्याची जीवनशैली बदलली असल्याने सालगडी ठरवणे व कराराप्रमाणे काम करून घेणे जिकिरीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणांचे शिक्षण झाले आहे, असे म्हणत शेतीतील कामांना टाळत आहेत. मागील पिढीतील युवा शेतकरी काम करण्यास तयार होतात. परंतु, तेही रोजंदारी पद्धतीवर. याचा मोठा परिणाम बटाई(निम्मे) असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे. लाख रुपये मोजनदेखील हवा तसा सालदार मिळत नसल्याची परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.